es
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
757
Suscriptores
-224 horas
-17 días
-1030 días
Archivo de publicaciones
जीएसटी आता 22 लाख कोटीवर गेलाय आणि अर्थातच यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे यूपीआयचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12 हजार पटीने वाढ झाली आहे आणि 314 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले चायना सहित सगळ्या देशांना मागे टाकलेला आहे डिजिटल व्यवहारांमध्ये आणि विशेषता आम्ही तयार केलेला यूपीआय हा आता जगातले 30 देश वापरतायत

पहिल्यांदा तर या विलिनीकरणाबद्दल 'बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना' अशा पद्धतीने जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही, पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसतायत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा, आम्हाला नुकसान नाही

*Program begins* 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE| माजी खासदार स्व. अण्णासाहेब चुडामण पाटीलजी यांच्या 'अजिंक्य' या जीवनचरित्राचे प्रकाशन | मुंबई https://www.youtube.com/live/chbMMbpBR7g?si=8u7nCRPk7jOp9_Nc

पहिली गोष्ट अशी आहे की २१ नाही २५ कोटी लोक गरिबी रेषेतन बाहेर आलेत. गरिबी रेषेतन बाहेर आले तरी देखील ते काही एकदम श्रीमंत झाल्या तशी परिस्थिती नाहीये. आता ते एक डिसेंट अशा प्रकारचे जीवन जगू शकतात आणि म्हणून जोपर्यंत ते या परिस्थितीत कायम होत नाही कारण असं यापूर्वी आपण बघितलेल आहे की काही लोक गरिबीतन बाहेर येतात आणि पुन्हा गरिबीत जातात. त्यामुळे त्यांना किमान दोन वेळच्या जेवणाची चिंता करावी लागू नये आणि त्यांनी आहे त्यापेक्षा अधिक सक्षम व्हावं, सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा या दृष्टीने पाच वर्षा करता ती योजना चालूच ठेवण्यात आलेली आहे

हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं म्हणून तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्यांच्या मेलेल्या बैलाचा त्यांना कंपेन्सशन दिलं आणि एक बैल देखील दिला आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा.

ज्यांनी आरोप लावायचा प्रयत्न केला ते तोंडावर पडलेले आहेत त्यामुळे हेही एक आश्चर्य आहे की १२ वर्ष बेदाग अशा पद्धतीच सरकार हे मोदीजींनी चालवून दाखवलाय

मा. मोदीजींच्या नेतृत्वातील सुशासनाचा नवा अध्याय डिजिटल क्रांती आणि थेट लाभ

आणि म्हणून जसं मी सांगितलं की केवळ लॉन्गेस्ट सर्विंग नाही तर फायनेस्ट सर्विंग केवळ लॉन्गेस्ट सर्विंग नाही तर ज्यांनी देशामध्ये 360 डिग्रीचा बदल करून दाखवला 360 डिग्री डिफरन्स ज्यांनी आणून दाखवला अशा पद्धतीचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या कार्यकाळाला महाराष्ट्राच्या वतीने मी अनंत अनंत शुभेच्छा देतो

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचा अनावरण असेल इंदू मिल इथलं स्मारक असेल नवी मुंबईच आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल मेट्रो तीन सहित वेगवेगळ्या राज्य शहरांमधल्या मेट्रो असतील अटल सेतू कोस्टल रोड मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचे ३० वर्ष महाराष्ट्र देशात नंबर वन राहील अशा पद्धतीच वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या दहा बंदरातल बंदर असणार आहे १० लाख लोकांना रोजगार देणारे आणि महाराष्ट्राची आणि अर्थ भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे

२.६ लाख स्टार्टअप्स आणि १२० यूनिकॉर्न देशात तयार झालेत आणि या सगळ्या विकासासोबत मोदीजींनी विकास भी और विरासत भी अशा पद्धतीने या देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान हा पुन्हा उंच केलेला आहे अयोध्येतील राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ कॉरिडोर असेल, उज्जैन महाकाल लोक असेल, केदारनाथ धाम असेल, देशांमध्ये भगवान गौतम बुद्ध सर्किट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ विकास असेल, भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवस असेल, प्रसाद योजनेतून सतराशे कोटी रुपयाची कामं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेली आहेत

जनधन ते जनकल्याण, उज्ज्वला ते आयुष्मान सर्वसमावेशक विकासाची यशोगाथा...

विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत. पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94 टक्के कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे

1337 रेल्वेचे स्टेशन्स अमृत भारत स्टेशन्स म्हणून आज त्याचा कायापालट होतोय किंवा झालेला आहे. 164 हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस परदेशामध्ये किंवा जगाच्या प्रगत देशांमध्ये ज्या प्रकारची ट्रेन पाहायला मिळते, ती ट्रेन 100 टक्के भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करून आणि भारतीयांच्या सेवेमध्ये आणण्याच काम करण्यात आलेल आहे. देशातलं मेट्रो नेटवर्क हे पूर्वी पाच शहरांमध्ये होत, आता ते 26 शहरात गेलाय आणि जवळपास पाच पटीने हे मेट्रो नेटवर्क आज देशामध्ये वाढलय. पूर्वी देशात 74 विमानतळ होते, आता 164 विमानतळ ही देशामध्ये तयार झालेली आहेत, त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात संख्यात्मक आणि गुणात्मक एक प्रचंड मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत आठ लाख किलोमीटर रस्ते झाले आहेत त्यातले चार लाख किलोमीटर हे केवळ मागच्या दहा वर्षांमध्ये झालेले आहेत राष्ट्रीय महामार्ग 91 हजार किलोमीटर वरन एक लाख 46 हजार किलोमीटर पर्यंत गेले आहेत आणि आपण जर बघितलं तर पूर्वी एका दिवसाला आपण 11 किलोमीटरचा हायवे तयार करायचो. आता त्याची स्पीड दिवसाला 34 किलोमीटर म्हणजे तीन पटीने प्रतिदिन हायवे करण्याची स्पीड ही आपण वाढवली आहे. रेल्वे ब्रॉडगेज विद्युतीकरण हे आता 99.6 टक्के झालाय. म्हणजे जवळपास शंभर टक्के रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ही आता इलेक्ट्रिक वर आपण आणलेली आहे

उज्वला योजनेच्या अंतर्गत ११ कोटी महिलांना गॅस कनेक्शन मिळालं. सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत साडेचार कोटी मुलींची खाते उघडून त्यात पैसे जमा करण्यात आले. जवळपास आपल्या भारताच्या सैन्यामध्ये महिलांची संख्या ही ३ हजारावरून ११ हजारावर गेली. देशामध्ये १२ कोटी शौचालय तयार झाले. १६ कोटी घरांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नेऊन महिलांना सशक्त करणे आणि महिला केंद्रित अर्थव्यवस्था करणे हे कार्य मोदीजींनी करून दाखवलं.

दूध उत्पादन दहा वर्षात 70 टक्क्याने वाढलं आणि आता जगातला सर्वाधिक दुधाचे उत्पादन करणारा देश आपला भारत झाला जवळपास एक कोटी लाख हेक्टरवर सूक्ष्म सिंचन तयार करण्याचा विक्रम झाला जनधन योजनेतून 58 कोटीहून अधिक खाती निर्माण झाली, त्यात 32 कोटी महिलांची खाती आहेत आणि ती ऍक्टिव्ह खाती आहेत आयुष्यमान भारतच्या माध्यमातन 60 कोटी लोकांना आरोग्य कार्ड आणि पाच लाखापर्यंतचा उपचार हा मोफत मिळाला

या बारा वर्षांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काही घडलं असेल तर गरिबी आणि तीव्र गरिबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढण्याचे काम मोदीजींनी केलं आणि संयुक्त राष्ट्र संघाने देखील हा दशकातला चमत्कार आहे अशा पद्धतीने या घटनेचा उल्लेख केलेला आहे 81 कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा देण्याचं काम मोदीजींनी केलं

आपण जर या देशांची डायव्हर्सिटी बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारताच्या नेतृत्वावर किती विविध देशांचा विश्वास आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि सातत्याने जागतिक अप्रूव्हल रेटिंग एजन्सीजनी मोदीजींच रेटिंग ७५ टक्क्यापर्यंत ठेवलेला आहे [१]. आणि जगातले सगळ्यात पॉप्युलर लीडर म्हणून आज सगळ्या जागतिक रेटिंग एजन्सी मोदीजींचे नाव घेतात

आज सर्वात मोठा समूह म्हणून देशाच्या 22 राज्यांमध्ये सरकार चालवतोय जवळपास देशाच्या 75% भूभागावर आणि 80% नागरिक ज्या भूभागात राहतात अशा भूभागावर आज एनडीए शासित राज्य आहे आणि काँग्रेस जेव्हा पीकवर होती तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं नव्हतं ते यश आज मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्राप्त झालय

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 12 वर्ष विश्वासाची, विकासाची, जन-कल्याणाची LIVE | पत्रकार परिषद 🕛 दु. १२.०४ वा. | १२-६-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Mumbai #PressConference https://www.youtube.com/live/xx4KbQwosvI?si=opfowAXLfDKuTtQK https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/995369623101774 https://x.com/Dev_Fadnavis/status/2065321863166017995?s=20