757
订阅者
-124 小时
无数据7 天
-830 天
帖子存档
मिश्र खताच्या संदर्भात आता आपल्याकडे भरपूर उपलब्धता आहे, म्हणजे आवश्यक तेवढी...भरपूर नाही म्हणता येणार, आवश्यक तेवढी उपलब्धता आहे. अगदी कुणाला हेच खत पाहिजे किंवा तेच खत पाहिजे अशा पद्धतीन कदाचित थोडी टंचाई जाणवेल पण ओव्हरऑल खतांचे साठे आता आपण केले
पहिल्यांदा सांगतो की या संदर्भात सगळे डिटेल्स देण्याकरता आम्हाला इलेक्शन कमिशन ने बंदी घातलेली आहे तथापि प्रेस नोट काढायला बंदी नव्हती म्हणून प्रेस नोटच्या माध्यमातून सगळे डिटेल आम्ही ले आहेत ते जर नीट वाचलं तर सगळे कन्फ्युजन दूर होतील ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी आपण करतो आहोत यामध्ये ज्या लोकांनी यापूर्वी कर्ज घेतलेला आहे जे थकीत आहेत असे सगळे लोक आपण कव्वर केलेले आहेत केवळ २०२० ला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि जे पुन्हा थकीत आहेत असं दाखवताय किंवा झालेले आहेत यांच्या संदर्भात काही रेस्ट्रिक्शन आपण टाकलेत तो नंबरही मोठा नाहीये.
एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि एक वयोवृद्ध जो व्यक्ती आहे हे कचरा टाकू नको असं एका ओलाचालकाला सांगत असल्यामुळे त्या ओलाचालकाने त्यांच्यासोबत त्यांना मारहाण केलेली आहे अतिशय गंभीरच आहे या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत
राष्ट्रार्थ जीवन जगुं प्रण हा अभंग । आपत्ती दुःख भवती असता अथांग ।।
सर्वस्व अपर्ण करू आम्ही मायभूस । निर्माल्य जीवन बनो उरी तीव्र ध्यास ।।
महाराष्ट्राला तर गेल्या बारा वर्षांमध्ये भरभरून अशा पद्धतीने माननीय मोदी साहेबांनी दिलंय आपल्या सर्वांनाच कल्पना आहे आपले जवळपास १०० धरणं पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारने आपल्याला मदत केली
महाराष्ट्रामध्ये वाढवण सारखं बंदर असेल, महाराष्ट्रामध्ये हायवेज असतील, मेट्रो असेल, ट्रेनच नेटवर्क असेल, नवी मुंबईचे एअरपोर्ट असेल, मेट्रो थ्री असेल असे अनेक प्रकल्प आपल्याला सांगता येतील की जे केवळ कागदावर दिसायचे पण प्रत्यक्षात उतरलेले आपल्याला पाहायला मिळतायत आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनेही आमच्या या लाडक्या प्रधानमंत्री महोदयांच मी मनःपूर्वक अभिनंदन करतो
मला अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही त्यांनी त्यांच्या विलिनीकरणाचा मुहूर्त काढावा इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत महाराष्ट्रावर बोलावं जगभरावर कशाला बोलावं आपण
असले ईमेल येत असतात आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो त्याच्या त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आत्तापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात ते चुकीचे असतात तथापि कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे ते होतय
गिरीश भाऊंनी विधान केले त्यावरती त्याच्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलय तुम्ही मला फिरवून फिरवून विचारलं तरी त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी दिलय त्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मला देण्याची आवश्यकता वाटत नाही
भारताच्या वाटचालीत शीख समाजाचे योगदान शिख समाजाला संपूर्णपणे मुख्यधारेमध्ये आणण्याकरता भारत सरकारने केलेले योगदान आणि पंजाब मध्ये जे काही ड्रगचा वाढता प्रश्न आहे या संदर्भात त्यांनी कमेंट केलेला आहे मला असं वाटतं की याला दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने बघण्याची गरज नाही
पहिली गोष्ट अशी आहे. शरद पवार काय म्हणाले? मी ऐकलं नाही. त्यांचं भाषण मी ऐकलं नाही. त्यामुळे तुम्ही अर्धवट गोष्टी मला सांगून माझी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न कराल. तर ती योग्य होणार नाही मात्र एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की ज्या प्रकारे शिखांवर काँग्रेसने अत्याचार केला त्याचा निषेध हा जन्मभर आम्ही करू शेवटपर्यंत आम्ही करू ज्या प्रकारे कतलेआम शिखांचा या दिल्लीमध्ये पंजाबमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात झालेला आहे हे सत्य आहे हे सत्य कोणालाही विस करता येणार नाही
असं आहे की बुड्त्याला काडीचा आधार असतो. त्यामुळे स्वतःच्या मनाची समजूत घालणं. आणि कार्यकर्त्यांना एक स्वप्न दाखवणं. की चमत्कार होणार, चमत्कार होणार, एक वर्षात मोदी जाणार. असं गेले दहा वर्षे चमत्कार ते करतायत. पण तो चमत्कार काही घडत नाही. मोदीजीच नवनवीन चमत्कार घडवतात आणि बंगाल सारखा विजय हा खऱ्या अर्थानं केवळ देशाला नाही तर संपूर्ण विश्वाला थक्क करून सोडतो म्हणून मला असं वाटतं की फार गंभीरतेने हे घेण्याचं कारण नाही ते बुड्त्याला काडीचा आधार आहे तसा तो काडीचा आधार घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करतात.
खरं म्हणजे केवळ हा रेकॉर्ड चा भाग आहे की देशांमध्ये इलेक्टेड निर्वाचित पंतप्रधानांमध्ये नेहरूजींचा एक रेकॉर्ड होता.ते 4398 दिवस होते मोदीजी आता 4399 दिवस झालेत आणि पुढे ते राहणार आहेत याच्या व्यतिरिक्त नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केलं ते आपल्याला माहिती आहे मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केलं ते आपल्याला माहितीये
मला असे अनेक क्षण सांगता येतील पण विशेषतः ज्या ज्या वेळी महाराष्ट्राकरता मोदीजींकडे मी गेलो. त्यावेळी मोदीजींनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण ण 2015 च्या दुष्काळामध्ये ज्यावेळी मोदीजींकडे गेलो देशामध्ये केवळ महाराष्ट्राला बळीराजा योजना त्यांनी दिली ज्यामुळे 100 धरणं विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातले आपण पूर्ण करू शकलो मला असं वाटतं की इतका सेन्सिटिव्ह संवेदनशील नेता हा आपल्याला खचित बघायला मिळतो
ज्या काळामध्ये शेतकऱ्यांकरता सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्याकरता सर्वाधिक निधी केंद्र सरकारने दिला तो हा काळ आहे ज्या काळामध्ये आत्मनिर्भर भारत हा तयार होताना आपण बघितला आणि विशेषता ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर भारताची शक्ती आपण दाखवली
हे ४३९९ दिवस केवळ हा काळ नाहीये तर हा भारताच्या प्रगतीचा आलेख ज्या काळामध्ये लिहिला गेला असा सुवर्ण काळ आहे ज्या काळामध्ये देशातले २५ कोटी लोक गरिबीतन बाहेर आले तो हा काळ आहे ज्या काळामध्ये देशामध्ये रस्ते, रेल्वे, पोर्ट, एअरपोर्ट सर्व प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच जाळ तयार झालं तो हा काळ आहे ज्या काळामध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेने एक मोठी भरारी घेत जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जगाच्या पाठीवर नाव कमावलं तो हा सुवर्ण काळ आहे
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕑 2.12pm | 10-6-2026📍New Delhi
LIVE | Media Interaction
#Maharashtra #NewDelhi
https://www.youtube.com/live/kggsJVJswXY?si=wxkLVBhpynxESo0q
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4681816565429180
https://x.com/Dev_Fadnavis/status/2064629480539439187?s=20
१२ वर्षे महिला उत्थानाची....नारीशक्तीचा सन्मान केला...महिलांना आरोग्याचा नवा मंत्र दिला...
नातवांनी जबाबदारी झटकली...पण वयोवृद्ध आजींसाठी देवाभाऊंनी मुलाचे कर्तव्य पार पाडलं.. न्याय मिळवून दिला
१२०० वर्षांच्या संघर्षानंतर, ७० वर्षांच्या काँग्रेसी राजकारणाच्या कचाट्यातून देश बाहेर पडला...जनतेने एका जनसेवकाची निवड केली आणि राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा नवा अध्याय सुरू झाला आणि तो अविरत सुरुच राहणार..
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
