es
Feedback
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

Ir al canal en Telegram

स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

El canal स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (@mpscandolan) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 26 774 suscriptores, ocupando la posición 7 261 en la categoría Educación y el puesto 15 587 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 26 774 suscriptores.

Según los últimos datos del 05 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 49, y en las últimas 24 horas de 4, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 30.04%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 18.36% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 8 044 visualizaciones. En el primer día suele acumular 4 915 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 66.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 06 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

26 774
Suscriptores
+424 horas
+907 días
+4930 días
Archivo de publicaciones
मोबाईल जामर बसवले आहेत याचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? त्यांचा आवाज जनतेपर्यंत जाऊ न देण्याचाच हा प्रयत्न #mpscexamoffline

MPSC ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी नगर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलन ठिकाणी मोठा फौज फाटा आणि मोबाईल जामर बसवले आहेत याचा अर्थ काय? विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? त्यांचा आवाज जनतेपर्यंत जाऊ न देण्याचाच हा प्रयत्न #mpscexamoffline

वकिलांची टीम पण मैदानात योग्य नियोजन ✅✅ काळजी नसावी ✅

विद्यार्थ्यांची एकजूट: अन्यायाविरुद्धचा बुलंद आवाज, ज्याने सरकारलाही धडकी भरते "जेव्हा विद्यार्थी जागा होतो, तेव्हा व्यवस्था हादरते." हे वाक्य केवळ घोषवाक्य नाही, तर इतिहासाने अनेकदा सिद्ध केलेले सत्य आहे. विद्यार्थी हा समाजाचा केवळ उद्याचा नागरिक नसून आजच्या परिवर्तनाचा शिल्पकार आहे. त्याच्याकडे ऊर्जा आहे, विचार आहेत आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द आहे. म्हणूनच जेव्हा विद्यार्थी वर्ग स्वतःवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आणि व्यवस्थेतील भ्रष्टाचार, निष्काळजीपणा व अकार्यक्षमतेविरुद्ध एकजुटीने रस्त्यावर उतरतो, तेव्हा सरकारलाही त्या आवाजाची दखल घ्यावी लागते. आज शिक्षण क्षेत्र अनेक समस्यांनी वेढलेले आहे. पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, वाढती शैक्षणिक फी, अपुऱ्या सुविधा, बेरोजगारी आणि निर्णय प्रक्रियेतील विलंब यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. अनेकदा निवेदने, अर्ज आणि विनंत्या करूनही प्रश्न सुटत नाहीत. अशा वेळी विद्यार्थी लोकशाहीच्या चौकटीत राहून आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात. हा संघर्ष केवळ स्वतःसाठी नसून भविष्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी असतो. इतिहासात अनेक विद्यार्थी चळवळींनी समाज आणि सत्तेला नवी दिशा दिली आहे. जेव्हा विद्यार्थी जात, धर्म, पक्ष किंवा वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून न्यायासाठी एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या एकजुटीसमोर मोठमोठ्या सत्तांनाही झुकावे लागते. कारण विद्यार्थ्यांचा आवाज हा कोणत्याही एका व्यक्तीचा नसतो; तो संपूर्ण पिढीच्या अपेक्षा आणि भविष्याचे प्रतिनिधित्व करणारा आवाज असतो. सरकारला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची भीती त्यांच्या संख्येमुळे नसते, तर त्यांच्या नैतिक शक्तीमुळे असते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समाजाचा पाठिंबा मिळू लागला, तर ते आंदोलन व्यापक जनआंदोलनाचे रूप घेऊ शकते. त्यामुळे सरकारला त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावे लागतात. हीच लोकशाहीची खरी ताकद आहे—जनतेच्या आवाजाला प्रतिसाद देणारी व्यवस्था. मात्र, आंदोलन करताना संयम, शिस्त आणि संविधानिक मार्ग यांचे पालन करणे तितकेच आवश्यक आहे. हिंसा, तोडफोड किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने आंदोलनाची नैतिक ताकद कमी होते. शांततापूर्ण आणि संघटित आंदोलन समाजात अधिक विश्वास निर्माण करते आणि त्याचा परिणामही अधिक प्रभावी ठरतो. विद्यार्थ्यांची एकजूट ही कोणत्याही सरकारविरुद्ध नसून अन्याय, भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम व्यवस्थेविरुद्ध असते. त्यांचा उद्देश संघर्षासाठी संघर्ष करणे नसून, न्याय, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करणे हा असतो. म्हणूनच सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यापेक्षा तो ऐकून त्यांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण करणे आवश्यक आहे. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की, विद्यार्थ्यांच्या हातात केवळ पुस्तके नसतात, तर देशाचे भविष्यही असते. जेव्हा हे हात न्यायासाठी एकत्र येतात, तेव्हा सत्तेच्या भिंतीही हादरतात. विद्यार्थ्यांची एकजूट ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहणारे विद्यार्थी हेच उद्याचे जबाबदार नागरिक, सक्षम नेतृत्व आणि सशक्त भारताचे निर्माते आहेत. #Shree..!!

यांनीच जागा कव्हर केली पोरांनी आंदोलन कुठे करायचं😅
यांनीच जागा कव्हर केली पोरांनी आंदोलन कुठे करायचं😅

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गावागावातील ..MPSC... अभ्यास करणारे सर्व मुलांनी उद्याच्या आंदोलनाला उपस्थित राहावे. तसेच छत्रपती संभाजी नगरच्या आसपासच्या जिल्ह्यातील सुद्धा मुलांनी उपस्थित राहावे. ही कळकळीची विनंती.... लढा स्वतःच्या हक्कासाठी.🙏🙏

पॉईंट 10 चा मराठीत अर्थ👇 दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास त्यामध्ये अपरिहार्यपणे मनमानी कारभाराला वाव मिळेल आणि परीक्षा देणा
पॉईंट 10 चा मराठीत अर्थ👇 दोन सत्रांमध्ये परीक्षा घेतल्यास त्यामध्ये अपरिहार्यपणे मनमानी कारभाराला वाव मिळेल आणि परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या गुणवत्तेची समान पातळीवर तुलना करणे शक्य होणार नाही. कोणत्याही दोन प्रश्नपत्रिकांची काठिन्य पातळी अगदी समान आहे, असे कधीच म्हणता येणार नाही; त्यामध्ये तफावत असणारच. 'नॉर्मलायझेशन'ची (गुण-समायोजन) पद्धत अपवादात्मक परिस्थितीत वापरली जाऊ शकते, परंतु दरवर्षी नियमितपणे ती अवलंबणे योग्य नाही; विशेषतः जेव्हा उमेदवारांची संख्या अवास्तव मोठी नसते — जशी की सध्याच्या परिस्थितीत आहे.

Aditi_vs_National_Board_Of_Examination_In_on_30_May_2025.PDF2.42 KB

चलो छत्रपती संभाजी नगर
चलो छत्रपती संभाजी नगर

कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके उद्याच्या आपल्या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत... ✨

🔥उद्या छत्रपती संभाजीनगर ऑफलाईन म्हणजे ऑफलाईन 🔥

प्रिय भीमनवार सर, आमच्या शतकाशतकांच्या पिढ्यांना झालेली जखम अजूनही भळभळतच आहे, त्या जखमांचे डाग आमच्या पिढीच्या कपाळाकपाळावर डागले. त्या जखमेशी आमचे अतूट आणि फार आतले नाते आहे. ती जखम आम्हाला बरी करायची म्हणून आम्ही MPSC या क्षेत्रात आलो. परंतु तुम्ही सोडलेल्या ONLINE नामक VIRUS विरोधी कोणतीही लस आमच्याकडे नाही, ना तुमच्याकडे त्याचा विलाज. मग हा VIRUS आम्हाला समूळ संपवण्यासाठीच सोडत आहात का ? वास्तव: R.K.PATIL जॉईन @https://t.me/mpscandolan

https://www.loksatta.com/nagpur/mpsc-online-cbt-exam-normalization-process-student-protest-maharashtra-news-hsp-89-6000245/ या बातमीला इतका फॉरवर्ड करा की आयोगावर प्रेशर निर्माण झालाच पाहिजे

Multiple prelims आल्या तरी त्यासाठीच्या पोस्ट मर्यादितच असणार आहेत. त्यामुळे 1:12 ऐवजी 1:24 प्रमाणात उमेदवार mains ला बोलावले, तर mains मध्ये अधिक उमेदवार असतील आणि अंतिम निवडीची शक्यता कमी होईल. हे सर्व पाहता, कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा केंद्रांचे वेळापत्रक व्यस्त ठेवण्याचा Government चा प्लॅन असल्याचे दिसत आहे. #SayNoToTCS

“बाकी सर्व ठीक आहे, पण वर्षातून अनेक Prelims घेऊन शेवटी एकच Mains ठेवणं — ही निवड प्रक्रियेपेक्षा विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि ऊर्जा खर्च करणारी व्यवस्था वाटते.”