ar
Feedback
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

تُعد قناة स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (@mpscandolan) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 26 946 مشتركاً، محتلاً المرتبة 7 300 في فئة التعليم والمرتبة 15 574 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 26 946 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 29 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 269، وفي آخر 24 ساعة بمقدار 2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 26.70‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 18.47‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 7 194 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 4 978 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 71.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ. संपर्क : 8668378583 Twitter : @Mpsc_Andolan Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 30 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

26 946
المشتركون
+224 ساعات
-347 أيام
+26930 أيام
أرشيف المشاركات
मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ पहावा आणि विशेष म्हणजे हे सर्व घोटाळा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ने उघडकीस आणले होते. 😊

*TRTI च्या माजी आयुक्त मंजिरी मनोलकर यांचा अजब निर्णय...* TRTI च्या माजी आयुक्त मंजिरी मनोलकर यांनी निविदा न भरलेल्या क्लास ला प्रशिक्षण देण्याचे काम देऊन स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर केला असल्याचे त्यांच्या बदलीवरून स्पष्ट होत आहे.निविदामध्ये शुभ्रारंजन सह अन्य दर्जेदार कोचिंग संस्था असताना विशिष्ट मर्जीतील कोचिंग संस्थेला थेट काम देऊन मनमानी कारभार केला असल्याची चर्चा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सुरु झाली. त्यांच्या ह्या गोष्टीमुळेच शासनाने त्यांची बदली केली असल्याची चर्चा महाराष्ट्रभर सुरु आहे. राज्य शासनाने त्यांची बदली केली ते योग्यच पण TRTI च्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण प्रक्रियेत काही बोगस कोचिंग संस्थानी बोगस / बनावट कागदपत्रे सादर करून काम मिळवले आहे. तसेच बोगस हजेरी दाखवून मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. सरकारने व विद्यमान TRTI च्या आयुक्त विशाल सागर व सचिव मॅडम श्रीमती चंचल पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. बोगस संस्थांना ब्लॅकलिस्टेड नाही केले तर सर्व पुराव्यानिशी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती कोर्टात जाईल. व बोगस संस्थाचा बंदोबस्त करेल.इन्फिनिटी सिविल इंजिनिअरिंग अकॅडेमी, संकल्प एज्युकेशन, इगनाईट अकॅडेमी, spektram अकॅडेमी ह्या चार संस्थाचे कारनामे लवकरच बाहेर काढू...

Photo from रमेशकुमार अर्जुनराव पाटील
Photo from रमेशकुमार अर्जुनराव पाटील

Tweeter war: सोसियल मीडिया मध्ये खूप ताकद आहे, पुण्यामध्ये ५ पेक्षा जास्त लोकांना जमणे बंदी आहे, त्यामुळे आपणास सोसियल मीडियावर आंदोलन पेटते ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी आज आपण ट्विटर वॉर घेणार आहोत. आज सकाळी १०:००- १२:०० या वेळेत प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करून खाली दिलेल्या अकाउंट ला टॅग करायचे आहे तसेच #onlyofflineexam हाच hashtag सर्वांनी वापरायचा आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @mieknathshinde @mpsc_office @MahaDGIPR स्वतः मेसेज तयार करा किंवा खालील ट्वीटरवर जाऊन ट्विट Reshare करा https://x.com/VastavKatta ऑफलाइन चळवळ पेटती ठेवण्यासाठी Join: https://t.me/mpscofflineexam

निवेदन प्रति, मा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. विषय : सन 2027 पासून लेखी परीक्षेच्या गुणांमध्ये घट होऊन मुलाखतीच्या गुणांचे वाढणारे सापेक्ष महत्त्व याबाबत निवेदन. महोदय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांद्वारे राज्याच्या प्रशासनासाठी अधिकारी निवडले जातात. या निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांचे ज्ञान, विश्लेषणात्मक क्षमता, निर्णयक्षमता, व्यक्तिमत्त्व आणि सार्वजनिक सेवेची क्षमता यांचे योग्य व न्याय्य मूल्यमापन होणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात सन 2026 आणि सन 2027 पासूनच्या परीक्षापद्धतीमध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीच्या गुणांच्या प्रमाणात महत्त्वपूर्ण बदल होत आहे. गुणरचनेतील बदल सन 2026 मध्ये : लेखी परीक्षा : 1750 गुण मुलाखत : 275 गुण एकूण : 2025 गुण सन 2027 पासून : लेखी परीक्षा : 1250 गुण मुलाखत : 275 गुण एकूण : 1525 गुण यामध्ये मुलाखतीचे गुण 275 वरून कमी झालेले नाहीत, परंतु लेखी परीक्षेचे गुण 1750 वरून 1250 म्हणजेच 500 गुणांनी कमी झाले आहेत. यामुळे अंतिम निकालामध्ये मुलाखतीचे सापेक्ष महत्त्व लक्षणीयरीत्या वाढणार आहे. मुलाखतीच्या गुणांच्या प्रमाणातील फरक सन 2026 मध्ये मुलाखतीचे 275 गुण हे एकूण 2025 गुणांपैकी सुमारे 13.58% होते. परंतु सन 2027 पासून मुलाखतीचे 275 गुण हे एकूण 1525 गुणांपैकी सुमारे 18.03% होतील. म्हणजेच मुलाखतीचे गुण समान 275 असले तरी, अंतिम निकालामधील मुलाखतीचा वाटा 13.58% वरून 18.03% पर्यंत वाढणार आहे. ही वाढ सुमारे 4.45 टक्के पॉइंट्सची आहे. तुलनात्मकदृष्ट्या पाहता, मुलाखतीचे सापेक्ष वजन पूर्वीच्या तुलनेत सुमारे 32.8% ने वाढणार आहे. याचा उमेदवारांच्या अंतिम निकालावर होणारा परिणाम लेखी परीक्षेतील गुणांमध्ये 500 गुणांची घट झाल्यामुळे उमेदवारांच्या लेखी परीक्षेतील कामगिरीतील फरकाचा अंतिम निकालावर तुलनेने कमी प्रभाव पडू शकतो. याउलट, मुलाखतीचे 275 गुण समान राहिल्यामुळे मुलाखतीमध्ये मिळालेल्या काही अतिरिक्त गुणांचा अंतिम गुणवत्ता यादीवर तुलनेने अधिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, 2026 मध्ये 2025 गुणांच्या एकूण परीक्षेत 275 गुणांची मुलाखत ही तुलनेने कमी वजनाची होती. मात्र 2027 पासून एकूण गुण 1525 झाल्यामुळे तेच 275 गुण अंतिम निकालाच्या तुलनेत अधिक प्रभावशाली ठरतील. यामुळे मुलाखतीमध्ये उमेदवारांमध्ये झालेला काही गुणांचा फरक अंतिम गुणवत्ता यादीत मोठा बदल घडवून आणू शकतो. विशेषतः लेखी परीक्षेतील उमेदवारांमधील गुणांचे अंतर कमी असल्यास मुलाखतीतील गुण अंतिम निवडीमध्ये निर्णायक ठरू शकतात. मुलाखतीच्या वाढत्या सापेक्ष महत्त्वाबाबत चिंता मुलाखत हा निवड प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग आहे. त्याद्वारे उमेदवाराचे संवाद कौशल्य, निर्णयक्षमता, भावनिक स्थैर्य, नैतिक विचार, नेतृत्वगुण आणि सार्वजनिक सेवेबाबतचा दृष्टिकोन तपासता येतो. मात्र मुलाखत ही मर्यादित कालावधीत घेतली जाते आणि तिचे मूल्यमापन मानवी निरीक्षणावर आधारित असते. त्यामुळे व्यक्तिनिष्ठता, वेगवेगळ्या परीक्षकांचे वेगवेगळे दृष्टिकोन किंवा अनवधानाने होणाऱ्या पूर्वग्रहाची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. याउलट, लेखी परीक्षा सर्व उमेदवारांसाठी समान प्रश्नपत्रिका, समान वेळ आणि निश्चित मूल्यमापन पद्धतीवर आधारित असते. त्यामुळे उमेदवाराचे ज्ञान, तर्कशक्ती, विश्लेषणात्मक क्षमता आणि विषयाची सखोल समज यांचे अधिक वस्तुनिष्ठ मूल्यमापन करता येते. सन 2027 पासून लेखी परीक्षेचे गुण 1750 वरून 1250 पर्यंत कमी होत असताना मुलाखतीचे गुण 275 कायम राहतात. त्यामुळे लेखी परीक्षेच्या तुलनेत मुलाखतीचा प्रभाव वाढणे ही निवड प्रक्रियेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. आमच्या प्रमुख मागण्या सन 2027 पासूनच्या नवीन परीक्षापद्धतीमध्ये लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांचे योग्य व न्याय्य संतुलन राखावे. लेखी परीक्षेचे महत्त्व कमी होणार नाही, याची आयोगाने काळजी घ्यावी. मुलाखतीच्या 275 गुणांचा अंतिम गुणवत्ता यादीवर होणारा वाढता सापेक्ष प्रभाव गांभीर्याने विचारात घ्यावा. मुलाखतीच्या मूल्यमापनासाठी स्पष्ट, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ निकष निश्चित करावेत. उमेदवाराच्या अनेक वर्षांच्या अभ्यास, ज्ञान आणि लेखी परीक्षेतील कामगिरीला योग्य महत्त्व दिले जावे. मुलाखतीतील व्यक्तिनिष्ठतेमुळे अंतिम निवड प्रक्रियेवर अनावश्यक परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्व उमेदवारांना, विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील उमेदवारांना समान संधी मिळेल अशी निवड प्रक्रिया सुनिश्चित करावी.

निवडीवर मनमर्जी व पक्षपाती प्रभाव टाळण्यासाठी मुलाखतीचे गुण 200 च्या मर्यादेत असणे उचित !
निवडीवर मनमर्जी व पक्षपाती प्रभाव टाळण्यासाठी मुलाखतीचे गुण 200 च्या मर्यादेत असणे उचित !

महावितरण'च्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह ● गेल्या पाच वर्षांपासून 757 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत
महावितरण'च्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह ● गेल्या पाच वर्षांपासून 757 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

उपजिल्हाधिकारी 2027 मागणी पत्र पाठवले नाही.
उपजिल्हाधिकारी 2027 मागणी पत्र पाठवले नाही.

"मवाळ काळखंड संपला, आता जहाल काळखंड सुरू करू." कारण आपल्या स्वातंत्र्य सुद्धा मवाळ पद्धतीने मिळालेले नाही

📍हे बघा Online परीक्षा घोटाळ्याचे पुरावे यासाठीच आम्हाला Offline परीक्षा पद्धतीच हवी..! 😊👍🏻
📍हे बघा Online परीक्षा घोटाळ्याचे पुरावे यासाठीच आम्हाला Offline परीक्षा पद्धतीच हवी..! 😊👍🏻

आयोगाने त्यांच्या Official Website वर Computer Based Exam कशी असेल त्यासाठी एक Mock Link दिली आहे. यावर क्लिक केले असता सरळ TCS या कंपनीची ONLINE परीक्षेसाठी असणारी वेबसाईट ओपन होत आहे. ज्यावेळेस आंदोलने चालू झाली होती त्यावेळेस ही Mock Link बंद केली होती आणि कालपासून पुन्हा चालू केली आहे. आयोगाने विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळू नये. 🙏