en
Feedback
✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल

✨रंगले जग कवितांचे✨ Owner= प्रांजल

Open in Telegram

💫✨प्रामाणिकपणा, सकारात्मक, योग्य विचार, माणुसकी ये जगण्याच्या दिशा आहे 👍💮 तुम्ही पाठवू शकता मराठी, इंग्रजी ,हिंदी कविता, लेख ओव्या, स्वलिखित गाणी ,भाषणे. @pgadhavvv https://youtube.com/channel/UCAYpl2FT2OENJChRd3YT3-g चैनल join Kara ## #PRAN_JAL

Show more
1 274
Subscribers
+124 hours
+17 days
+130 days
Posts Archive
समाजात प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे ते स्वाभाविक पण आहे मात्र प्रसिद्धी ती कुठल्या मार्गाने मिळवायची हे आपल्या हातात
समाजात प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे ते स्वाभाविक पण आहे मात्र प्रसिद्धी ती कुठल्या मार्गाने मिळवायची हे आपल्या हातात असतं कारण प्रसिद्धी ही चांगल्या कर्माने पण मिळते आणि वाईट कर्माने पण मात्र आपण कुठला मार्ग निवडतो यावर प्रसिद्धीचे स्वरूप ठरलेलं असतं कारण हल्ली आपण बघतं आहोत की कोणी चांगल्या नीतीने समजाला जागृत करत आहे तर कुणी समजाला अंधात ठेऊन त्यालाच फसवत राहत मात्र फसवणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीच समाधान नसतं एवढ मात्र निश्चित आहे!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

6 सप्टेंबर राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवस.. “माझे विचार, माझे शब्द इतक्या सहज आलेले नाही त्या पाठीमागे प्रचंड वाचन, अभ्यास आणि अन
6 सप्टेंबर राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवस.. “माझे विचार, माझे शब्द इतक्या सहज आलेले नाही त्या पाठीमागे प्रचंड वाचन, अभ्यास आणि अनुभव आहे. मी जर एखाद पुस्तकं लिहत असेल तर,ते पुस्तकं लिहायला दीड ते दोन वर्ष लागतात आणि त्याची पूर्वतयारी त्याच्या अगोदरच्या दोन वर्षांपासून असते.. कारण घाईगडबडीत काही करायला मला आवडत नाही..पुस्तक हा अमूल्य दस्ताएवज आहे तो वर्षानुवर्षे लोकं वाचत असतात त्यामुळे अशी पुस्तकं वर्षानुवर्षे आलेल्या अनुभव, ज्ञान आणि अभ्यासातून साकारली जातात..शोध सुखाचा हे पुस्तकं मे 2026 मध्ये प्रकाशित झालं आणि ह्या पुस्तकाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आणि आतापर्यंत पाच पुरस्कार सुद्धा ह्या पुस्तकामुळेच मिळाले.. नवे असंख्य वाचक जोडले गेले त्यामुळे हे पुस्तकं प्रत्येकाने नक्की वाचावं.. 6 सप्टेंबर राष्ट्रीय पुस्तक वाचन दिवसाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...!” ✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC ) लेखक -शोध सुखाचा (कथासंग्रह ) लिखाण दि. 6सप्टेंबर 2026 ✍️संपर्क -88063799599

श्री कृष्णाला फक्त एक देव म्हणून पूजन करण हे अंधश्रद्धेचे पहिलं लक्षण मात्र त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवून त्याने दिलेल्या
श्री कृष्णाला फक्त एक देव म्हणून पूजन करण हे अंधश्रद्धेचे पहिलं लक्षण मात्र त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवून त्याने दिलेल्या प्रत्येक संदेशाचा मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण आपलं आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशी भक्ती श्री कृष्णाला पण आवडेलं याची मला पूर्णपणे खात्री आहे ❣️🙏🏻   जय जय राम कृष्ण हरी 🌺🚩🙏🏻 एकमन#लेखक @Ommshelke

नक्की वाचा 🙏🥰
+1
नक्की वाचा 🙏🥰

जगात प्रत्येकाला असं वाटतं की सर्व काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे मात्र जो व्यक्ती वस्तुस्थिती मान्य करून जगण्याचा प्रयत्न
जगात प्रत्येकाला असं वाटतं की सर्व काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे मात्र जो व्यक्ती वस्तुस्थिती मान्य करून जगण्याचा प्रयत्न करतो तोच समाधाने राहू शकतो कारण त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की प्रभू श्री रामाला पण वनवास स्वीकारावा लागला तर मग आपण साधी माणसं ना!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

निस्वार्थी भाव माझे निस्वार्थी भावना... तु अज्ञानी माझ्याबद्दल मला तुझ्याशिवाय कोणीच ठाव णा... जिथे मी एकटा असतो मी तिथं तुला
निस्वार्थी भाव माझे निस्वार्थी भावना... तु अज्ञानी माझ्याबद्दल मला तुझ्याशिवाय कोणीच ठाव णा... जिथे मी एकटा असतो मी तिथं तुलाच शोधतो...तुझ्या प्रत्येक आठवणीने माझं काळीज थोडं थोडं खचत...❣️🌹     @Ommshelke

दिव्यांग व्यक्तीच्या जिद्दीला सलाम नक्की वाचा 🙏
+2
दिव्यांग व्यक्तीच्या जिद्दीला सलाम नक्की वाचा 🙏

लेखक अनिल भगवान चव्हाण राज्यस्तरीय समाज वैभव पुरस्काराने सन्मानित... चिखली प्रतिनिधी.. “गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिख
लेखक अनिल भगवान चव्हाण राज्यस्तरीय समाज वैभव पुरस्काराने सन्मानित... चिखली प्रतिनिधी.. “गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणारे आणि अलीकडेच ‘शोध सुखाचा ’हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून अधिक प्रसिद्धीच्या झोतात आलेले प्रसिद्ध लेखक अनिल भगवान चव्हाण (ABC )येवता ता. चिखली जि. बुलढाणा यांना नुकतेच ‘आजीच पुस्तकाच हॉटेल ’ओझर नाशिक याठिकाणी राज्यस्तरीय समाज वैभव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..बीएसएफ बहूउद्देशीय संस्था व संत कबीर संस्था द्वारे आयोजित राज्यस्तरीय कवीसंमेलनात ‘राज्यस्तरीय समाज वैभव ’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना अशोक कुमावत राष्ट्रपती पुरस्कार विजेते लेखक, सौं. कांचन जाधव (प्रसिद्ध निवेदिका )पौर्णिमा झाल्टे (अभिनेत्री )आयोजक भूषण सरदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.. अनिल चव्हाण यांना मिळालेला हा चौथा पुरस्कार असून.. मराठी साहित्य विश्वात त्यांच नाव प्रचंड गाजत आहे..हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे..”

लिहाव वाटत खूप काही पण लिहिता येत नाही जगण्याचा खरा अर्थ शब्दात मांडता येत नाही कारण हल्ली स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप कठीण झ
लिहाव वाटत खूप काही पण लिहिता येत नाही जगण्याचा खरा अर्थ शब्दात मांडता येत नाही कारण हल्ली स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप कठीण झालं राव कारण नीति महंतेचा वसा घेऊन या स्वार्थी दुनियेत फिरता येत नाही!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

जिद्दीला सलाम🙏🫡🫡 “आज बुलढाणा याठिकाणी सहज एका पावभाजीच्या दुकानात गेलो पावभाजी खाल्ली आणि सहज पावभाजी बनवणाऱ्या ह्या व्यक्
+1
जिद्दीला सलाम🙏🫡🫡 “आज बुलढाणा याठिकाणी सहज एका पावभाजीच्या दुकानात गेलो पावभाजी खाल्ली आणि सहज पावभाजी बनवणाऱ्या ह्या व्यक्तीकडे बघितलं आणि खरच मी चकित झालो एक अपंग व्यक्ती इतकं मोठं पावभाजी सेंटर चालतो तो सुद्धा अगदी सुरळीत एका वेळी 20/25 ग्राहकांना तो जे हवं ते देतो.खरतर जेव्हा जेव्हा मी अश्या दिव्यांग अपंग व्यक्तीकडे बघतो तेव्हा कुठेतरी माझ्या मनात अश्या व्यक्तीबद्दल सवेंदना जागृत होतात.वाटतं कुठेतरी अश्या व्यक्ती आपल्या समाजाचा महत्वपूर्ण भाग आहे आणि त्यांना मूळ प्रवाहात आणणं काळाची गरज आहे.चांगले धडधाकट तरुण सतत तक्रार करतात की, माझ्याकडे हे नाही ते नाही. ह्या व्यक्तीकडे बघा याला एक डोळा नाही नियतीने त्याची दृष्टी हिरावून घेतली पण तरीही कोणतीही तक्रार न करता स्वतः च्या पायावर उभ राहणारी ही व्यक्ती बघून मी सलाम केला.मूळचे भुसावळचे असणारे श्री.तेजेंद्र श्रीराम अनासुरे (खान्देश बटर पाव सेंटर बुलढाणा)हे जिद्दीने स्वतः च्या पायावर उभं राहून इथल्या प्रत्येक माणसासाठी प्रेरणा बनले आहे. ह्यांच्या कार्याला सलाम इतरांनी सुद्धा यातून प्रेरणा घेत स्वावलंबी व्हावं.” ✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC ) ✍️संपर्क -@ABCs1432

निसर्ग...माझा गुरु “ निसर्ग माणसाला खूप काही शिकवतो..तुम्ही ह्या सुंदर निसर्गाकडून काय शिकलात..? मला माहित नाही, पण मी मात्र
निसर्ग...माझा गुरु “ निसर्ग माणसाला खूप काही शिकवतो..तुम्ही ह्या सुंदर निसर्गाकडून काय शिकलात..? मला माहित नाही, पण मी मात्र खूप काही शिकलो आहे.. सुगरण पक्षांच घरट माझ्या आयुष्याची एक सुंदर प्रेरणा ठरलं..ह्या पक्षाकडून मी जिद्द आणि चिकाटी शिकलो.पक्षाची घरटी उध्वस्त करण्यासाठी अनेक वादळं येतात, पण तरीही पक्षी पुन्हा पुन्हा आपलं घरट बनवतात.. 2023मध्ये प्रकाशित झालेल्या ‘ABC डायरी ’ह्या माझ्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच सुगरण पक्षाचा फोटो आहे कारण मी ह्या पक्षाकडून खूप काही शिकलो त्या पुस्तकात जवळपास 6 प्रकरणे ह्या पक्षावर आहेत.. निसर्ग खूप काही शिकवत गेला आणि त्यातूनच माझं साहित्य समृद्ध होत गेलं.. ” ✍️ अनिल भगवान चव्हाण (ABC ) ( लेखक,कवी, शिक्षक ) लिखाण दि. 28ऑगस्ट 2026 ✍️संपर्क - @ABCs1432

“स्ञियांच रक्षण करनारा खरा भाऊ शिक्षण स्वातंत्र्य देऊन सन्मानान रहाण्यास शिकविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सर्व
स्ञियांच रक्षण करनारा खरा भाऊ शिक्षण स्वातंत्र्य देऊन सन्मानान रहाण्यास शिकविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी सर्व बहीणीचे नम्र अभिवादन.. 🙏

मैत्री कोणाशी करावी? नक्की वाचा...🙏
+2
मैत्री कोणाशी करावी? नक्की वाचा...🙏

सूर्यदेव कधी आपलं उगवण्याचं मूर्त बघत नसतो किंवा तो मावळन्यासाठी कधी कोणाची वाट पाहत नसतो तो फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आपल
सूर्यदेव कधी आपलं उगवण्याचं  मूर्त बघत नसतो किंवा तो मावळन्यासाठी कधी कोणाची वाट पाहत नसतो तो फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडत असतो त्याच्यावर पण काळे ढग दाटून येतात तर कधी त्याला ग्रहण सुद्धा लागत मात्र तो अंधारलेल्या जगाला प्रकाशमान करण्याचं काम अविरतपणे करत असतो मात्र त्यापासून माणसाने एक प्रेरणा घ्यायला हवी कारण माणसाच्या आयुष्यात पण संकटाचे ढग दाटून येतात आणि अपयशाचे ग्रहण सुद्धा लागत मात्र जी व्यक्ती सातत्यपूर्ण प्रयत्नातून स्वकारात्मक दुष्टीकोण ठेऊन योग्य दिशेने चालत राहतो त्याला नक्कीच यशाच्या प्रकाश्यात उजळून निघता येते!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

शिक्षणाच बाजारीकरण आणि दिशाहीन पालक नक्की वाचा 🙏
+1
शिक्षणाच बाजारीकरण आणि दिशाहीन पालक नक्की वाचा 🙏