ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 156
订阅者
+124 小时
-147
-5330
帖子存档
CMO Maharashtra Tweets: पाणीपुरवठा योजनांच्या सक्षमीकरणासाठी सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी 'राज्य ग्रामीण पेयजल धोरण' संदर्भात बैठक पार पडली. राज्यामध्ये कार्यान्वित अनेक पाणीपुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी लक्षात घेता, यापुढे राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यासाठी विभागाने सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. पाणीपुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपांची क्षमता, संपूर्ण योजनेसाठी लागणाऱ्या एकूण युनिट्सची संख्या आदी लक्षात घेऊन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचे धोरण तयार करावे. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणीपुरवठा योजना बंद पडू नये, याची काळजी घ्यावी. केंद्र सरकारच्या निकषानुसार दरडोई दरदिवशी 55 लिटर पाणी पुरविले पाहिजे, यानुसार योजना पूर्णत्वास न्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सर्व ग्रामीण प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी तालुका स्तरावर युनिटची स्थापना करण्यात यावी. या युनिट्समध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सहभाग घेण्यात यावा. पाणीपट्टीच्या वसुलीतून योजनेच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करण्यात यावा. अशा युनिट्सच्या माध्यमातून देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी होईल आणि योजनाही बंद पडणार नाही. ज्या ठिकाणी पाणीकराची कमी वसुली असेल, अशा ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीमधून रक्कम उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तालुका स्तरावर युनिट्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी एजन्सीची सूची तयार करावी. ग्रामसभेच्या ठरावाने या सूचीमधील एजन्सीकडून पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती करावी. या व्यवस्थेमुळे कोणतीही पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीअभावी बंद पडणार नाही. ग्रामीण भागामध्ये पाणीपुरवठा योजनेचा स्रोत हा शाश्वत असला पाहिजे. काही ठराविक कालावधीने पुन्हा नवीन स्रोत शोधून पाणीपुरवठा योजना करण्यात येऊ नये, त्यामुळे आधीच्या योजनेवरील खर्चाचा उपयोग होत नाही. 'व्हीबी जी रामजी' या योजनेतून पाणीपुरवठ्याचे स्रोत सक्षमीकरण करण्यास निधीची उपलब्धता होत आहे, त्यामुळे योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारे पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करण्यात यावे. ज्यामुळे भविष्यात पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. 50 % वर काम पूर्ण झालेल्या पुनर्जोडणी योजनांना निधी देण्यात यावा आणि अशा योजना पूर्ण कराव्यात. जल जीवन मिशन अंतर्गत 100 % काम पूर्ण झालेल्या योजनांची पडताळणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पाणी पुरवठा योजनांचे टप्प्याटप्प्याने सौर उर्जीकरण करण्याचे प्रस्तावित असून एकूण 22,185 योजनाकरिता सौर यंत्रणा उभी करण्याचे प्रस्तावित आहे. जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 11,643 सौर यंत्रणा यापूर्वीच त्यांच्या मूळ अंदाज पत्रकांमध्ये समविष्ट करण्यात आल्या आहेत. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #WaterPolicy #RuralDrinkingWater

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Empowering Women, Strengthening Agriculture! Chaired a meeting regarding the 'Maharashtra Women Farmers’ Empowerment Bill, 2026' at Varsha Bungalow in Mumbai, today. Reviewed the proposed Maharashtra Women Farmers Empowerment Bill, 2026, which will be introduced in the upcoming Monsoon Session to provide women farmers with independent legal recognition as farmers and strengthen their place in Maharashtra’s agricultural ecosystem. Across Maharashtra, women contribute more than 81% of the workforce in agriculture. This legislation seeks to ensure that women engaged in agriculture and allied activities receive recognition, rights and opportunities. Directed that the final draft of the Bill be prepared after incorporating all relevant suggestions, with a focus on improving access to credit, technology, markets, crop insurance, agricultural subsidies and social security benefits. The proposed framework will also support women engaged in allied sectors, along with landless farmers, tenant farmers, agricultural labourers and migrant agricultural workers. This legislation will be a significant step towards providing lakhs of women farmers with an independent identity, rights and opportunities, while setting a new benchmark for gender equality in the agricultural sector. DCM Sunetratai Pawar, Minister Dattatray Bharane ji, MoS Adv. Ashish Jaiswal, Chairperson of the M. S. Swaminathan Research Foundation (MSSRF), Dr. Soumya Swaminathan ji, senior officials and other dignitaries were present. #Maharashtra #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2065462622032629891?s=20

CMO Maharashtra Tweets: राज्यातील महिला शेतकऱ्यांना मिळणार वैधानिक ‘शेतकरी’ दर्जा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026' संदर्भात बैठक पार पडली. राज्यातील महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026’ पावसाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन त्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला चालना मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील कृषी क्षेत्रात 81% हून अधिक महिलांचा सहभाग आहे. कृषी योजनांचा लाभ महिलांना मिळावा यासाठी जमिनीची मालकी ही अट असल्याने मोठ्या संख्येने महिला शेतकरी योजनांपासून वंचित राहतात. कुटुंबाच्या किंवा सामुदायिक जमिनीवर शेती करणाऱ्या महिला, तसेच मत्स्यव्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, वनउपज संकलन यांसारख्या पूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांनाही शेतकरी म्हणून मान्यता मिळत नाही. या पार्श्वभूमीवर हे विधेयक तयार करण्यात आले आहे. सर्व सूचनांचा विचार करून विधेयकाचा अंतिम मसुदा तयार करा. कृषी क्षेत्रातील महिलांना ‘शेतकरी’ म्हणून वैधानिक मान्यता देणे, त्यांच्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणे, कर्ज, तंत्रज्ञान, बाजारपेठ व विविध सेवा महिलांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश असावा, पारंपरिक शेतीबरोबरच पशुपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, बागायती, फुलशेती, मशरूम उत्पादन, कृषी वनीकरण, वनउपज संकलन असे विविध उपक्रम तसेच भूमिहीन शेतकरी, भाडेकरू शेतकरी, शेतमजूर, चराई व्यवसाय करणारे आणि स्थलांतरित कृषी कामगार यांचाही यामध्ये समावेश करावा. महिलांना राज्य शासनाच्या कर्ज योजना, कृषी अनुदाने, बियाणे, खते, पीक विमा, विस्तार सेवा, बाजारपेठ सुविधा, वाहतूक, साठवणूक आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळू शकेल अशी डिजिटल प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी सर्व अभ्यास करावा. तसेच महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार करणे या सर्व बाबींचा समावेश करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’ स्थापन करणे, विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीची यंत्रणा यांचा देखील अभ्यास केला जावा. जिल्हा आणि तालुका व गावस्तरापर्यंत मजबूत यंत्रणा असली पाहिजे. या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय देखरेख समिती असावी जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियमित परीक्षण केले जाऊ शकेल. हे विधेयक राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून कृषी क्षेत्रात लिंगसमानतेच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या (MSSRF) अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the 'Maharashtra Women Farmers’ Empowerment Bill, 2026'. DCM Sunetra Ajit Pawar, Minister Dattatray Bharane, MoS Adv. Ashish Jaiswal, Chairperson of the M. S. Swaminathan Research Foundation (MSSRF) Dr. Soumya Swaminathan, senior officials and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, 2026' संदर्भात बैठक. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशनच्या (MSSRF) अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'महाराष्ट्र महिला किसान सशक्तिकरण विधेयक, 2026' के संदर्भ में बैठक। इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन (MSSRF) की अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, वरिष्ठ अधिकारी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕟4.25pm | 12-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | संध्या. ४.२५ वा. | १२-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Honouring the Legacy of Late Annasaheb Chudaman Patil ji ! Glad to unveil 'Ajinkya', the biography of freedom fighter and former MP Late Annasaheb Chudaman Patil ji in Mumbai, today. The most remarkable aspect of this book is its vivid portrayal of every chapter of Late Annasaheb Chudaman Patil ji’s life and his relentless struggles. His visionary leadership laid the foundation for numerous institutions across arts, commerce, science, medical education and engineering, thereby democratising education and creating opportunities for every section of society. A true reflection of service, unity and nation-building, his life remains an enduring inspiration and this biography stands as a valuable record of those ideals for future generations. Minister Adv. Ashish Shelar, Minister Jaykumar Rawal, MoS Dr. Pankaj Bhoyar, MLC Amrishbhai Patel, MLC Chitratai Wagh, former MP Vinay Sahasrabuddhe ji, former MLA Kunal Patil, Actor Anupam Kher ji, Actor Saurabh Shukla ji and other dignitaries were present. #Maharashtra #Mumbai #Biography https://x.com/Dev_Fadnavis/status/2065427867346079865?s=20

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting regarding the 'State Rural Drinking Water Policy'. Minister Gulabrao Patil, MoS Adv. Ashish Jaiswal and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'राज्य ग्रामीण पेयजल धोरण' संदर्भात बैठक. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'राज्य ग्रामीण पेयजल नीति' के संदर्भ में बैठक। इस अवसर पर मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕞 3.35pm | 12-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | दु. ३.३५ वा. | १२-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #WaterPolicy #RuralDrinkingWater

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: A Champion Who Inspired Generations! Deeply saddened by the demise of Jaspal Rana ji, one of India's most celebrated shooting legends. Through his extraordinary achievements, he elevated India's stature in the world of shooting and emerged as a true icon of Indian sports. Beyond his accomplishments on the range, he dedicated himself to mentoring young athletes, shaping future champions through his guidance and commitment. His legacy of excellence, discipline and selfless service to the sporting community will remain a lasting source of inspiration for generations to come. I offer my heartfelt condolences to his family, friends and the entire sporting fraternity during this difficult time. ॐ शान्ति 🙏

CMO Maharashtra Tweets: 'अजिंक्य’: स्व. अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या कार्याचा प्रेरणादायी दस्तावेज... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे स्वातंत्र्यसेनानी, माजी खासदार स्व. अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या ‘अजिंक्य’ या जीवनचरित्राचे प्रकाशन केले. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, स्व. अण्णासाहेब चुडामण पाटील यांनी धुळे जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे नेतृत्व करत उत्तुंग कार्य केले. या जीवनचरित्राच्या माध्यमातून चुडामणअण्णा यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. समाजामध्ये जे लोक काही मानकं प्रस्थापित करतात, आदर्श निर्माण करतात, अशा लोकांना कायम स्मरणात ठेवले पाहिजे. स्व. अण्णासाहेब चुडामण पाटील यांनी शिक्षण, सहकार आणि विविध क्षेत्रांत अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक आंदोलनांमध्ये घेतलेल्या सक्रिय सहभागातून त्यांची देशभक्तीची भावना दिसून येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार अमरिश पटेल, आमदार चित्रा वाघ, माजी खासदार विनय सहस्रबुद्धे, माजी आमदार कुणाल पाटील, अभिनेते अनुपम खेर, अभिनेते सौरभ शुक्ला व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Biography

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: अपराजित, अजिंक्य योद्धा म्हणून स्व. अण्णासाहेब चुडामण पाटीलजी सातत्याने निवडणुकीत निवडून आले. अपराजित, अजेय योद्धा के रूप में स्व. अण्णासाहेब चुडामण पाटील जी लगातार चुनाव में जीतकर आते थे। (स्व. अण्णासाहेब चुडामण पाटील यांच्या ‘अजिंक्य’ या जीवनचरित्राचे प्रकाशन | मुंबई | 12-6-2026) #Maharashtra #Ajinkya #Biography

photo content