Devendra Fadnavis
Відкрити в Telegram
4 156
Підписники
Немає даних24 години
-17 днів
-4730 день
Архів дописів
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Empowering Rural Maharashtra: Honouring Excellence at Gramvikas Puraskar-2026
Glad to attend the ‘Gramvikas Puraskar-2026’, organised by the RD Foundation on the occasion of the 80th birthday of former Minister Ranjeetbabu Deshmukh. Remembered his contribution in bringing coordination and discipline while enforcing various schemes as Rural Development Minister. Awarded various villages and organisations for their exceptional contributions to education, sanitation, healthcare and more.
Public participation is important for rural development. The success of programs like Jalyukt Shivar, which significantly boosted agricultural productivity, is a testament to the power of collective action. The villages awarded today serve as inspiring benchmarks for what can be achieved through community involvement.
Furthermore, the government of Maharashtra is integrating AI into agri-services, scaling water conservation efforts and utilising technology for waste management and infrastructure to transform every village. Together, through shared responsibility and government support, we are building a more resilient and self-reliant rural Maharashtra.
Minister Chandrashekhar Bawankule, Minister Jaykumar Gore, MLA Dr. Ashish Deshmukh and other dignitaries were present.
#Maharashtra #Nagpur #GramVikasPuraskar2026
https://x.com/Dev_Fadnavis/status/2060394822331191752?s=20
4 156
CMO Maharashtra Tweets:
लोकसहभाग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामविकासाला नवी दिशा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ‘आर. डी. फाउंडेशन’ आयोजित ‘ग्रामविकास पुरस्कार-2026’ वितरण समारंभ पार पडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माजी मंत्री रणजीत देशमुख यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्र, विदर्भ आणि नागपूरमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी जलसंधारण तसेच विविध योजनांमध्ये सुसूत्रता आणि शिस्त आणण्याचे काम केले. आपल्या राजकीय कारकिर्दीत राजकीय फायदा किंवा नुकसान न पाहता त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. शिक्षण, सहकार, ग्रामविकास आणि जलसंधारण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य पथदर्शी असून त्यांचा हा सत्कार या जिल्ह्याने घडवलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा गौरव आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज विविध ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य केंद्रे आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. लोकांनी गाव परिवर्तनाचा निर्धार केला तर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमधून निधी आणि सुविधांची कोणतीही कमतरता भासणार नाही. सध्या राज्य सरकार विविध अभियानांच्या माध्यमातून अनेक गावांना प्रेरित करून स्वच्छता, जलसंधारण आणि शेती क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचे काम करत आहे. जलयुक्त शिवार योजना लोकसहभागामुळेच यशस्वी ठरली. ग्रामस्थांनी श्रमदान करत अनेक गावे जलयुक्त व दुष्काळमुक्त केली, ही आनंदाची बाब आहे.
केंद्र सरकारकडून ‘विकसित भारत-जी राम जी’ योजना सुरू करण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून जलसंधारणावर विशेष भर देण्यात येत आहे. जलतारा स्ट्रक्चर्सच्या माध्यमातून कोरडवाहू भागही जलयुक्त करण्याचे काम करण्यात येत आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरला पाहिजे, कारण जलसंधारणामुळे भूजल पातळी वाढते आणि त्यातून मोठे परिवर्तन घडू शकते, असे झाल्यास कोणताही भाग दुष्काळग्रस्त राहणार नाही. जलयुक्त शिवार योजनेनंतर अनेक गावांमध्ये आता तीन-तीन पिके घेतली जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य सरकार शेती क्षेत्रासह ग्रामविकास आणि इतर विविध क्षेत्रांत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून दर्जेदार सेवा देण्यासाठी कार्यरत आहे. शेतीमध्ये एआयचा वापर सुरू झाला असून महाराष्ट्र सरकारने ‘महा-विस्तार’ ॲप सुरू केले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना एआयच्या सहाय्याने शेतीसंदर्भातील माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. आशिष देशमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #GramVikasPuraskar2026
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
