5 223
Подписчики
-424 часа
-157 дней
-7730 день
Архив постов
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
तुम्हाला स्पर्धेची भीती वाटतेय, ‘माझं होईल का?’ हा प्रश्न पडतोय, but तुम्ही कमजोर नाही. उलट तुम्हाला तुमच्या Dream chi काळजी आहे म्हणून ही भीती वाटतेय.
पण एक चूक करू नका—आजच्या दिवसाचा अभ्यास करताना उद्याच्या निकालाचा विचार करू नका. ‘माझं Selection होईल का?’ हा प्रश्न आज तुमच्या हातात नाही. पण ‘आजचा Target मी पूर्ण करणार का?’ हा प्रश्न पूर्णपणे तुमच्या हातात आहे.
तुमच्यासमोर हजारो विद्यार्थी आहेत, हे खरं आहे. पण तुम्हाला हजारो विद्यार्थ्यांशी आज स्पर्धा करायची नाही. आज फक्त कालच्या स्वतःशी स्पर्धा करायची आहे. कालपेक्षा आज एक topic चांगला समजला, 20 प्रश्न जास्त सोडवले, एक चूक कमी केली—तर तुम्ही पुढे चाललात.
आणखी एक गोष्ट—कधी एखादा दिवस खराब गेला, अभ्यास झाला नाही, Target पूर्ण झाला नाही, तर स्वतःला अपयशी समजू नका. एक खराब दिवस म्हणजे खराब तयारी नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा.
स्पर्धा परीक्षा ही फक्त हुशार विद्यार्थ्यांची परीक्षा नाही. सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचीही परीक्षा आहे. खूप हुशार विद्यार्थी मध्येच थांबतात आणि सामान्य विद्यार्थी सातत्याने पुढे जातो—आणि शेवटी त्याचं Selection होतं.
म्हणून आत्ता Selection चा विचार थोडा बाजूला ठेवा. माझं काम तुम्हाला योग्य दिशा देणं आहे आणि तुमचं काम रोजचा छोटासा Target प्रामाणिकपणे पूर्ण करणं आहे. आपण रोज एक पाऊल पुढे जाऊ.
आणि हो—कधी मन खूप खचलं, अभ्यास करावासा वाटला नाही, ‘आपल्याकडून होणार नाही’ असं वाटलं, तर ते मनात ठेवू नका. मला सांगा. कारण या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात.
आपल्याला आत्ता फक्त एकच गोष्ट करायची आहे—आजचा दिवस जिंकायचा. उद्याचा विचार उद्या करू.
Selection ची चिंता नंतर करू; आजचा Target आधी पूर्ण करू.” 30 aug 2026 रोजी आपले इतिहास आणि अर्थशास्त्र target संपेल ,1 sep 2026 पासून पुढचे टार्गेट सुरू राहतील ..Mentor : ajit patil 9764786541
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
कालपासून पेपरफुटीच्या बातमीमुळे तुमच्यापैकी अनेक जण tension आहात,
एक गोष्ट मनापासून समजून घ्या…
पेपरफुटीची बातमी आली म्हणून तुम्ही एवढे निराश होऊ नका.
कारण पेपर फुटला म्हणजे तो पेपर महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात गेला, असं अजिबात नाही.
काही मोजक्या लोकांनी गैरमार्गाचा प्रयत्न केला असेल, काहींच्या हातात पेपर गेला असेल… पण लाखो विद्यार्थी आजही प्रामाणिकपणे अभ्यास करत आहेत आणि आपली स्पर्धा त्यांच्याशीच आहे.
आणि गैरमार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे लोक कायम पुढे जातीलच असं नाही.
आज नाही तर उद्या ते पकडले जातातच .
व्यवस्था त्यांच्यावर कारवाई करणारच .
त्यांना त्यांच्या चुकीची किंमत मोजावी लागेल.
पण तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा—
काही मोजक्या चुकीच्या लोकांमुळे आपण आपलं स्वप्न का सोडायचं?
आजही हजारो जागांसाठी हजारो विद्यार्थी अभ्यास करत आहेत.
आजही प्रामाणिक विद्यार्थ्यांकडे संधी आहे.
आणि उद्या संधी आली, तेव्हा तयार कोण असणार?
जो आज भीतीने अभ्यास सोडून देईल तो नाही…
तर जो आजही शांतपणे अभ्यास करत राहील तो!
म्हणून पेपरफुटीची बातमी ऐकून तुमच्या मनात जर विचार आला असेल—
“मला MPSC करायचीच नाही…”
तर माझं एकच सांगणं आहे—
असा निर्णय आत्ताच घेऊ नका.
तुम्ही अजून सुरुवात केली असेल, तर तुमचं स्वप्न तर आत्ताच सुरू झालं आहे.
तुम्ही काही वर्षांपासून अभ्यास करत असाल, तर तुमची एवढ्या वर्षांची मेहनत एका घटनेमुळे फेकून देऊ नका.
आपण आपला मार्ग बदलणार नाही.
आपण आपली मूल्यं बदलणार नाही.
आपण गैरमार्ग स्वीकारणार नाही.
आपण फक्त एकच गोष्ट करणार—
अभ्यास वाढवणार.
तयारी मजबूत करणार.
आणि जेव्हा संधी येईल, तेव्हा स्वतःच्या गुणवत्तेवर ती मिळवणार.
लक्षात ठेवा—
गैरमार्गाने जाणारे काही लोक तुमच्या स्पर्धेत असतीलही…
पण तुमच्या स्वप्नाचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत.
तुमच्या स्वप्नाचा निर्णय तुमची मेहनत घेईल.
कारण काही मोजक्या लोकांनी चुकीचा मार्ग निवडला म्हणून
हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांनी आपला योग्य मार्ग सोडायचा नसतो.
आपण लढणार…
प्रामाणिकपणे लढणार…
आणि आपल्या हक्काची संधी मिळवणार.
तुमचं MPSCचं स्वप्न अजूनही तितकंच जिवंत आहे.
ते कोणाच्याही चुकीमुळे संपवू नका. ❤️
तुमचा मित्र Mentor:ajit patil 9764786541
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
पेपर विकले जात असतील, तर परीक्षा घेण्याचा हा सगळा दिखावा कशासाठी?
एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आपल्या आई-वडिलांच्या कष्टाच्या पैशातून पुस्तकं घेतो.
दिवस-रात्र अभ्यास करतो.
मैत्री, मौजमजा, झोप आणि अनेक वर्षांचं आयुष्य बाजूला ठेवून एका सरकारी नोकरीच्या स्वप्नासाठी झगडतो.
आणि जर दुसरीकडे पैशांच्या जोरावर प्रश्नपत्रिका मिळत असतील, तर त्या मुलाच्या मेहनतीचं काय?
त्याने अभ्यास करायचा कशासाठी?
त्याने प्रामाणिकपणे परीक्षा द्यायची कशासाठी?
त्याने स्वतःवर आणि व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा तरी कशासाठी?
पैसा देऊन पेपर मिळवणाऱ्यांसाठी जर व्यवस्था मोकळी आणि मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच सगळी परीक्षा असेल, तर हा अन्याय नाही का?
ही केवळ पेपरफुटीची घटना नाही.
हा हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर झालेला घाला आहे.
ज्यांच्या घरात दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष आहे, ते विद्यार्थी वर्षानुवर्षे तयारी करत आहेत.
आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी जर परीक्षा व्यवस्थेलाच आपल्या मुठीत घेतलं असेल, तर ही स्पर्धा राहिली कुठे?
सरकारी नोकरी विक्रीसाठी नाही.
प्रश्नपत्रिका विक्रीसाठी नाही.
आणि विद्यार्थ्यांची स्वप्नं तर अजिबातच विक्रीसाठी नाहीत.
आता वेळ आली आहे—
फक्त चौकशीच्या घोषणा नकोत. दोषींना शोधा. कारवाई करा. व्यवस्था स्वच्छ करा.
कारण शांत बसलेला प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थी आज एकच प्रश्न विचारतोय—
“माझी चूक काय होती?
माझ्या बापाकडे पैसे नव्हते आणि मी फक्त प्रामाणिकपणे अभ्यास केला… एवढीच?”
मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका.
कारण हा प्रश्न आता एका परीक्षेचा नाही…
हा महाराष्ट्रातील सामान्य विद्यार्थ्याच्या भवितव्याचा प्रश्न आहे.
जास्तीत जास्त पोस्ट वायरल करून अन्यायकारी यंत्रणे ला विरोध करा
@concept_clear_mentorship
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
या अगोदर सुद्धा पेपर फुटले होते का याची संपूर्ण चौकशी करणे गरजेचे आहे... ब्रेकअप मुळे जर ही माहिती बाहेर आली असेल तर यामध्ये शासन किंवा यंत्रणेचा कोणताही रोल नाही पेपर फुटी बाहेर काढण्याचा... म्हणजे या अगोदर सुद्धा अशी प्रकरणी पचवली गेली असणार... सध्या एका पेपरची सुरक्षा करता येत नसेल तर माझा तर सरळ असं मत आहे की ही परीक्षा घेण्याचे ढोल बंद करून सरळ पदांची लिलाव करा...म्हणजे किमान शेतकरी आणि गरीबाची विद्यार्थी इतर गोष्टींमध्ये तरी आपलं भलं करण्याचा प्रयत्न करून आपली उमेदीची वर्षानुवर्ष वाया घालवणार नाही..
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
कसा फुटला पेपर?
MPSC चे विश्वेश्वर नकाते याने औषध निरीक्षक चाळणी परीक्षेचा समन्वय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना तज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका 294 प्रश्नांचा एक संच चोरी केला.
संबंधित संच हा त्यांनी आयोगाचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांना 19 मार्च रोजी कार्यालयाच्या पार्किंग मध्ये जाऊन दिला.
तोच संच लेंडवे यांनी MPSC चे कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांना त्याच पार्किंगमध्ये सुपूर्द केला.
20 मार्च रोजी MPSC चे कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्याकडून प्रवीण पाटील यांनी त्याच इमारतीच्या पार्किंगमध्ये जाऊन संबंधित प्रश्नपत्रिका स्वीकारली.
या बदल्यात प्रवीण पाटील यांनी गोपाळ मराठी याला पाच लाख रुपये दिले.
पुढे ती प्रश्नपत्रिका अमृत पाटील यांच्या नाशिक मधील पाथर्डी फाटा येथे असणाऱ्या निवासस्थानी जाऊन अमृत पाटील आणि त्यांची कन्या ऋतुजा पाटील यांना दिली.
संबंधित पेपर आपल्याकडे आला असल्याची माहिती ऋतू जाणे आपला प्रियकर गौरव उर्फ लोकेश पाटील याला व्हाट्सअप द्वारे दिली.
संबंधित प्रश्नसंच मधील अनेक प्रश्न हे परीक्षेत विचारले गेल्याच स्पष्ट आहे
गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं आहे. मात्र निकाल येईपर्यंत दोघांचंही ब्रेकअप झालं होतं.
ऋतुजा पाटील हिची गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर निवड झाली.
ब्रेकअपनंतर गौरवने MPSCला पेपर लीक झाल्याची माहिती देण्याचा निर्णय घेतला.
गौरव पाटील उर्फ लोकेशने ऋषिकेश गांगुर्डेशी संपर्क साधून त्याच्याकडे लीक झालेल्या पेपरची कॉपी असल्याचंही सांगितलं.
ऋषिकेश गांगुर्डे हा कंटेंट क्रियेटर असून परीक्षा संदर्भात कंटेंट तयार करतो.
पुढे लोकेश उर्फ गौरव पाटील याने संपूर्ण प्रकार एमपीएससीला ईमेल द्वारे कळवलं मात्र काहीच दिवसात त्याने ही मस्करी केली होती असं तो म्हणाला
या प्रकरणात MPSCशी संबंधित तीन अधिकाऱ्यांची नावं समोर आली आहेत. विश्वेश्वर नकटे, सहायक कक्ष अधिकारी, गोपाल मराठे आणि अभिजीत लेंडवे, अवर सचिव, MPSC अशी त्यांची नावं आहेत. या अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे. या प्रकरणात एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गौरव पाटीललाही आरोपी करून अटक करण्यात आली आहे, तर ऋतुजा पाटीलला सध्या अटक करण्यात आलेली नाही.
संभाव्य आरोपींची भूमिका समोर
परीक्षेच्या दोन दिवस आधी पेपर MPSCमधून बाहेर कसा आला? पेपर कोणापर्यंत पोहोचला? 12 लाख रुपयांच्या कथित डीलमध्ये कोणाची भूमिका होती, 5 लाख रुपयांच्या व्यवहाराचा संबंध कोणत्या आरोपींशी आहे आणि या संपूर्ण नेटवर्कमध्ये किती जणांचा सहभाग आहे, याचा क्राईम ब्रांचकडून तपास सुरू आहे. अटक आरोपींच्या चौकशीतून पेपर लीकची संपूर्ण साखळी आणि इतर संभाव्य आरोपींची भूमिका समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. @concept_clear_mentorship
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
एक गोष्ट लक्षात ठेवा… अभ्यासाचा कंटाळा येतोय म्हणजे तुम्ही अभ्यासासाठी बनलेले नाही, असं अजिबात नाही. प्रत्येकाला कधी ना कधी कंटाळा येतो. मलाही माहिती आहे, रोज तेच पुस्तक, तेच विषय, तेच प्रश्न पाहताना मन म्हणतं आज नको करू.
पण इथेच तुमची परीक्षा आहे.
ज्या दिवशी अभ्यास करायची इच्छा आहे त्या दिवशी अभ्यास करणं सोपं आहे. पण ज्या दिवशी अजिबात इच्छा नाही, त्या दिवशी स्वतःला बसवून 2 तास अभ्यास करणं—ही खरी तयारी आहे.
आज 10 तास अभ्यास करण्याचा विचार करू नका.
फक्त पुढची 30 मिनिटं बसूया.
एक छोटा Topic घ्या.
20 प्रश्न सोडवा.
चुका झाल्या तर त्या पाहा.
मग पुढचा निर्णय घेऊ.
तुम्हाला आज पूर्ण syllabus संपवायचा नाहीये; आजचा दिवस वाया जाऊ द्यायचा नाहीये.
आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा—
तुमच्यासारखेच हजारो विद्यार्थी अभ्यास करत आहेत. फरक एवढाच आहे की काही जण कंटाळा आला की पुस्तक बंद करतात आणि काही जण कंटाळा असतानाही पुस्तक उघडतात.
शेवटी यश दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचंच होतं.
चल, आता जास्त विचार करू नकोस. मोबाईल बाजूला ठेव. पुस्तक उघड. पुढची 30 मिनिटं फक्त अभ्यास कर. बाकीचं नंतर पाहू.
तुझं काम फक्त आजचा दिवस जिंकण्याचं आहे.
#Ajitpatil
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
study plan discuss
Sunday, August 23 · 12:30 – 1:30pm
Time zone: Asia/Kolkata
Google Meet joining info
Video call link: https://meet.google.com/dza-zbax-vrw
Or
5 224
+2
https://register.mahaevent.co.in/#/register
*जलसंधारण दिनानिमित्ताने आयोजित ‘महा-वॉकेथॉन’मध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आवाहन*
पुणे, दि. १८ : जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ बनविण्याच्या उद्देशाने २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महा-वॉकेथॉन – रन फॉर वॉटर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील पोलीस परेड ग्राउंड, शिवाजीनगर येथे सकाळी ६ ते ९ या वेळेत हा उपक्रम होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
“माती वाचवा, पाणी वाचवा आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवा,” हा संदेश घेऊन नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. विशेषतः युवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, विविध शासकीय विभाग, उद्योजक, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जलसंधारणाच्या या लोकचळवळीला बळ द्यावे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
join for daily current PDF @concept_clear_mentorship
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
*Only B. Com or M. Com* तुम्ही तयार राहा तुमच्यासाठी पण MPSC एक वेगळा धमाका तयार करू शकते 😍💥
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
कृपया हे खुल्ल पत्र जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आयोगापर्यंत पोहोचलेच पाहिजे 😞🙏🏻👆🏻
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
ग्रुप सी पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेऊन आयोगाने जो अभूतपूर्व गोंधळ सुरू केला आहे... तो आता कुठे जाऊन थांबतो हेच पाहावं लागेल... मराठीत एक छान म्हण आहे... सासू मुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली 😀 @concept_clear_mentorship
5 224
Repost from Concept Clear Mentorship By ajit Sir
Target :1 👆🏻... चला सुरुवात करूया 👍🏻
.मास्टर प्लॅन प्रमाणे मी पहिले टार्गेट शेअर केलेले आहे
. टारगेट नीट वाचून घ्या शब्दनशब्द वाचून घ्या
. सर्वांनी टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा खूप वेळ आहे
. यामुळे तुमचा मुख्यताच अभ्यास नाही तर पूर्वचा शंभर टक्के अभ्यास कव्हर होणार आहे
. आपण आता ऍडव्हान्स स्टेजला सुरू करत आहोत
. बेसिक प्लॅन ज्यांचा चालू आहे त्यांनी तोच चालू ठेवा.
.ह्या एकाच टारगेट मुळे तुम्हाला किती कॉन्फिडन्स येतो हे तुम्हाला समजून येईल पूर्ण केल्यानंतर.....
🙏🏻@ajitsir
