प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱
الذهاب إلى القناة على Telegram
📚 दररोज प्रेरणादायी लेख 💡 सेल्फ इम्प्रूव्हमेंट टिप्स 🌱 व्यक्तिमत्त्व विकास ✨ सुंदर सुविचार आणि मराठी साहित्य 🎯 स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी चॅनेल जॉईन करा. https://t.me/PreranadayiVyaktimatva जीवन खुप सुंदर आहे जीवनाला अजुन सुंदर बनवा. ❤
إظهار المزيد5 859
المشتركون
+524 ساعات
+167 أيام
-1330 أيام
أرشيف المشاركات
रविवार म्हणजे पुढील आठवड्याची तयारी करण्याचा दिवस...📝
मित्रांनो, आठवडाभर आपण खूप व्यस्त असतो. विद्यार्थी शाळा, कॉलेज, ट्युशन आणि अभ्यासात व्यस्त असतात. तर काही जण नोकरी किंवा व्यवसाय करत असतात.
👉🏻 त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण जाते. पण रविवार हा असा दिवस असतो, ज्या दिवशी आपण थोडा आराम करू शकतो आणि स्वतःसाठी वेळ देऊ शकतो. त्यामुळे रविवार फक्त सुट्टीचा दिवस नसून, स्वतःला घडवण्याचा दिवस आहे...
खूप विद्यार्थी रविवार आला की उशिरा उठतात, मोबाईलवर गेम खेळतात, सोशल मीडिया पाहतात किंवा टीव्ही बघण्यात वेळ घालवतात...
👉🏻 थोडा आराम करणे चुकीचे नाही, पण संपूर्ण दिवस वाया घालवणे योग्य नाही. कारण एक रविवार चांगला गेला, तर संपूर्ण आठवडा चांगला जाऊ शकतो...
👉🏻 रविवारी सर्वात आधी मागच्या आठवड्याचा विचार करा... या आठवड्यात मी काय शिकलो? कोणते काम पूर्ण केले? कोणते काम राहिले? अभ्यासात कुठे कमी पडलो?
या प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या. त्यामुळे स्वतःच्या चुका लक्षात येतात आणि पुढच्या आठवड्यात त्या सुधारता येतात...
👉🏻 त्यानंतर पुढच्या आठवड्याचा प्लॅन तयार करा. सोमवारपासून शनिवारपर्यंत कोणती कामे करायची, कोणता विषय किती वेळ अभ्यासायचा, कोणते गृहपाठ पूर्ण करायचे, कोणत्या परीक्षा आहेत, याची यादी तयार करा...
प्लॅन लिहून ठेवला की कामे विसरत नाहीत आणि वेळेचे नियोजन चांगले होते...
👉🏻 रविवार हा नवीन गोष्टी शिकण्याचा दिवसही असू शकतो...शाळेत जे शिकवतात त्याव्यतिरिक्त एखादे नवीन कौशल्य शिका...
उदाहरणार्थ,
कॉम्प्युटर, इंग्रजी, टायपिंग, पुस्तक वाचन किंवा एखादा नवीन विषय. रोज थोडे-थोडे शिकणारा विद्यार्थीच पुढे मोठे यश मिळवतो...
👉🏻 रविवारी आपली अभ्यासाची बॅग तपासा. वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल आणि इतर आवश्यक वस्तू व्यवस्थित ठेवा.
शाळेचा ड्रेस, बूट आणि इतर साहित्य आधीच तयार ठेवा. त्यामुळे सोमवारी सकाळी घाई होत नाही...
👉🏻 फक्त अभ्यासच नाही, तर आपल्या आरोग्याकडेही लक्ष द्या... सकाळी थोडा व्यायाम करा, चालायला जा किंवा मैदानी खेळ खेळा किंवा रोज सकाळी संध्याकाळी मेडिटेशन करा...🧘♂️
निरोगी शरीर असेल तर अभ्यासातही चांगले लक्ष लागते. दिवसभर मोबाईलवर बसण्यापेक्षा एक तास खेळणे जास्त फायदेशीर आहे.
👉🏻 रविवार हा कुटुंबासोबत वेळ घालवण्याचाही दिवस आहे. आई-वडिलांशी गप्पा मारा, घरातील छोट्या कामात मदत करा. घरातील जबाबदाऱ्या समजल्या की आपल्यामध्ये चांगले संस्कार आणि जबाबदारीची भावना तयार होते....
आजकाल मोबाईल हा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा वेळ खाणारा मित्र झाला आहे.
👉🏻 पाच मिनिटे म्हणून मोबाईल हातात घेतला की कधी एक-दोन तास निघून जातात ते कळतही नाही. त्यामुळे रविवारी मोबाईलसाठी वेळ ठरवा आणि उरलेला वेळ स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा...📝
👉🏻 रोज रात्री झोपण्यापूर्वी
To-Do List तयार करण्याची सवय लावा. त्यामध्ये उद्या करण्याचे महत्त्वाची कामे लिहा.
उदाहरणार्थ
गणिताचा अभ्यास, इंग्रजीचे वाचन, प्रोजेक्ट पूर्ण करणे, व्यायाम करणे, पुस्तक वाचणे आणि वेळेवर झोपणे.
एखादे काम पूर्ण झाले की त्यावर ✔ करा. त्यामुळे काम पूर्ण केल्याचा आनंद मिळतो आणि पुढचे काम करण्याची प्रेरणा मिळते...
👉🏻 यशस्वी विद्यार्थी आणि सामान्य विद्यार्थी यांच्यातील मोठा फरक म्हणजे नियोजन.
यशस्वी विद्यार्थी अभ्यासाबरोबर वेळेचे नियोजनही करतात. म्हणूनच त्यांना परीक्षा, स्पर्धा आणि आयुष्यात चांगले यश मिळते...
👉🏻 लक्षात ठेवा, रविवार हा फक्त आराम करण्यासाठी नाही. हा स्वतःला सुधारण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि पुढील आठवड्याची तयारी करण्यासाठी असतो. रविवारी केलेले नियोजन संपूर्ण आठवडा सोपा आणि यशस्वी बनवते...
👉🏻 म्हणून पुढच्या वेळेस रविवार आला की फक्त आज सुट्टी आहे असे म्हणू नका.
स्वतःला एकच प्रश्न विचारा – या रविवारी मी माझ्या भविष्यासाठी काय करू शकतो...??
कारण रविवारी केलेली तयारी, सोमवारी आत्मविश्वास देते आणि संपूर्ण आठवड्याला योग्य दिशा देते...💫
विद्यार्थी मित्रांनो, आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की फीडबॅक द्या...📝
धन्यवाद... 🙏🏻🌹😇
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
परिस्थितीने हरलेल्या माणसाला अपमानाचे शब्द रुतत नाहीत कारण स्वतःच्या परिस्थितीने त्याच्या काळजाला इतक घायल केलं असतं की त्याला नाईलाज खातर समाजाच्या टोमण्यानकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं लागतं तरच मेल्यागतं जगता येईल नाही तर एक दिवस त्याला स्वतःच अस्तित्व कायमचं संपवावं लागेल म्हणून दुसऱ्याला नाव ठेवण्या आधी स्वतःला त्याच्या परिस्थितीत ठेवून बघा मग समजेल की तो कुठल्या वेदना सहन करत आहे तुमचे शब्द कोणाची तरी उमेद बनली पाहिजे दुःखाचे कारण नाही!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
👉🏻 जीवनात प्रत्येक यशस्वी व्यक्तीला अपयश आले आहे. फरक एवढाच की त्यांनी त्यांच्या इमोशन्सना त्यांचे भविष्य ठरवू दिले नाही. त्यांनी त्यांच्या विचारांवर काम केले आणि पुन्हा उभे राहण्याचा निर्णय घेतला...
👉🏻 आपल्या मनाची एक सवय असते. ते सतत विचार करत राहते. जर आपण त्याला नकारात्मक विचार दिले, तर नकारात्मक फीलिंग तयार होईल...
जर सकारात्मक आणि वास्तववादी विचार दिले, तर सकारात्मक फीलिंग तयार होईल.
याचा अर्थ असा नाही की नेहमी आनंदी राहावे किंवा कधीच दुःखी होऊ नये. याचा अर्थ एवढाच की भावना स्वीकारा, पण त्यांचे गुलाम बनू नका...
👉🏻 भावना तुमच्या पाहुण्या आहेत. त्या येतील आणि जातील. पण त्यांना कायमचे घर देऊ नका...
घटना ➡️ इमोशन ➡️ विचार ➡️ फीलिंग ➡️ निर्णय ➡️ कृती ➡️ परिणाम
जर तुम्ही या साखळीतील विचार बदलले, तर पुढची प्रत्येक गोष्ट बदलू शकते.
👉🏻 म्हणून स्वतःच्या भावनांना समजून घ्या. त्यांना नाकारू नका, दाबू नका आणि त्यांच्यापासून पळू नका. त्यांना स्वीकारा, त्यांच्याकडून शिका आणि योग्य विचारांच्या मदतीने त्यांचे रूपांतर सकारात्मक कृतीमध्ये करा.
👉🏻 कारण जीवनात यशस्वी तोच होतो जो इतरांवर विजय मिळवतो म्हणून नाही, तर जो स्वतःच्या मनावर, विचारांवर आणि भावनांवर विजय मिळवतो...💫
आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या... 💞
धन्यवाद... 🙏🏻🌹😇
✍🏻✍🏻 नरेंद्र दिपके
( Coach of Personality Development )
☎️☎️ 9545441697
आपल्या आयुष्याचा खरा रिमोट कंट्रोल
मित्रांनो, जीवनात काय घडेल यावर आपले नियंत्रण नसते पण घटना घडणाऱ्यानंतर आपण काय विचार करतो आणि कशी प्रतिक्रिया देतो यावर मात्र 100% आपलेच नियंत्रण असते...
👉🏻 आजच्या काळात प्रत्येक तरुणाच्या आयुष्यात अनेक आव्हाने आहेत.
शिक्षण, करिअर, स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय, आर्थिक अडचणी, नातेसंबंध, सोशल मीडिया आणि भविष्याची चिंता...
या सर्व गोष्टींमुळे मनावर सतत ताण येत असतो. अनेक वेळा आपण म्हणतो,
📌 आज खूप वाईट वाटत आहे..
📌 मला खूप राग आला आहे
📌 मला भीती वाटते
📌 मी निराश झालो आहे.
पण आपण कधी विचार केला आहे का की आपल्याला नेमके काय होतय....??
याच ठिकाणी इमोशन (Emotion) आणि फीलिंग (Feeling) यांचा फरक समजून घेणे आवश्यक आहे...
👉🏻 अनेक लोक या दोन्ही शब्दांचा एकच अर्थ काढतात. परंतु मानसशास्त्राच्या दृष्टीने या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
हा फरक समजला तर आपण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, चुकीचे निर्णय टाळू शकतो आणि जीवनात अधिक शांत व यशस्वी होऊ शकतो...
📌इमोशन म्हणजे काय..??
👉🏻 इमोशन म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपल्या शरीरात आणि मेंदूमध्ये निर्माण होणारी तात्काळ प्रतिक्रिया.
ही प्रतिक्रिया नैसर्गिक असते. त्यासाठी विचार करण्याची गरज नसते...
आनंद, राग, भीती, दुःख, आश्चर्य अशा भावना काही क्षणात निर्माण होतात. त्या काही सेकंद किंवा काही मिनिटे टिकतात.
याचा अर्थ, इमोशन येणे चुकीचे नाही. प्रत्येक माणसाला इमोशन्स येतात. कोणालाही राग येऊ शकतो, दुःख होऊ शकते किंवा भीती वाटू शकते. कारण इमोशन्स हा आपल्या मानवी स्वभावाचा भाग आहे.
📌 फीलिंग म्हणजे काय..??
👉🏻 इमोशननंतर आपण त्या घटनेबद्दल जो विचार करतो, त्या घटनेचा जो अर्थ लावतो आणि जी भावना मनात जास्त काळ टिकते, तिला फीलिंग म्हणतात.
म्हणजेच इमोशन हा पहिला टप्पा असतो, तर फीलिंग हा दुसरा टप्पा असतो.
एक गोष्ट लक्षात ठेवा
👉🏻 इमोशन आपोआप येते, पण फीलिंग आपल्या विचारांमधून तयार होते.
म्हणूनच एकच घटना दोन वेगवेगळ्या व्यक्तींना घडली तरी त्यांचे आयुष्य वेगळे घडते...
एक उदाहरण सांगतो जेणेकरून तुमच्या लवकर लक्षात येईल...
👉🏻 समजा, रोहित नावाच्या एका तरुणाने एका नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी मुलाखत दिली.
त्याने अनेक दिवस अभ्यास केला, कौशल्य वाढवले आणि पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखत दिली. त्याला खात्री होती की यावेळी नक्की निवड होईल.
काही दिवसांनी कंपनीचा निकाल लागला. रोहितने ई-मेल उघडला आणि त्यात लिहिले होते की त्याची निवड झालेली नाही...
👉🏻 तो काही क्षण शांत बसला. त्याला वाईट वाटले. मन निराश झाले. छातीत जडपणा जाणवला. ही त्याची इमोशन होती. अशी भावना कोणालाही येऊ शकते. यात काहीही चुकीचे नाही...
पण खरी गोष्ट आता सुरू होते.
रोहितने मनात विचार सुरू केले...
तो स्वतःला म्हणाला, मी अपयशी आहे. माझ्यात क्षमता नाही. माझे मित्र पुढे जात आहेत आणि मी मागे पडत आहे. माझ्याकडून कधीच काही होणार नाही...
👉🏻 हे विचार रोज त्याच्या मनात फिरू लागले. त्याचा आत्मविश्वास कमी झाला. त्याने नवीन नोकरीसाठी अर्ज करणे बंद केले. नवीन मुलाखतींची भीती वाटू लागली. हळूहळू त्याला स्वतःबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली. आणि हीच त्याची फीलिंग बनली.
आता दुसरी बाजू पाहूया
👉🏻 जर रोहितने त्या दिवशी स्वतःला असे सांगितले असते
या वेळेस माझी निवड झाली नाही, पण याचा अर्थ मी कायमचा अपयशी नाही. कदाचित माझ्या तयारीत काही कमतरता असेल. मी माझ्या चुका शोधेन, नवीन कौशल्य शिकेन आणि पुन्हा प्रयत्न करेन...
या विचारामुळे त्याने स्वतःवर काम सुरू ठेवले. काही महिन्यांनी दुसऱ्या कंपनीमध्ये मुलाखत दिली आणि यावेळी त्याची निवड झाली.
लक्षात घ्या
दोन्ही ठिकाणी सुरुवातीची इमोशन एकच होती निराशा... फरक फक्त विचारांमध्ये होता.
👉🏻 त्या विचारांमुळे फीलिंग बदलली आणि फीलिंगमुळे कृती बदलली. कृती बदलली म्हणून परिणामही बदलला...💫
👉🏻 घटना आपल्या आयुष्याचा निर्णय घेत नाहीत, तर त्या घडलेल्या घटनेनंतर आपण केलेला विचार आपल्या आयुष्याचा निर्णय घेतो...
म्हणूनच जीवनात इमोशनवर रागावण्याची गरज नाही. त्यांना समजून घेण्याची गरज आहे.
जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा स्वतःला विचारा मी नेमका कोणत्या गोष्टीमुळे रागावलो आहे..??
जेव्हा भीती वाटते, तेव्हा विचारा ही भीती वास्तव आहे का, की माझ्या मनाने तयार केलेली कल्पना आहे..??
जेव्हा दुःख होते, तेव्हा स्वतःला वेळ द्या. प्रत्येक दुःख कायमचे नसते.
हे प्रश्न विचारण्याची सवय लावली की मन हळूहळू स्थिर होऊ लागते.
👉🏻 आज अनेक तरुण एका अपयशामुळे स्वतःला कमी समजू लागतात...
एका नकारामुळे संपूर्ण आयुष्य संपल्यासारखे वाटते. पण सत्य हे आहे की अपयश हा शेवट नसतो. तो फक्त पुढच्या यशाची तयारी असतो.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
