ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
759
Подписчики
+224 часа
+17 дней
-330 день
Архив постов
मी नेहेमीच क्लिन चिट देत नाही...

कथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावरील कारवाईबाबतची माहिती आणि मंगळवार २४ मार्च रोजी सखोल निवेदन करण्याचे विधानसभेला आश्वासन

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घडलेल्या प्रकाराची योग्य चौकशी केली जाईल व त्या आधारे कारवाई केली जाईल

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना देवेंद्रजींनी राज्याच्या प्रगतीचा महत्त्वाचा पैलू अधोरेखित केला…कौशल्य विकास विभागाची सुरुवात करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे

एकच किल्ला देवाभाऊंच्या न्यायाचा बालेकिल्ला

मोफत आणि माफक या दोन तत्वांवर उभं असलेलं स्व. गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर म्हणजे फक्त एक सुविधा नाही, तर प्रत्येक गरजवंताला दिलासा देणारा विश्वास आहे…इथे उपचारासाठी पैशांची अडचण कधीच अडथळा ठरणार नाही, हीच खरी सेवाभावाची ओळख.

पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. योग्य उपचार मिळाले नाहित म्हणून कॅन्सरने वडिलांवर घाला घातला इतरांच्या नशीबी
पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. योग्य उपचार मिळाले नाहित म्हणून कॅन्सरने वडिलांवर घाला घातला इतरांच्या नशीबी ते येऊ नये म्हणून आधी नॅशनल कॅन्सर इन्सिट्यूट आणि आता बहुतांश मोफत चाचण्या करणारे स्व. गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून नवा आदर्श ठेवला आहे.

वडिलांचे नाव द्यायला तयार नव्हते देवाभाऊ...स्व. गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरच्या निर्मितीचा किस्सा नक्की ऐका

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | Healthcare | गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण | नागपूर https://youtu.be/_UnxE3qpQrk

ठाकरे सरकारच्या काळात भोंदू खरातचे गैरप्रकार फोफावले ,आता कारवाईचा फास आवळला!

photo content

खोट्या बाबागिरीचा पर्दाफाश करत अशोक खरात याला अटक केली पुढील तपासासाठी देवाभाऊंनी एसआयटी स्थापन केली.. सनातन धर्मावर आघात करणाऱ्या आणि महिलांची अब्रू लुटणाऱ्या विकृतांना कडक शिक्षा होणारच

आज जगात इतक्या मोठ्या प्रमाणावर युद्ध सुरू असूनही, भारत सरकारने सामान्य माणसाच्या जीवनावर त्याचा कोणताही परिणाम होऊ नये यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यामुळे मला असे वाटते की राहुल गांधी हे केवळ देशाला बदनाम करण्याचा आणि देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत.

महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्या व्यक्तीशी त्यांचा जवळचा संबंध किंवा त्यांनी त्यांना गुरुस्थानी मानलेल आहे. अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या विषयाला न्याय मिळणार नाही आणि म्हणून चाकणकरांनी ते मान्य केल आणि त्यांनी तो राजीनामा दिला.

कोणालाही लोकशाहीमध्ये कोणाच्याही विरुद्ध मोर्चा काढायचा अधिकार आहे पण आपण कशाकरता काढतो हेच त्यांना माहिती नाही हा मुख्य प्रश्न आहे

ममता दीदींच्या मनावर एका प्रकारे सर्व परिस्थितीचा दबाव निर्माण झाला आहे. त्यांना दिसत आहे की त्या निवडणूक हारत आहेत. त्यामुळे त्या दबावाखाली अनेकदा माणूस आपला विवेक गमावतो आणि विवेक गमावल्यानंतर जर कोणी असं काही बोललं, तर त्याला फारसं महत्त्व देऊ नये.

पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी करायची ते पाहू, पहिल्यांदा चौकशी महिलांच्या संदर्भात होईल.

कोणाचा कोणासोबत फोटो असू शकतो? पण ज्यांनी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलवून ४० किलोमीटर दूरून त्यांना पाणी दिलं त्यांना काय शिक्षा द्यायची?आणि मंत्र्यांबद्दल बोलणारे त्यांच्याबद्दल का चूप आहेत? तिथे तोंडाला कुलूप का लागताय, सिलेक्टिव्ह का बोलताय, त्यामुळे काहींना केवळ राजकारण करायचय, आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही आम्हाला महिलांच्या डिग्निटी मध्ये इंटरेस्ट आहे. आम्ही प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही.

खरात यांचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून इंटेलिजन्सच्या आधारावर याचा भांडाफोड करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे मॉनिटरिंग अत्यंत वरिष्ठ स्तरावर सुरू असून स्वतः डीजी (DG) ते पाहत आहेत. नाशिक सीपी आणि एसआयटी (SIT) मिळून हा तपास पूर्ण करत आहेत आणि यात कोणालाही सोडले जाणार नाही. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत असून कोणाकडे पुरावे असल्यास त्यांनी ते द्यावेत, त्यावर कारवाई होईल

नागपूर जिल्हा परिषदेने अतिशय चांगला उपक्रम हातामध्ये घेतलेला आहे, पहिल्यांदा ज्या बसचं उद्घाटन केलंय, ती लाईव्ह एआय (AI) लॅब सारखी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाईल त्या ठिकाणी व्हर्च्युअल रिियालिटी (VR)आणि एआय या दोघांचा उपयोग शिकता येईल. यासोबत थ्रीडी प्रिंटिंग देखील त्याच्यामध्ये आहे.