मराठी व्याकरण - शब्दसंग्रह By अर्जुन शेलार
Open in Telegram
🔸स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. तसेच आयोगाच्या 2011 ते 2019 मधील विविध परीक्षांना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले जाईल. 🔸By-अर्जुन शेलार ( Interviewed by MPSC )
Show moreThe country is not specifiedThe category is not specified
793
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
पावसाळ्यात आभाळात ढगांचा पिसारा फुलतो. या वाक्यातील 'फुलतो' या शब्दाचे व्याकरण चालवा.
सोडावा लागला . हे संयुक्त क्रियापद आहे .
सोडावा हे धातुसाधित तर लागला हे सहायक क्रियापद आहे .
संयुक्त क्रियापद असताना आपण धातू साधित वरून कर्ता शोधत असतो .
जसे की
सोडावा - धातू सोड म्हणून
सोडणार कोण? - तो ✅
मला कर्ता येत आहे .
If द्राविडी प्राणायाम करणे had a face......
# योगीजी 🫡🙏
मराठी भाषा व्याकरण - Online Recorded Batch आपण लवकरच सुरू करत आहोत.
अगदी बरोबर... शक्य झाल्यास व्यवस्थित शब्दात explanation provide करा सर....
#भाषासूत्र, दै.लोकसत्ता
🎯 #संदर्भाने_होणारा_अर्थबदल
व्युत्पत्तीचा शोध घेऊन शब्दांचा नेमका अर्थ स्पष्ट होऊ शकतो, पण कधी कधी संदर्भ बघितल्यावरच शब्दाचा त्या विशिष्ट ठिकाणी असलेला अर्थ लक्षात येतो. वाच्यार्थ, म्हणजे आपण त्या शब्दाचा नेहमी घेतो तो अर्थ एकच असला तरी त्याचा सूचित अर्थ (लक्ष्यार्थ) फार वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ या ओळीत दगड शब्दाचा अर्थ नेहमीचा (म्हणजे वाच्यार्थ) आहे. पण ‘तो नुसता दगड आहे’ म्हणताना दगड शब्दाचा ‘बिनडोक’ हा सूचित अर्थ (म्हणजे लक्ष्यार्थ) आहे. लक्षणा ही एक मोठी शब्दशक्ती आहे.
रोजच्या भाषेत हा अर्थबदल खूपदा होतो. अक्षता म्हणजे आपले साधे तांदूळच असतात,पण त्यांना लग्नविधीत हळद-कुंकू लावले की अर्थबदल होऊन त्यांना वेगळेच पावित्र्य प्राप्त होते. श्रद्धापूर्वक देवापुढे हात जोडले की मगच पाण्याचे तीर्थ होते; एरवी तीर्थ हेही नुसते पाणीच असते. श्रीफळ म्हणजे आपला नेहमीचा नारळच; तो खोवून आमटी-भाजीसाठी आपण वापरतोच; पण एखाद्याचा सत्कार करताना दिला जातो तेव्हाच त्याचे ‘श्रीफळ’ होते. अर्थात, एखाद्या कार्याचा शुभारंभ करताना फोडला जातो तोही नारळच असतो आणि एखाद्याला कामावरून काढून टाकतानाही ‘त्याला नारळ दिला’ असेच म्हटले जाते; पण तो एक भाषाविशेष आहे आणि तोही संदर्भावरूनच कळतो.
उपोषण, उपास आणि लंघन हे तीन शब्द आपण वापरतो. तिन्ही शब्दांनी व्यक्त होणारा मूळ अर्थ एकच- तो म्हणजे न जेवणे. पण संदर्भानुसार तिन्ही शब्दांचा अर्थ किती पालटतो! उपोषण हे राजकीय किंवा सामाजिक विरोध करण्याचे हत्यार आहे; उपास हा धार्मिक कारणांसाठी केला जातो; तर लंघन हे आरोग्याला उपयुक्त म्हणून केले जाते.
आभाळ आणि आकाश दोन्ही तसे समानार्थी शब्द. पण त्यांतून सूचित होणारा वेगवेगळा भाव स्पष्ट करताना शान्ता शेळके म्हणतात,‘भरून येते ते आभाळ आणि मोकळे होते ते आकाश!’ संदर्भामुळे अर्थ कसा बदलतो हे स्पष्ट करताना पु. ल. देशपांडे यांनी एक सुरेख उदाहरण दिले होते. ते म्हणाले होते, ‘मत देते ती जनता आणि दगड मारते ते पब्लिक!’
🖊भानू काळे
==============
संकलक- नितीन अर्जुन खंडाळे
- चाळीसगाव
दिनांक- २८ ऑक्टोबर २०२२
