en
Feedback
महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संघटना, महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य जूनी पेंशन संघटना, महाराष्ट्र

Open in Telegram

महाराष्ट्र राज्यातील 5पाच लाख पेक्षा जास्त NPS ग्रस्त सरकारी कर्मचाऱयांना Telegram channel मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न आहे. कृपया सर्वांनी मदत करावी. https://t.me/MRJPS1 #OPS4Maharastra #VoteForOPS

Show more
2 887
Subscribers
No data24 hours
-67 days
-2330 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
June '25
June '25
+2
in 0 channels
May '25
+5
in 0 channels
Get PRO
April '25
+3
in 0 channels
Get PRO
March '25
+6
in 0 channels
Get PRO
February '25
+4
in 0 channels
Get PRO
January '25
+6
in 0 channels
Get PRO
December '24
+1
in 0 channels
Get PRO
November '24
+9
in 0 channels
Get PRO
October '24
+10
in 0 channels
Get PRO
September '24
+14
in 1 channels
Get PRO
August '24
+37
in 0 channels
Get PRO
July '24
+20
in 0 channels
Get PRO
June '24
+21
in 0 channels
Get PRO
May '24
+14
in 0 channels
Get PRO
April '24
+6
in 0 channels
Get PRO
March '24
+30
in 0 channels
Get PRO
February '24
+13
in 0 channels
Get PRO
January '24
+15
in 0 channels
Get PRO
December '23
+26
in 0 channels
Get PRO
November '23
+17
in 0 channels
Get PRO
October '23
+8
in 0 channels
Get PRO
September '23
+7
in 0 channels
Get PRO
August '23
+9
in 0 channels
Get PRO
July '23
+9
in 0 channels
Get PRO
June '23
+9
in 0 channels
Get PRO
May '23
+16
in 0 channels
Get PRO
April '23
+23
in 0 channels
Get PRO
March '23
+137
in 0 channels
Get PRO
February '23
+780
in 0 channels
Get PRO
January '23
+1 809
in 0 channels
Get PRO
December '22
+1 039
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
23 June0
22 June0
21 June0
20 June0
19 June0
18 June0
17 June0
16 June0
15 June+1
14 June0
13 June0
12 June0
11 June0
10 June0
09 June0
08 June0
07 June0
06 June0
05 June0
04 June+1
03 June0
02 June0
01 June0
Channel Posts
2
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
1 190
3
*एकच मिशन, जुनी पेन्शन* ✊🏻✊🏻📚📚✊🏻✊🏻 *महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना पुरस्कृत आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना १ नोव्हेंबर २००५ रोजी नंतर नियुक्त व दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व १ नोव्हेंबर २००५ नंतर टप्याटप्याने १०० टक्के अनुदानावर आलेल्या राज्यातील शिक्षक - शिक्षकेत्तर, राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, याबाबत लक्ष वेधले.* 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 #एकच_मिशन_जुनी_पेन्शन https://www.instagram.com/reel/DD1H80GzOBu/?igsh=MW85M3Qza2hxMzQyNw==
792
4
No text...
1 210
5
अनेक ठिकाणी उमेदवाराची स्वतःची आणि त्याच्या कुटुंबीयांची मते सुद्धा त्या मतदारसंघात पडलेली नाहीत. अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनचे सील तुटलेले आढळले, मशीन बदलेल्या आढळल्या तर अनेक ठिकाणी मतदारांची नावे गायब होती, तर अनेक ठिकाणी मृतकांची नावे घुसडून मतदान केलेले होते.*. *मतदान कसे वाढू शकते, टक्केवारी कशी वाढू शकते, कसे वाढवून देऊ, त्याकरिता किती पैसे लागतील या संदर्भामध्ये काही चॅनेल्सनी स्टिंग ऑपरेशन केले या संदर्भात निवडणूक आयोग किंवा पोलीस किंवा संबंधित विभाग कुठल्याच तक्रारीची दखल का घेत नाही? मतमोजणीच्या ठिकाणी अनेक लोकांनी तक्रारी करूनही त्याची दखल का घेतल्या गेलेली नाही*? *हे संपूर्ण डिजिटल चे युग असतांना मतदानाचे दिवशी २० तारखेला सायं ५ वाजता ५,कोटी ६४लाख ८८ हजार ०२४ म्हणजे ५८. २२ टक्केवारी होती, तर रात्री ११.३० ला ६कोटी ३०लाख ८५हजार ७३२ म्हणजे ६५.२ टक्केवारी होती ती कशी वाढली? एवढेच नव्हे तर २३ तारखेला मत मोजणीच्या दिवशी अजून ९लाख ९९हजार ३५९ मते वाढलीत म्हणजे एकदर दोन वेळची मिळून ७५ लाख ९७ हजार ०६७ अशी एकंदरीत ७.८६% च्यावर कशी मते कशी वाढली? हरियाणा, गुजरात, मध्यप्रदेश अश्या ज्या ज्या राज्यात भाजप सरकार सत्तेवर होते तेथे तेथेच टक्केवारी वाढली आणि तेथेच भाजपा एकतर्फी निवडून कशी आली? आणि ज्या राज्यात भाजप सरकार सत्तेत नव्हते तेथे अशी टक्केवारी का वाढली नाही? *या संदर्भात माजी "केंद्रीय चुनाव आयुक्त" कुरेशी ह्यांनी या संदर्भात अनेक शंका व्यक्त केल्या आहेत ज्या लक्ष्यात घ्याव्याच लागतील आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर सध्याचे केंद्रीय चुनाव आयुक्त म्हणजे "केचुआ" राजीव कुमार ह्यांना द्यावीच लागतील*. *महाराष्ट्राच्या निकालांमुळे सगळेच अवाक झाले आहेत. काय बोलावं कळेनासं झालं आहे. पराभव जिव्हारी लागावा असाच असल्याने सगळ्यांना आणि विशेषतः ज्यांनी खूप परिश्रम घेतले होते त्यांना जसा धक्का बसला आहे, तसाच तो मलाही बसला आहे*. मात्र, *परिस्थिती समजून घेऊन कामाला लागले पाहिजे. सामान्य मात्र प्रामाणिक असे लोक आणि ज्यांना, "जीना यहा मरणा यहा इसके सिवा जाणा कहा " आणि आपण गेल्यावर या देशाचे आणि आपल्या कुटुंबियांचे काय होईल, अशी चिंता ज्यांना असेल अश्या देशप्रेमी लोकांना हे चित्र बदलायचे असेल, तर अगदीच किरकोळ काम करावे लागेल.*. *आज रविवार १ डिसें आहे, तर येणाऱ्या गुरुवारी म्हणजे ५ डिसेंबरला गजानन महाराजांचे नाव घेऊन दुपारी १ ते ३ वाजता केवळ २ तास दंडावर काळ्या पट्ट्या बांधून, हातात जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजीचे, फोटो किंवा पोस्टर घेऊन किंवा गळ्यात तसे फ्लेक्स घालून आणि आपले हात हातात घेऊन मानवी साखळी तयार करून आपापल्या शहरातील गांधी मैदानावर किंवा गांधी पुतळ्याजवळ किंवा हुतात्मा स्मारका जवळ जमा व्हा, कारण ह्यापैकी काही तरी नक्कीच आपल्या गावात असेल, नसल्यास महत्वाचे सार्वजनिक ठिकाणी सर्वांनी ठरवून जमा व्हावे*. *कुठलीही घोषणा नाही, केवळ शांतता आणि शांतता बाळगून हे करा. तरुणांनी त्याचे मोबाईलवर युट्युब लाईव्ह करावे, आणि ते आपल्या गावाचे नाव घेऊन सोशल मीडियावर लाइव्ह करून व्हायरल करावे. जर पोलीस अटकाव करत असतील तर त्यांच्या सोबत शांतपणे बोला, त्याचेही लाईव शूटिंग करा, आणि व्हायरल करा*. *देशाला, जगाला हे समजू द्या की भारतात लोकशाहीचा कसा खून होतोय आणि ती कशी संकटात आहे*! *पोलिसांनी सुद्धा अतिरेक न करता शांततामय प्रदर्शन करणाऱ्या लोकांना अटकाव करू नये, कारण ते सुद्धा लोकशाही, जीला आम्ही वाचवायला निघालोत तिचे घटक आहेत हे विसरू नये. त्यामुळे त्यांनी केवळ शांतता सुव्यवस्था राखण्याचे काम करावे हि विनंती*. *काही शक्यता आपण गृहीत धरूयात, एक तर मला त्यापूर्वी अटक करतील, नेहमी करतात तसे शहरात जमावबंदी कलम १४१ लागू करतील, जे माहिती आहेत की हे जागृत लोक आहेत अश्या लोकांना पोलीस नोटीस देतील, त्याला घाबरायचे काही कारण नाही, हे झाले तर समजून जा की सरकार घाबरले आहे आणि त्यांच्या मनात काळे बेरे आहे*. मात्र म्हणून *घाबरून घरात बसू नका, कारण हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. मी अकोल्याच्या गांधी जवाहर बागेसमोर शांतता आंदोलनात आपली वाट पाहत सामील होणार आहे*. *लोकांना लोकशाही वाचवायची आहे की केवळ घरी कुथत बसायचय? याची हि परीक्षा आहे, सरकार उत्तीर्ण होतय की लोक उत्तीर्ण होतात ते बघूया!* *लेखक: प्रकाश पोहरे* *प्रतिक्रिया देण्यासाठी* 98225 93921 वर *'थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्‌सअप वर पाठवा.' प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.*
1 338
6
शिवसेना (उबाठा) ने लोकसभेपेक्षा कमी जागा लढवल्या. त्या तुलनेत त्यांची २४ लाख मतं कमी होणं समजण्यासारखं होतं. तरी जास्तीची ८-९ लाख मतं कमी झालेली दिसत आहेत. सेना(उबाठा) आणि राष्ट्रवादी(शप) ची काही मतं मित्रपक्षांकडे वर्ग झालेली असू शकतात. राज्यात काही मतं राष्ट्रवादी(शप) कडून अजितदादांकडे गेलेली असू शकतात. *सर्वाधिक पडझड काँग्रेसची आहे. काँग्रेसने लोकसभे इतक्याच जागा लढवल्या आहेत, तरी त्यांची २१ लाख मतं कमी कशी झाली? आणि कुठं गेली आहेत? याचा काँग्रेसने शोध घ्यायला हवा*. यात हिंदुत्वापेक्षा चुकलेले तिकीट वाटप, बंडाळी, आपल्या मतदारांना गृहित धरणे आणि नॉट रिचेबल प्रदेशाध्यक्ष या सगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत का? एका बाजूला भाजपने चालवलेले वोट जिहादचे नॅरेटिव्ह आणि दुसऱ्या बाजूला वंबआ, एमआयएम, अजित दादांनी मुस्लिमांना चुचकारण्यासाठी चालवलेले नॅरेटिव्ह या कात्रीत सापडलेल्या *काँग्रेसने मूग गिळून बसणे पसंत केले की काँग्रेस मधे असलेले भाजपचे "स्लीपर सेल" काम करत होते का ? हेही लक्ष्यात घ्यायलाच हवे*. महाविकास आघाडीने लोकसभेतील आपल्याला मिळालेले बहुमत अजून वाढवण्याकरता तसा फारसा प्रयत्न केलेला नाही हे सुद्धा लक्ष्यात घेणे गरजेचे आहे. त्याकरता त्यांची रणनीती काय होती तेच जाणोत. *लोकसभेत मोदींना मत दिलेल्या पण विधानसभेत उद्धव ठाकरेंना मत देऊ शकतील अशा शिंदे सेनेतील मतदारांना चुचकारणे गरजेचे होते. त्याकरता उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदाकरता जाहीर करणे गरजेचे होते. त्याने हिंदुत्वाचा जो थोडासा प्रचार भाजप ने चालवला तितकाही चालला नसता*. पलीकडच्या बाजूला मुख्यमंत्री कोण हा पेच निर्माण झाला असता कारण सगळ्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते. दुसरी गोष्ट अशी की *सर्वसमावेशक विकासाचे एक व्यापक ग्रँड नॅरेटिव्ह देणे अपेक्षित असताना सगळा प्रचार महायुतीविरोधी फिरत राहिला. ते १५०० रुपये देत आहेत तर आम्ही ३००० रुपये देवू हे सांगणे म्हणजे अकलेची दिवाळखोरी होती* त्या पेक्ष्या स्पष्टपणे राज्य दिवाळखोरीत असतांना १५०० रुपये दिल्या पेक्ष्या *आम्ही कृषी प्रक्रिया उद्योग उभारून कृषी मालाला भाव देवू आणि रोजगार सुद्धा उपलब्ध करून देवू हे सांगणे गरजेचे होते*. लोक टीव्हीवरच्या रोजच्या यांच्या भांडणांना कंटाळले होते आणि त्यांच्यासमोर सकारात्मक अजेंडा, एकत्रितपणे ठेवणे गरजेचे होते. आहे त्यात मश्गूल राहणे आणि *महायुतीच्या न्यारेटिव्ह मधे फसणे आणि गाफील राहणे योग्य नव्हतेच*. लोकसभेत महायुतीपेक्षा माविआला ७ लाख मतं जास्त मिळाल्याने संविधान वाचत नाही. ते सातत्याने वाचवावे लागते. भाजपविरोधी एकवटलेला मोठा मतदार आजही मविआच्या बरोबर ठामपणे उभा आहे. केवळ हिंदुत्वाचे मुद्यावर भाजपबरोबर असलेला *मतदार मविआकडे यायला तयार आहे, त्यांच्या समस्या तितक्याच तीव्र आहेत.* *सोयाबीन, कापूस, आलू, कांदा, काजू, धान कश्या कश्याला म्हणून मागील तीन वर्ष्या पासुन भाव नाही, शेतीतील खर्च वाढलेला आहे, अतिवृष्टी मुळे सोयाबीन पीक बरबाद झालेले आहे, पिकविमा मिळालेला नाही*. *६८ हजार शाळा बंद करायचे ठरले आहे आणि त्यातील १४ हजार शाळा बंद सुद्धा केल्यात, उरलेल्या ५८ हजार शाळा बंद होउ घातल्या आहेत* *आरोग्य सेवांची वाताहत, न झेपणारी महागाई, वाढती बेरोजगारी, राज्यातील सुरु असलेले २० पेक्ष्या ज्यास्त उद्योग गुजरात मधे नेले आणि नवीन येऊ घातलेले डझनभर उद्योग सुद्धा गुजरातला पळविले आहेत.* *राज्यावरील वाढलेले कर्ज, महागाई, बेरोजगारी, हिंदू विरुद्ध मुसलमान भडकावणे, पैश्याचा खेळ करून फोडलेले पक्ष आणि नासवलेले वातावरण, हे आजही ज्वलंत मुद्दे आहेत आणि त्यावरून रान उठवण्याची आजही संधी आहे*. त्याकरता संविधान नुसते हातात घेऊन उपयोग नाही तर *संविधान वाचवू शकेल अशी संघटना बांधणे आणि लोकांत जाणे गरजेचे आहे*. *नव्याने वाढवलेले ६९ लाख मतदार शोधणे आणि त्यातही ४३ लाख महिलांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यांनी हिंदुत्व की संविधान या मुद्द्यावर मत दिलेले नाही. त्यांनी शेतमालाचा कमी झालेला भाव, भूक आणि वाढलेली महागाई विरुद्ध हातात आलेले दीड हजार रुपये यावर मत दिले आहे* ? *लाडक्या बहिणींचे आणि हिंदुत्वाला श्रेय देणे भाजपाला सोयीस्कर आहे, मात्र वाचकांनी ती चूक करू नये*. अनेक मतदारसंघात *पडलेली मते आणि मोजलेली मते यात तफावत आहे. अनेक ठिकाणी मतमोजणी करताना इव्हिएमची बॅटरी ९९ % चार्ज असलेली आढळली आणि त्याच मशीन मध्ये भाजपाला सगळ्यात जास्त मतं मिळालीत, जे हरियाणात सुद्धा झाले, आणि जिथे जिथे डबल इंजिनचे सरकार होते तेथे तेथे हे हमखास झाले*.
797
7
*प्रहार* : रविवार दि. 1 डिसेंबर 2024 लेखक : *प्रकाश पोहरे,* *संपादक, दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश, साप्ताहिक कृषकोन्नती* *दाल मे कुछ काला है या सारी दालहि काली है?* *पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले डॉ. निमिष साने, अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांचे पती परकाला प्रभाकरण, प्यारेलालजी गर्ग आणि अनेक आकडे तज्ञ् , अनेक निवडणूक विश्लेषक, तसेच ध्रुव राठी, अशोक वानखडे, निखिल वागळे, राजू परुळेकर, दीपक शर्मा, अजित अंजुम सारखे शेकडो पत्रकार, असीम सरोदे, विश्वंभर वाघमारे, श्याम मानव सारखे अनेक सामाजिक जाणीव असलेले समाज सेवक, असंख्य राजकीय नेते, एवढेच कश्याला अगदी सत्ताधारी पक्ष्याचे अनेक नेते (अर्थात खाजगीत) महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या विश्लेषणात म्हणत आहेत की निवडणूकीच्या आकडेवारीत आणि मतदानाच्या टक्केवारीत काहीतरी घोळ नक्कीच आहे*. याच वर्षी मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणूकीच्या वेळी महाराष्ट्रात ९.३० कोटी पात्र मतदार होते तर त्या नंतर नोव्हेंबर महिन्यात म्हणजे केवळ ५ महिन्यात विधानसभेच्या मतदानावेळी ९.७० कोटी पात्र मतदार होते, म्हणजे *एकूण ४० लाख मतदार वाढले व मतदानाचा टक्काही वाढला* परिणामी, *जवळपास ६९ लाख मत ह्या विधान सभेच्या निवडणूकित वाढली*. *लोकसभेला एकूण ५.७१ कोटी लोकांनी मतदान केले. विधानसभेच्या वेळी ६.४० कोटीं लोकांनी मतदान केले, म्हणजे ६९ लाख मतदार कसे वाढले? आणि या सगळ्यांनी फक्त भाजप महायुतीलाच कसे काय मतदान केले*? हे सगळेच संशयस्पद आहे. *लोकसभेच्या वेळी २.६३ कोटी महिलांनी मतदान केले होते. विधानसभेच्या वेळी ३.०६ कोटी महिलांनी मतदान केले. म्हणजेच वाढलेल्या ६९ लाख मतांमध्ये महिलांचा वाटा ४३ लाख मतांचा आहे. याचे श्रेय केवळ ‘लाडकी बहीण’ योजनेला देणे चुकीचे आहे*. *आपल्या शेतकरी भावाने, बापाने उत्पादित केलेल्या कुठल्याच शेतमालाला मागील ३ वर्ष्यापासून भाव मिळत नाही, परिणामी घरामध्ये त्याची होणारी तगमग त्यापरिणामी अनेक महिलांनी चिडून बाहेर येऊन महाविकास आघाडीला म्हणजे भाजपा विरोधात मतदान केले ही शक्यता गृहीत धराविच लागेल*. *लोकसभेत महाविकास आघाडीला (सांगलीची अपक्ष जागा धरून) जवळपास २.५५ कोटी मतं होती, ती घटून २.२७ कोटी झाली म्हणजे साधारण २९ लाख मतं कमी झाली आहेत, ती का*? हे सगळेच संशयस्पद आहे. *लोकसभेत महायुतीला जवळपास २.४८ कोटी मतं होती. ती आता ३.१७ कोटी आहेत. म्हणजे महायुतीची साधारण ६९ कोटी मतं वाढली आहेत. म्हणजे एकूण मतदान जे वाढले तितकीच, म्हणजे वाढलेली सगळीच्या सगळी मत महायुतीलाच कशी काय पडलीत*? हे सगळेच संशयस्पद आहे. *काय शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळून ते खूष झालेत म्हणून की* ? *बहिणीला, बायकोला रोजची ५० रुपयाची भीक मिळालीय म्हणून की* ? *आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे आपले "साले " किंवा जावई झालेत त्यामुळे ते आपल्या घरी जेवायला येतील की*? *आपल्याला त्यांच्या घरी जेवायला जाता येईल म्हणून की* ? *मंत्रालयातील अधिकारी आपल्या शेतावर येऊन आपल्या समस्या समजून घेऊन उपाय योजना करतील म्हणून? या सगळ्यां प्रश्नांची उत्तरे कुणीतरी द्यायलाच हवीत*. लाडकी बहीण सारख्या योजनांमुळे शहरी मध्यमवर्गीय मतदार वाढले हे तुणतुणं भाजपने वापरल असे एक वेळ गृहीत धरले तरी हि आकडेवारी जुळत नाहीय. लोकसभेच्या वेळी दुरावलेले ओबीसी मतदार आणि हिंदू अनुसूचित जातींमधला मतदार यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याकडे वळवण्यात महायुती यशस्वी झाली का ? ह्याचा शोध घेतला असता ती सुद्धा शक्यता निकाली निघाली आहे. *मोदी किंवा शहा यांच्या सभांना अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या हे या निवडणुकीच्या काळातील फोटो/ व्हिडीओ वरुन आजही स्पष्ट दिसते, याउलट शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी व अमाप उत्साह होता, मग प्रत्यक्ष मतदानात नेमके उलटे का झाले*? हा सूज्ञांना प्रश्न पडला आहे ! *महाविकास आघाडीत काँग्रेसची २१ लाख आणि शिवसेनेची ३१ लाख मतं कमी झाली आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार) यांची १३ लाख मतं वाढली आहेत. म्हणजे २१+३१ = ५२ वजा १३ म्हणजे ३९ लाख मते कशी कमी झाली*? याचा शोध महाविकास आघाडीने घेतला पाहिजे. मित्रपक्षांचे लोकसभेत उमेदवार नव्हते. त्यांनाही १० लाख मत पडली आहेत. राष्ट्रवादी(शप) ने लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त जागा लढवल्या त्या तुलनेत त्यांची मतं २३-२४ लाखांनी वाढायला हवी होती. ती राज्यातील मतदारांचा महायुतीच्या विरोधातील मूड बघता वाढलेली नाहीत* ? *उलट त्यांना १० लाखांचा फटका आहे*.
629
8
No text...
702
9
No text...
963
10
No text...
1 078
11
📢 *सत्तेच्या राजकीय त्सुनामीत जुनी पेन्शनचे हात अजूनही खंबीर....* 👏 *_प्रथमतः आपल्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन सुद्धा....._* कारण या विधानसभा निवडणुकीत कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्ष आणि जनतेला सुद्धा दाखवून दिले की, कर्मचारी हा सुद्धा सत्ता स्थापनेतील एक घटक आहे, त्याच्या मतदानाला किंमत आहे, त्यांच्या मागणीला किमंत आहे. कर्मचाऱ्यांचे सुद्धा निवडणुकीत मतदार म्हणून एक अस्तित्व आहे. हे या निवडणुकीत आपण सर्वांनी अधोरेखित करून यशस्वी करून दाखविलात.वरकरणी सध्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या हे पचनी पडणार नाही मात्र दूरदृष्टीने बघितले तर याचे भावी दूरगामी परिणाम आपल्या दिसून येतील. निवडणुकीत असे सक्रियरित्या मुद्यावर कार्य करण्याची कर्मचाऱ्यांची ही पहिलीच वेळ आणि प्रयत्न असल्याने काही कमी - अधिक झाले, काही घाबरले , काही शांत बसले, काहींना शक्य झाले तर काहींना जुळून आले नाही. मात्र अनेकांनी खारीचा वाटा उचलला त्यामुळे जुनी पेन्शनचा - पर्यायाने कर्मचाऱ्यांचा एक व्यापक प्रभाव निवडणुकीवर पाडण्यास आपण यशस्वी झालो आहोत. त्यामुळेच..... राज्य विधासभा निवडणुक जरी विविध पक्षामध्ये लढली गेली असली तरी आपण सर्व ती जुनी पेन्शन मुद्याच्या यश व अपयश या भावने पर्यंत घेऊन गेलात... त्यामुळेच अनेकजण 'आपण अपयशी तर नाही झालो ना?' या भावनेने निराशा सुद्धा झाले असतील. मित्रांनो, ही लढाई आपल्या जुन्या पेन्शन मागणीतील फक्त एक आंदोलन होत... आणि आपण ते पूर्णतः यशस्वी केले आहे. आपले ध्येय विशिष्ट पक्षाला सत्तेत आणणे हे नव्हतेच आणि एकट्या कर्मचारी वर्गाला ते शक्यही नाही. त्यामुळे हताश होण्याचे कारण नाही. सत्तेत कोणीही असले तरी आपल्याला आंदोलन करावेच लागनार आणि चळवळ जिवंत ठेवावीच लागनार जो पर्यंत जुनी पेन्शन लागू होणार नाही तो पर्यंत. कारण 10 वर्षापूर्वी ज्यांना जुनी पेन्शन अशक्य वाटत होती त्यांना UPS/GPS पर्यंत आपल्या लढ्याने आणून सोडले आणि पक्षीय जाहीरनाम्यात जुनी पेन्शन विषय घेण्यास भाग पाडले हे अविश्वसनीय यश आहे. हे विसरता कामा नये. मित्रानो, जुनी पेन्शन मुद्दा किंवा संघटना ही कोणत्याही एका पक्षाशी किंवा राजकीय व्यक्तीशी जुळलेली नाही. यापूर्वीही आम्ही हे स्पष्ट केले होते की, जुनी पेन्शन मिळविण्यासाठी आम्ही जे जे शक्य आहे ते ते सर्व करायला तयार आहोत. निवडणुकी पूर्वी प्रथमतः सत्ताधाऱ्यांनी जुनी पेन्शन लागू करावी यासाठी मा. मुख्यमंत्री साहेबांची किमान 5 वेळा आम्ही भेट घेतली मात्र त्यांनी आपली मर्यादा फक्त GPS आणि UPS योजनेपूर्ती असल्याचे अधोरेखित केले. मात्र आपल्याला जश्याची तशी जुनी पेन्शन पाहिजे होती. त्यामुळे आम्हाला अन्य विरोधी पक्षाकडे वळावे लागले. त्यांनी जाहीरनाम्यात जुनी पेन्शन विषय घेतला त्यामुळे आपल्याला त्यांना साथ द्यावी लागली. त्यामुळे पशाचे यश किंवा अपयश हे जुनी पेन्शनचे यश किंवा अपयश असूच शकत नाही. शेवटी आपल्याला मागणी शासनकर्त्या सत्ताधाऱ्यांकडे करावी लागत असते आणि करावी लागणार आहे. सत्तेत कोणीही आले असते तरी त्यामुळे आंदोलन करणे हेच आपले शस्त्र आहे. #voteforOPS मुळे अनेकाला आता जुनी पेन्शन मुद्द्याला सत्ताधारी भाव देणार नाही असे वाटत असेल. मात्र एक लक्षात घ्या. या निवडणुकीत आपण सर्वांनी जुनी पेन्शन आणि कर्मचारी अस्तित्वाला वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहात त्यामुळे जुनी पेन्शनचा लढा हा अधिक सोपा झाला आहे. कारण विदर्भात एक म्हणी आहे 'एका पाण्याने तुरी पिकत नाही' आणि एका निवडणुकीने सत्ता आणि खुर्ची राजकारण संपत नाही. कारण एक रस्ता बंद होतो तेव्हा दुसरे रस्ते सुरु होतात. *पुन्हा यापेक्षा अधिक ताकदीने उभे राहूया...* *_एकच मिशन - जुनी पेन्शन_* राज्याध्यक्ष वितेश खांडेकर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना.
1 344
12
No text...
877
13
No text...
931
14
No text...
1 167
15
No text...
1 060
16
No text...
1 188
17
No text...
984
18
📍 *निवडणूकिबाबत महत्वाची सूचना*📍 *पोस्टल बॅलेट जिल्हातून /जिल्हाबाहेरून अजूनही ज्यांचे आले नाही.त्यांनी व्यक्तिशः जाऊन त्या
📍 *निवडणूकिबाबत महत्वाची सूचना*📍 *पोस्टल बॅलेट जिल्हातून /जिल्हाबाहेरून अजूनही ज्यांचे आले नाही.त्यांनी व्यक्तिशः जाऊन त्याबाबत पोस्टल का आले नाही SDO प्रशासनास विचारना करावी व तसे 📄लेखी निवेदन सुद्धा दयावे कि मला आपण मतदानापासून का वंचित ठेवत आहे व त्याची पोच घ्यावी. संविधानानुसार आपल्याला मतदानापासून कोणीच वंचित ठेऊ शकत नाही.निडर होऊन हे कार्य करा आपला मतदान अधिकार वापरा* *प्रशासनाच्या सुचनेनुसार जिल्हातील/जिल्ह्याबाहेरील आज सर्व ठिकाणी बॅलेट पोहचतील असे सांगितले आहे तरी आज व उद्या मतदान करता येईल* *पण पोस्टल बॅलेट आले नसेल तर लेखी दयाच*📄 ✊🏻 *आधी मतदान, नंतर बाकीचे काम* ✊🏻 *एकच मिशन जुनी पेंशन*
1 019
19
*बाहेरगावी / बाहेरील जिल्ह्यात राहत असलेल्या कर्मचारी बांधवांनो...* तुम्ही तुमचं पोस्टल मतदान केलेले असेलच किंवा 19 तारखे पर्यंत कराल.. पण तुमच्या पत्नीचे मतदान करायला त्यांना 20 नोव्हेंबर ला तुमच्या गावाकडे नक्की पाठवा... कारण तसं झालं नाही तर यावेळी ही महाराष्ट्रभरात आपली जवळपास 3 लाख मतं वाया जाणार आहेत.. होय 3 लाख.. कारण जवळपास प्रत्येक तालुक्यात बाहेरच्या तालुक्यातील किंवा बाहेरच्या जिल्ह्यातील मतदार असलेले किमान 30% कर्मचारी असतात.. आणि मतदान ड्युटी च्या गडबडीत अनेक कर्मचाऱ्यांच्या पत्नी / जोडीदाराचे मतदान होतच नाही, कारण ते मतदानासाठी गावाकडे जातच नाहीत.. आणि यामुळे लाखों मतदान करायचे राहून जाते.. अश्या स्थितीत महाराष्ट्रातील हा आकडा 3 लाखाच्या पुढे जातो.. 3 लाख मतं जर 288 ने विभागली तर प्रत्येक मतदारसंघात सरासरी 1000 मतं.. ही एक हजार मते ही खूप निर्णायक असणार आहेत.. यावेळी आपलं एक एक मत महत्वाचे आहे.. *त्यामुळे आपल्या पत्नीला किंवा मुलांना आज किंवा उद्याच त्यांना गावाकडे मतदानासाठी पाठवण्याची तयारी करून ठेवा..* सोबतच ज्यांच्या इलेक्शन ड्युटी लागलेल्या नाहीत अशा कर्मचाऱ्यांनी जोडीने गावाकडे मतदानासाठी जा.. एकही कर्मचारी किंवा त्याचं परिवार मतदानापासून वंचित राहता कामा नये.. धन्यवाद! एकच मिशन जुनी पेन्शन..
872
20
https://www.facebook.com/share/v/19wzbdWt8X/ जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांचे Vote For OPS बाबत आजचे शेवटचे व अत्यंत महत्वाचे फेसबुक live सुरू झालेले आहे... लवकर जॉईन व्हा, नक्की बघा... 17 नोव्हेंबर 2024, वेळ- संध्याकाळी 6
856