डॉ. शैलेंद्र देवळाणकर
Open in Telegram
🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर https://t.me/skdeolankar https://www.facebook.com/skdeolankar/ http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध https://twitter.com/skdeolankar?s=09
Show more4 680
Subscribers
No data24 hours
-167 days
-5330 days
Posts Archive
दैनिक सकाळ मधील डॉ देवळाणकर यांचा विशेष लेख स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाचा रशिया-युक्रेन युद्धानंतर आणि आखातातील अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगाची भावी व्यवस्था अधिकाधिक संघर्षमय होताना दिसत आहे. आखातामधील अमेरिका-इराण संघर्षाला तीन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. या संघर्षाने जुन्या बहुराष्ट्रवादी जागतिक व्यवस्थेच्या अस्ताची आणि एका नव्या, अधिक अस्थिर जागतिक व्यवस्थेच्या उदयाचे संकेत दिले आहेत. आज जगाकडे पाहिले तर एकाच वेळी अनेक संघर्ष धगधगताना दिसतात. अमेरिका-इराण संघर्ष अद्याप संपलेला नाही; चीन-तैवान तणाव कायम आहे, चीन-जपान संबंध ताणलेले आहेत आणि पाकिस्तान-अफगाणिस्तान वादही मिटलेला नाही. या सगळ्यामुळे परस्पर विश्वास कमी होत असून प्रत्येक देश आपल्या सुरक्षेला आणि राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य देताना दिसत आहे. या नव्या जागतिक व्यवस्थेची तीन प्रमुख वैशिष्ट्ये असतील—परस्पर अविश्वास, वाढता आर्थिक राष्ट्रवाद आणि तीव्र शस्त्रस्पर्धा. त्यामुळे आगामी काळात जग अधिक बहुध्रुवीय तर असेलच; पण त्याचबरोबर अधिक अस्थिर आणि संघर्षमयही असेल.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना ‘मराठवाडा सन्मान पुरस्कार २०२६’ परराष्ट्र धोरण व आंतरराष्ट्रीय संबंधांचे ख्यातनाम अभ्यासक, लेखक तसेच कुशल शिक्षण प्रशासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचा आज संभाजीनगर येथे लोकमत मीडिया समूहातर्फे ‘मराठवाडा सन्मान पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक आणि MSFDAचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉ. देवळाणकर यांनी शिक्षण प्रशासनासोबतच परराष्ट्र व्यवहार, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि सामरिक विषयांवरील लेखन व अभ्यासातून राष्ट्रीय पातळीवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मूळचे संभाजीनगरचे असलेले डॉ. देवळाणकर आज महाराष्ट्रातील एक प्रमुख शिक्षण प्रशासक आणि अभ्यासक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणून होत असलेला हा गौरव निश्चितच अभिमानास्पद आहे.
आजचा रविवार दैनिक पुढारी भारतासमोरील ‘लोन वुल्फ’ आणि ‘व्हाईट कॉलर’ दहशतवादाचे वाढते आव्हान-डॉ शैलेंद्र देवळाणकर
रविवार लोकमत
युद्धबंदी झाली; प्रश्न कायम
- डॉ. शैलेंद्र देवळाणकर
फेब्रुवारीच्या अखेरीस आखातामध्ये निर्माण झालेला संघर्ष १०० दिवसांनंतर तात्पुरत्या स्वरूपात का होईना शांत झाला आहे. ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी आणि विशेषतः भारतासाठी अत्यंत दिलासादायक बाब म्हणावी लागेल. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये चौदा कलमी शांतता करारावर स्वाक्षर्या झाल्या असून स्वित्झर्लंडमध्ये पुढील चर्चा सुरू झाली आहे. या करारामुळे इराणने हॉरमुझच्या सामुद्रधुनीमध्ये लावलेले सागरी निर्बंध आणि नाकेबंदी मागे घेतली आहे. यामुळे तिथून खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि खतांची वाहतूक करणारी जहाजे आता पूर्ववत मार्गस्थ होतील. असे असले तरी या निमित्ताने येणार्या काळात या सामुद्रधुनीवरील भारताचे परावलंबित्व कसे कमी करता येईल आणि आपण या संपूर्ण संकटातून काय बोध घेतला पाहिजे, यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
अमेरिकेच्या नाकेबंदीची मिमांसा आणि परिणाम - डॉ. शैलेंद्र देवळाणकर आखातातील संघर्ष आता एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. हे वळण धोक्याची ठरणार की शांततेचे, याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. पण अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील हा वाद आता अथांग समुद्रापर्यंत जाऊन पोहोचला आहे. किंबहुना, समुद्र हाच आता या संघर्षाचा मुख्य केंद्रबिंदू झाला आहे. २८ फेब्रुवारीला सुरू झालेल्या या संघर्षाने जगाने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल इतकी नाट्यमय वळणे घेतली आहेत . विशेषतः १३ एप्रिलच्या रात्री अमेरिकेने ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’ म्हणजेच हॉर्मुझची समुद्रधुनी ब्लॉक करण्याचा घेतलेला निर्णय धाडसी असला तरी तो तितकाच वादग्रस्त आहे. तसेच ट्रम्प यांच्या या पावलामुळे जागतिक सुरक्षिततेची आणि अर्थव्यवस्थेची चिंता अनेक पटींनी वाढवली आहे.
रविवार लोकमत
आखातामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता दुसर्या महिन्यात प्रवेश केला आहे. आज संपूर्ण जगासमोर एकच कळीचा प्रश्न आहे, तो म्हणजे हा संघर्ष आता शांततेच्या मार्गाने सुटणार की अधिक चिघळत जाणार? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळी विधाने करत असल्याने याविषयीचा संशयकल्लोळ वाढत चालला आहे. तथापि, अलीकडे त्यांनी केलेली विधाने या युद्धाची पुढील दिशा दर्शवणारी आहेत. ट्रम्प यांनी १ एप्रिल रोजी केलेल्या वक्तव्यांमध्ये पुन्हा एकदा विजयाचा दावा करतानाच होर्मुझची सामुद्रधुनी उघडली जाईल, तेव्हाच आम्ही इराणच्या युद्धविरामाच्या विनंतीचा विचार करू. ही सामुद्रधुनी उघडली नाही, तर आम्ही इराणचा विनाश करणं सुरूच ठेवू असे म्हटले आहे. व्हाईट हाऊसच्या ‘क्रॉस हॉल’मधून केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी इराणमधील अमेरिकन लष्कराची मोहीम आता अंतिम टप्प्यात आहे. येणार्या दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणवर इतके भीषण हल्ले करू की, त्यांना पुन्हा अश्मयुगात जावे लागेल, अशा कठोर शब्दांचा वापर केला आहे.
सध्याचे वातावरण हे अत्यंत स्फोटक आहे. आखातातील ठिणगी असो किंवा कोरिया द्विपल्पातील तणाव, यापैकी कोणत्याही घटनेचे रूपांतर मोठ्या वणव्यात होऊ शकते. जगाने इतिहासातून धडा घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाने मानवतेचे जे नुकसान केले, त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल तर जागतिक नेतृत्वाने संयम आणि मुत्सद्देगिरीचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा, आपण अशा विनाशाकडे वाटचाल करत आहोत, जिथून परत येणे अशक्य असेल. 2026-27 हा काळ मानवी इतिहासातील अत्यंत निर्णायक काळ ठरणार आहे, यात शंका नाही.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धातील कारवाई 6 एप्रिलपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे अनेक महत्त्वाची कारणे असल्याचे या लेखातील विश्लेषणात सांगितले आहे. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चांना संधी देणे. ट्रम्प यांनी स्वतः सांगितले की चर्चा सकारात्मक होत असून काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सहमती होण्याची शक्यता आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे होर्मूज सामुद्रधुनीवरील तणावामुळे जगभरात तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव निर्माण झाला. त्यामुळे युद्ध अधिक तीव्र झाल्यास त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात, म्हणून युद्धविरामाचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला. तिसरे कारण म्हणजे अमेरिकेवर मित्रदेशांकडून दबाव होता की इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केल्यास मध्यपूर्वेत मोठे युद्ध भडकू शकते. त्यामुळे अमेरिका सध्या लष्करी दबाव कायम ठेवत असली तरी राजनैतिक तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.
