en
Feedback
❤️शब्द मनाचे❤️

❤️शब्द मनाचे❤️

Open in Telegram

"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना... Contact :- @kailasbobade

Show more
5 952
Subscribers
-424 hours
-37 days
-830 days
Posts Archive
प्रत्येक गोष्ट परिस्थिती नुसार घडत असली तरी तिच्याकडे आपण कुठल्या नजरेतून पाहतो हे मात्र आपल्या मनःस्थितीवर आधारलेलं असतं म्ह
प्रत्येक गोष्ट परिस्थिती नुसार घडत असली तरी तिच्याकडे आपण कुठल्या नजरेतून पाहतो हे मात्र आपल्या मनःस्थितीवर आधारलेलं असतं म्हणून मग परिस्थिती कशी का असेना त्यात आपली मनःस्थिती उत्तम ठेवता आली की झालं राव बाकी आनंदी राहण्यासाठी एक छोटसं कारण पण पुरेसं असतं ना!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

समाजात प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे ते स्वाभाविक पण आहे मात्र प्रसिद्धी ती कुठल्या मार्गाने मिळवायची हे आपल्या हातात
समाजात प्रत्येक व्यक्तीला प्रसिद्धी हवी आहे ते स्वाभाविक पण आहे मात्र प्रसिद्धी ती कुठल्या मार्गाने मिळवायची हे आपल्या हातात असतं कारण प्रसिद्धी ही चांगल्या कर्माने पण मिळते आणि वाईट कर्माने पण मात्र आपण कुठला मार्ग निवडतो यावर प्रसिद्धीचे स्वरूप ठरलेलं असतं कारण हल्ली आपण बघतं आहोत की कोणी चांगल्या नीतीने समजाला जागृत करत आहे तर कुणी समजाला अंधात ठेऊन त्यालाच फसवत राहत मात्र फसवणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात कधीच समाधान नसतं एवढ मात्र निश्चित आहे!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

फळाची अपेक्षा न ठेवता आपले काम करत रहा🙌✌️ #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
फळाची अपेक्षा न ठेवता आपले काम करत रहा🙌✌️ #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache

🌅 " आजचा सुंदर विचार " 1) जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते तेंव्हा, एक जीवन संपते. पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते तेंव्हा, एक जीवन सुरू होते. आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवते. स्वत:वरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका...! 2) माळावरचा सोनचाफा कोणी बघा किंवा न बघा एकटाच फुलतो, बहारतो आपल्या सुवासाने चारी दिशा सुगंधित करतो. पण कुणाचे बघणं न बघणं मनावर घेत नाही. खरं म्हणजे आयुष्य असंच जगावे मनापासून...! •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

🌅 " आजचे सुविचार " 1) एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर, आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. 2) शत्रूकडून गोड वागणूक दिली गेली तर तो दोष मुक्त आहे हे समजले जाऊ नये. 3) तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•    ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

श्री कृष्णाला फक्त एक देव म्हणून पूजन करण हे अंधश्रद्धेचे पहिलं लक्षण मात्र त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवून त्याने दिलेल्या
श्री कृष्णाला फक्त एक देव म्हणून पूजन करण हे अंधश्रद्धेचे पहिलं लक्षण मात्र त्याच्यावर मनापासून श्रद्धा ठेवून त्याने दिलेल्या प्रत्येक संदेशाचा मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण आपलं आयुष्य समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशी भक्ती श्री कृष्णाला पण आवडेलं याची मला पूर्णपणे खात्री आहे ❣️🙏🏻   जय जय राम कृष्ण हरी 🌺🚩🙏🏻 एकमन#लेखक @Ommshelke

🌅 " आजचे सुविचार " 1) मन असलेल्यांनी, मन नसलेल्यांच्या, फार नादी लागू नये. 2) विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते. 3) दुःखात कोणताही निर्णय घेऊ नका. कारण त्या क्षणी सत्य नव्हे तर फक्त भावना बोलत असतात. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

आपण ज्याला नशीब म्हणतो.. ते दुसरं काही नसून आपण घेतलेल्या गोड-कडु निर्णयांची आणि सोसलेल्या वेदनांची बेरीज असते.! #शब्द_मनाचे
आपण ज्याला नशीब म्हणतो.. ते दुसरं काही नसून आपण घेतलेल्या गोड-कडु निर्णयांची आणि सोसलेल्या वेदनांची बेरीज असते.! #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache

🌅 " आजचे सुविचार " 1) आपण मनापासून  इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख आपल्या दारी पाणी भरेल. 2) आपल्या क्षमतांवर संशय घेणाऱ्या लोकांना महत्त्व न देणं ही सुद्धा क्षमता आपल्याकडे असायला हवी. 3) धोका ओळखणं कठीण नसतं पण विश्वासाच्या झाडावर फसवणुकीची फळं कधी लागली, हे समजायला वेळ लागतो. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

जगात प्रत्येकाला असं वाटतं की सर्व काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे मात्र जो व्यक्ती वस्तुस्थिती मान्य करून जगण्याचा प्रयत्न
जगात प्रत्येकाला असं वाटतं की सर्व काही आपल्या मनासारखं झालं पाहिजे मात्र जो व्यक्ती वस्तुस्थिती मान्य करून जगण्याचा प्रयत्न करतो तोच समाधाने राहू शकतो कारण त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की प्रभू श्री रामाला पण वनवास स्वीकारावा लागला तर मग आपण साधी माणसं ना!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

जगायचं अस की त्रास देणाऱ्यांना सुद्धा" फाट्यावर मारलं गेलं पाहिजे ..!😃 #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
जगायचं अस की त्रास देणाऱ्यांना सुद्धा" फाट्यावर मारलं गेलं पाहिजे ..!😃 #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache

🌅 " आजचे सुविचार " 1) निष्पाप भावना आणि निर्मळ मन असेल तर पांडुरंग परमात्मा चराचरात रूप घेतो. 2) काही गोष्टी मनाला का आवडतात याचं उत्तर मनाकडेही नसतं. सगळं लगेच मिळालं असतं. तर अनुभवाची किंमत कधीच कळली नसती. 3) मन नुसतं समुद्रा एवढे असून चालत नाही तर खडकावर आदळून परतणाऱ्या अबोल लाटा सारखी वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

निस्वार्थी भाव माझे निस्वार्थी भावना... तु अज्ञानी माझ्याबद्दल मला तुझ्याशिवाय कोणीच ठाव णा... जिथे मी एकटा असतो मी तिथं तुला
निस्वार्थी भाव माझे निस्वार्थी भावना... तु अज्ञानी माझ्याबद्दल मला तुझ्याशिवाय कोणीच ठाव णा... जिथे मी एकटा असतो मी तिथं तुलाच शोधतो...तुझ्या प्रत्येक आठवणीने माझं काळीज थोडं थोडं खचत...❣️🌹     @Ommshelke

लिहाव वाटत खूप काही पण लिहिता येत नाही जगण्याचा खरा अर्थ शब्दात मांडता येत नाही कारण हल्ली स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप कठीण झ
लिहाव वाटत खूप काही पण लिहिता येत नाही जगण्याचा खरा अर्थ शब्दात मांडता येत नाही कारण हल्ली स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप कठीण झालं राव कारण नीति महंतेचा वसा घेऊन या स्वार्थी दुनियेत फिरता येत नाही!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

राखीचा धागा मनगटावर असो वा नसो, संस्कार तुझ्या रक्तात असू दे, स्त्रीचा सन्मान करणारा प्रत्येक शब्द तुझ्या ओठात असू दे, तुझ्या
राखीचा धागा मनगटावर असो वा नसो, संस्कार तुझ्या रक्तात असू दे, स्त्रीचा सन्मान करणारा प्रत्येक शब्द तुझ्या ओठात असू दे, तुझ्या सावलीत आली की तिची पावलं निश्चिंत व्हावीत, तुझ्या सहवासात प्रत्येक स्त्रीला सुरक्षिततेचा भास असू दे..! @rutuja_writes1203

🌅 " आजचे सुविचार " 1) माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो. 2) माणसाच्या आयुष्यात फक्त दुःखाला काटे असतात असे नाही तर सुखाचे काटेही असतात, जे आपल्यावर जळणाऱ्यांना टोचत असतात... 3) स्वावलंबी जीवन ही यशाची गुरुकिल्ली कारण यात हरलो तरी सुधारण्यासाठी प्रयत्न आणि जिंकलो तर सर्वस्वी यशाचे शिल्पकार आपण स्वतः असतो. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• ❝ ❤️ शब्द मनाचे ❤️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

सूर्यदेव कधी आपलं उगवण्याचं मूर्त बघत नसतो किंवा तो मावळन्यासाठी कधी कोणाची वाट पाहत नसतो तो फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आपल
सूर्यदेव कधी आपलं उगवण्याचं  मूर्त बघत नसतो किंवा तो मावळन्यासाठी कधी कोणाची वाट पाहत नसतो तो फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडत असतो त्याच्यावर पण काळे ढग दाटून येतात तर कधी त्याला ग्रहण सुद्धा लागत मात्र तो अंधारलेल्या जगाला प्रकाशमान करण्याचं काम अविरतपणे करत असतो मात्र त्यापासून माणसाने एक प्रेरणा घ्यायला हवी कारण माणसाच्या आयुष्यात पण संकटाचे ढग दाटून येतात आणि अपयशाचे ग्रहण सुद्धा लागत मात्र जी व्यक्ती सातत्यपूर्ण प्रयत्नातून स्वकारात्मक दुष्टीकोण ठेऊन योग्य दिशेने चालत राहतो त्याला नक्कीच यशाच्या प्रकाश्यात उजळून निघता येते!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

नशिबाच्या पानांवर नसलेल्या गोष्टीही केवळ कष्टाच्या जोरावर लिहिल्या जाऊ शकतात.... #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache
नशिबाच्या पानांवर नसलेल्या गोष्टीही केवळ कष्टाच्या जोरावर लिहिल्या जाऊ शकतात.... #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache

🌅 " आजचे सुविचार " 1) नात्यांची सुंदरता एकमेकांच्या चुका समजून घेण्यात आहे, कारण एकही चूक नसलेला माणूस शोधायला गेलात, तर कदाचित आयुष्यभर एकटं राहावं लागेल. 2) आपल्याला एखाद्या गोष्टीचे श्रेय मिळो अथवा न मिळो आपण आपलं चांगलं काम करत राहायचं, नियती हिशोबाला खूप प्रामाणिक असते. 3) जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचाच भाग आहे, कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•     ❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞ Join👉@shabdamanache •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

"शेवट" "शेवट कधीच सांगून येत नाही…" आपल्याला आयुष्यातील अनेक गोष्टी आधी कळतात — सण येणार, पाऊस येणार, थंडी वाढणार… पण आपला शेवट कधीच सांगून येत नाही. कोणाची शेवटची भेट? कोणाचं शेवटचं हसू? कोणता संवाद शेवटचा ठरेल? कोणाला आलिंगन देण्याची ती शेवटची संधी? आणि म्हणूनच हे जीवन असं बोलत नाही— “मी उद्यापर्यंत थांबतो, तू आज रुस.” कारण, जीवनाला "नंतर" समजतच नाही. आपण माणूस आहोत. आपल्याला राग येतो, अपेक्षा असतात. कधी कुणी शब्द चुकून बोलतं, कधी आपण जास्त मनावर घेतो, आणि मग सुरू होतं— रुसण्याचं, अंतर वाढवण्याचं, आणि ‘नंतर बोलू’ या खोट्या आश्वासनाचं चक्र. खरं तर “नंतर बोलू” म्हणजे काय? काय आहे ते नंतर? कोणत्या कॅलेंडरवर लिहिलंय ते नंतरचं? आपण उद्या भेटू याची काय खात्री आहे? आपण बोलणार याची काय खात्री आहे? आपण ज्याच्यासाठी रुसलो आहोत, तोच उद्या असेल याची काय खात्री आहे? आपण एखाद्यावर रुसतो, अबोला धरतो आणि मनात बोलतो,"नंतर बोलू, नंतर सगळं ठीक होईल." पण आयुष्याला "नंतर" समजत नाही, कधी कोणती भेट शेवटची ठरेल हे कोणालाच माहीत नाही. म्हणून, राग-रुसवा-अबोला सोडा,माणसं जपा आणि मनात जे काही आहे, ते आजच बोला... कारण, आयुष्य थांबत नाही, पण न बोलल्याचं दुःख मात्र आयुष्यभर सोबतीला राहतं... एक छोटी गोष्ट... एका घरात भांडण झालं. आई रागावली, मुलगा चिडला. आईने मनात म्हटलं—“उद्या बोलू.” मुलानेही मनात म्हटलं—“उद्या माफी मागतो.” पण दुसऱ्या दिवशी सकाळी… आई जागीच झाली नाही. तो आईच्या शेजारी बसून म्हणत होता, “आई, उठ… मी बोलतोय… मी माफी मागतो… मी नको बोलू म्हटलं होतं, पण आता बोलतोय…” पण आई शांत होती. या वेळेस शांतता कायमची होती. कारण शेवट कधीच सांगून येत नाही… पण न बोलल्याचं दुःख आयुष्यभर जिवंत राहतं. आता त्या मुलाचं आयुष्य पुढे चालू आहे… पण एक प्रश्न मात्र कायम आहे— “त्या दिवशी मी का नाही बोललो?” न बोलेल्या शब्दांचा बोचरा काटा, माफी मागायची संधी न मिळण्याची तगमग, आणि ‘मी बोललो असतो तर’ या वाक्याने आयुष्यभर त्रस्त. मनातलं बोलायला शिका… कारण न बोलणंच खूप जड असतं. कधी कधी आपल्याकडून शब्द बोलले जात नाहीत, कारण अहंकार मोठा असतो, असूया असते, वा “मी का आधी का बोलू?” असा प्रश्न असतो. पण विचार करा— तुम्ही ज्या गोष्टीवर रुसला आहात ती महत्त्वाची आहे का? की ज्याच्यावर रुसला आहात ती व्यक्ती अधिक महत्त्वाची आहे? जीवनात एक नियम शिकला पाहिजे: मनातल्या गोष्टी मनात ठेवू नका. मन माणसांवर ठेवा, गैरसमजांवर नाही. राग सोडणं म्हणजे पराभव नाही… ते प्रेमाचं धैर्य आहे कधी कधी आपण समजतो की मी आधी बोललो, तर मी कमी पडेन. पण वस्तुस्थिती उलट आहे— जे लोक आधी बोलतात, ते दुर्बल नसतात, ते मोठ्या मनाचे असतात. राग ठेवणं सोपं असतं, पण राग सोडणं— ते धैर्याचं काम आहे. ते प्रेमाचं काम आहे. आजूबाजूला पहा… किती चेहरे बदलले, किती नाती दूर गेली, किती लोकं आता आपल्यात नाहीत. कधी कधी आपण विचार करतो— “उद्या फोन करतो…” “उद्या भेटू…” “उद्या बोलू…” पण तो “उद्या” आलाच नाही आणि कधी कधी उद्या ती व्यक्ती ही राहिली नाही... आणि आयुष्य एक गोष्ट शिकवतं— जे बोललात ते कधीच पश्चात्ताप होत नाही. जे बोललंच नाही—त्याचंच आयुष्यभर दुख होतं. नात्यांमध्ये संवाद म्हणजे प्राणवायू असतो. नातं मोडत नाही— ते थांबतं… ते गुदमरायला लागतं… कारण संवाद बंद होतो. अबोलपणा म्हणजे शांतता नाही. अबोलपणा म्हणजे  मृत नातं. त्या शांततेत एकच आवाज असतो पश्चात्तापाचा. तुमच्याकडे अजून वेळ आहे… पण किती? हे सांगता येत नाही शेवट येतो तेव्हा मागे एकच प्रश्न— “मी का थांबलो?” तुमच्या मनात आज कोणाबद्दल काही आहे? कुणाची आठवण येते? कुणावर रुसलेले आहात? कुणाला काही सांगायचं होतं? आज बोला. आता बोला. संधी हातची जाऊ देऊ नका. कधी कधी एखादा छोटा “माफ कर” किंवा “तुझी आठवण आली” हा एकच शब्द नातं पुन्हा जिवंत करतो. “मनात काहीही ठेवू नका” हो, शेवट सांगून येत नाही. काळ कोणाची वाट पाहत नाही. आयुष्य कोणाला दुसरी संधी देत नाही. मग मनात रुसवा ठेवून काय मिळणार? अबोल्यातून काय उरणार? आपण बोलत नाही, भेटत नाही, माफ करत नाही तेव्हा आपण नातं हरवतो— पण सर्वात मोठं म्हणजे आपण स्वतःला हरवतो. म्हणूनच राग असेल तर व्यक्त करा… गैरसमज असेल तर स्पष्ट करा… प्रेम असेल तर बोला… क्षमा मागायची असेल तर कचरण्याची गरज नाही… कारण आयुष्य थांबत नाही. पण न बोलल्याचं दुःख मात्र आयुष्यभर सोबत राहतं. म्हणून जा… ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना फोन करा, मनातलं सांगा, प्रेम व्यक्त करा, रुसवा सोडा… कारण उद्याचा काही भरोसा नाही— पण तुमच्या आजच्या शब्दाने कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं… आणि तुमचंही...!!! ♥️♥️शुभ रात्री♥️♥️ #शब्द_मनाचे Join👉@shabdamanache