Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 119
Obunachilar
-424 soatlar
-157 kunlar
-4530 kunlar
Postlar arxiv
4 120
CMO Maharashtra Tweets:
जमीन संपादन करताना शेतकऱ्यांच्या हितालाच प्राधान्य देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नागपूर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी चामोर्शी (गडचिरोली)तील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित उद्योगासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांचे हित अबाधित ठेवले जाईल आणि संबंधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योग्य मोबदला देण्यात येईल. गडचिरोली जिल्हा औद्योगिक विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून ‘लोह व पोलाद हब’ म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योग उभारणीसाठी जमीन संपादन आवश्यक आहे. मात्र जमीन संपादन करताना शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली जाईल आणि जमीन संपादनाची प्रक्रिया राबवण्यात येईल.
उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. विकास प्रक्रियेत सर्वांना सहभागी करून घेण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #gadchiroli
4 120
CMO Maharashtra Tweets:
🔸A delegation of farmer from Chamorshi taluka in Gadchiroli district met CM Devendra Fadnavis at his official residence in Nagpur.
Adv. Ashish Jaiswal, MLA Dr. Milind Narote and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज नागपूर येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी चामोर्शी (गडचिरोली)तील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज नागपुर स्थित सरकारी आवास पर चामोर्शी (गडचिरोली) के किसानों के प्रतिनिधिमंडल ने भेंट की। इस अवसर पर राज्यमंत्री एड. आशिष जयस्वाल, विधायक डॉ. मिलिंद नरोटे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕠 5.30pm | 4-4-2026📍Nagpur | संध्या. ५.३० वा. | ४-४-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 120
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माहूर (जि. नांदेड) येथील श्री दत्त शिखर संस्थानच्या गादीचे महंत प.पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती (मालक) महाराज यांना देवाज्ञा झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने अध्यात्म, सेवा आणि परंपरेचा एक दीपस्तंभ हरपला आहे.
महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात दत्तभक्ती, धर्मसंवर्धन आणि समाजसेवेसाठी अखंड कार्य केले. त्यांच्या साधेपणातच महानता होती आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य भक्तांना आध्यात्मिक दिशा मिळाली. माहूर गड व दत्त शिखराची गौरवशाली परंपरा त्यांनी अत्यंत निष्ठेने जपली. त्यांच्या निधनाने केवळ संस्थेचे नव्हे तर संपूर्ण भक्तपरिवाराचे मोठे नुकसान झाले आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
ॐ शांति 🙏
4 120
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नव्या शिक्षण धोरणाच्या माध्यमातून मानव संसाधन तयार करण्याचा प्रयत्न
नई शिक्षा निति के माध्यम से मानव संसाधन तैयार करने का प्रयास...
(महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 | नागपुर | 4-4-2026)
#Maharashtra #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा
4 120
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भारतातील शिक्षण व्यवस्था आता जगभरातील विद्यापीठांशी स्पर्धा करण्यास सक्षम आहे.
भारत की शिक्षा व्यवस्था अब दुनियाभर के विश्वविद्यालयों प्रतिस्पर्धा करने में सक्षम है।
(महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 | नागपुर | 4-4-2026)
#Maharashtra #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा
4 120
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
शिक्षण व्यवस्थेत महान व्हायचे असेल, तर भविष्यातील आव्हानांना सामोरे जावे लागेल.
शिक्षा व्यवस्था में महान बनना है तो भविष्य की चुनौतियों का सामना करना होगा।
(महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 | नागपुर | 4-4-2026)
#Maharashtra #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा
4 120
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण आणि भारतीय ज्ञानाचे वैश्विकीकरण हे नवीन शिक्षण धोरणाचे उद्दिष्ट आहे.
वैश्विक ज्ञान का भारतीयकरण एवं भारतीय ज्ञान का वैश्वीकरण, यही नई शिक्षा नीति का उद्देश्य है।
(महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 | नागपुर | 4-4-2026)
#Maharashtra #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा
4 120
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भारतीयकरण से वैश्विकरण तक, नई शिक्षा नीति के साथ शिक्षा का नया युग!
नागपुर में आयोजित ‘महाराष्ट्र ज्ञान सभा 2026 : विकसित महाराष्ट्र के लिए शिक्षा’ इस राष्ट्रीय सम्मेलन का उदघाटन किया एवं उपस्थित जनों को संबोधित किया।
महाराष्ट्र ज्ञान सभा 2026 का उद्देश्य 2047 तक विकसित भारत और विकसित महाराष्ट्र के लिए शिक्षा की भूमिका पर विचार-विमर्श करने एवं वर्तमान व भविष्य की चुनौतियों पर मंथन कर नीति निर्माण के लिए एक महत्वपूर्ण मंच है।
साल 1985 के बाद पहली बार मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में नई शिक्षा नीति पर काम शुरू हुआ, जिसे साल 2020 में लागू किया गया। तब से इसके नवाचारों और बदलावों को लगातार अपनाने का प्रयास किया जा रहा है। नई शिक्षा नीति का उद्देश्य वैश्विक ज्ञान का भारतीयकरण और भारतीय ज्ञान का वैश्विक स्तर पर प्रसार करने के साथ-साथ ऐसे मानव संसाधन तैयार करना है, जिनमें समग्र विकास के साथ बौद्धिक, भावनात्मक, नैतिक, शारीरिक और व्यावसायिक गुण हों, ताकि वे आत्मनिर्भर बनकर देश की अर्थव्यवस्था में योगदान दे सकें। आज की वैश्विक दिशा के अनुसार हमारे बच्चे आधुनिक ज्ञान में दक्ष हों और साथ ही भारतीय ज्ञान परंपरा को जोड़ते हुए ऐसी शिक्षा विकसित की जाए, जो आधुनिक भी हो और हमारी शाश्वत परंपराओं को आने वाली पीढ़ियों तक पहुंचाए। इस शानदार आयोजन के लिए चारों संस्थाओं को हार्दिक धन्यवाद देता हूँ।
इस अवसर पर शिक्षा संस्कृति उत्थान न्यास के राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी जी, VNIT नागपुर के निदेशक मंडल के अध्यक्ष एम. मदन गोपाल जी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की कुलपति डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विश्वविद्यालय, गढ़चिरौली के कुलपति डॉ. प्रशांत बोकारे जी, आईआईएम नागपुर के निदेशक डॉ. भीमराया मेत्री जी एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
#Maharashtra #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा
https://x.com/Dev_Fadnavis/status/2040429960519963048?s=20
4 120
CMO Maharashtra Tweets:
नवीन शिक्षण धोरणासह शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण' या राष्ट्रीय संमेलनाचे उदघाटन करुन उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकीकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच वर्तमान व भविष्यातील जागतिक आव्हानांचा विचार करत शिक्षण पद्धतीला नवी दिशा देणे आवश्यक आहे.
जग अत्यंत वेगाने पुढे जात आहे. या वेगाची व त्यातून होणाऱ्या बदलांची गती लक्षात घेतली नाही तर आपण मागे राहू शकतो. या क्रांतीला गती देणाऱ्या ‘एआय’ आणि ‘डीप टेक्नोलॉजी’च्या विकासात भारतीयांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
आम्हाला शैक्षणिक धोरणातून असा मनुष्यबळ विकास साधायचा आहे, ज्यात व्यक्तीमध्ये सर्वंकष विकासासह नैतिक व व्यावसायिक गुणांचे रोपणही अपेक्षित आहे. भौतिक, नैतिक, शारीरिक क्षमतेसह व्यावसायिक म्हणून ती व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारीही ठरावी. तसेच जागतिक ज्ञान व भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ साधणारी आणि जागतिक आव्हानांचा सामना करणारी शिक्षण पद्धती आपल्याला विकसित करायची आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नवी मुंबईत आपण एज्युसिटी विकसित करत आहोत. त्यात आपल्या मुलांना अनेक विदेशी विद्यापीठांचे शिक्षण कमी खर्चात घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपल्या विद्यापीठांनीही या स्पर्धेत उतरून शिक्षणाचा तो स्तर गाठायला हवा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
यावेळी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, VNIT नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष एम. मदन गोपाळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा
4 120
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
स्थानिक नेतेमंडळी आणि कुटुंबीयांशी चर्चा करून वर्धा आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी स्व. दत्ताभाऊ मेघे यांची स्मारके उभारली जातील.
स्थानीय जनप्रतिनिधियों और परिजनों से चर्चा कर वर्धा और नागपुर दोनों स्थानों पर स्व. दत्ताभाऊ मेघे के स्मारक स्थापित किए जाएंगे।
(स्व. दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा | नागपूर | 4-4-2026)
#Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe
4 120
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
स्व. दत्ताभाऊ मेघे यांनी सर्व पक्षाच्या लोकांशी आपली मैत्री जपली.
स्व. दत्ताभाऊ मेघे इन्होंने सभी दलों के लोगों के साथ अपनी मित्रता बनाए रखी।
(स्व. दत्ता मेघे यांची श्रद्धांजली सभा | नागपूर | 4-4-2026)
#Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
