uk
Feedback
नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

नाते मनाचे - मराठी मोटिवेशनल

Відкрити в Telegram

💞Marathi Motivational Videos, Quotes, Stories आणखी बरचं काही...💞 ✨ YouTube Channel : https://youtube.com/c/NateManache ✨ ✨Admin Contact: @Nmcontactbot✨ ✨ Instagram: https://www.instagram.com/invites/contact/?i=ldcmahdnskr1&u✨

Показати більше
5 071
Підписники
-324 години
-67 днів
-2230 день
Архів дописів
*माणसं मनातली.....* *मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला , शरीराला प्रसन्न करून जातो. सहवासातील माणसाचं देखील असंच असतं....* *काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात , आपली होऊन जातात. तर , काही कितीही सहवासात राहिली , तरी त्यांची आतून ओढ नसतेच...* *चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल , तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं....* *शरीराची सुंदरता वया बरोबर संपते , तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते. शरीराला वय असतं , मनाला ते कधीच नसतं....* *शेवटी काय , आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो , शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा , शालीनता , प्रामाणिकपणा , आणि विनयशीलता असेल , तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते....* *म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही , देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो....* *आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं !!* *आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं , ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई....* *ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.* *आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे ? नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत....* *कदाचित , पुन्हा भेटतील , न भेटतील ?* ~~ श्री व. पु. काळे !

आयुष खूप काही दाखवतं. प्रत्येक दिवस नवी शिकवण देतो, नवे अनुभव देतो. कधी आनंदाचे क्षण तर कधी दुःखाचे सावट… पण प्रत्येक अनुभवामागे एक सत्य लपलेलं असतं – ज्याची त्याची लाईफ त्यालाच माहिती असते. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्याकडे पाहून मत बनवतो. कोणाचं आयुष्य सुखी वाटतं, कोणाचं परिपूर्ण वाटतं. पण त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, त्याने कोणते संघर्ष केले आहेत, त्याच्या आयुष्यात किती वादळं आली आहेत – हे फक्त त्यालाच माहिती असतं. बाहेरून दिसणारं सगळंच खरं नसतं. माणूस म्हणून आपण नात्यांमध्ये अपेक्षा ठेवतो. आपल्यासाठी कुणीतरी असावं, आपल्याला समजून घ्यावं, साथ द्यावी – ही नैसर्गिक भावना आहे. पण जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा मन दुखावतं. तक्रारी वाढतात, गैरसमज वाढतात आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. म्हणूनच कदाचित आयुष्य आपल्याला शिकवतं – कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. अपेक्षा कमी असतील, तर दुःखही कमी होतं. स्वतःवर विश्वास ठेवला, तर आधारासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत नाही. नाती जपा, पण स्वतःला हरवून नाही. प्रेम करा, पण स्वतःच्या स्वाभिमानाच्या किंमतीवर नाही. साथ द्या, पण अपेक्षांच्या ओझ्याखाली नाही. कारण शेवटी… ज्याची त्याची लाईफ त्यालाच माहिती असते, आणि आयुष्य प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने शिकवत असतं... Credit goes to writer ✨

Good morning dear sweetheart… ऐक ना गं सखे… मनविद्रोही म्हणून सांगतो… सखे तुझ्या “गुड मॉर्निंग” मध्येच माझा पूर्ण दिवस उजाडतो
Good morning dear sweetheart… ऐक ना गं सखे… मनविद्रोही म्हणून सांगतो… सखे तुझ्या “गुड मॉर्निंग” मध्येच माझा पूर्ण दिवस उजाडतो गं… तू हसलीस की मनातला प्रत्येक अंधार पळून जातो गं… तुझ्या डोळ्यांत एवढी जादू आहे ना, की रागात असलो तरी तुझा फोटो पाहिला की जीव शांत होतो… आणि “अहो ऐका ना?” म्हटलंस की हा हट्टी जीव पण तुझ्यासमोर हरतो… सखे… प्रेम म्हणजे फक्त I love you बोलणं नसतं गं… तर रात्रभर जागून तुझ्या काळजीत तडफडणं असतं… तू ऑनलाईन दिसली नाहीस की मन बेचैन होतं… आणि “अहो तुम्ही जेवलास का?” एवढं विचारलं की संपूर्ण जग जिंकल्यासारखं वाटतं… तुझ्यासाठी श्रीमंत व्हायचं नाही गं मला… फक्त एवढं कमवायचंय, की तुझ्या डोळ्यात कधी अश्रू येऊ द्यायचे नाहीत… गावठी आहे मी… बोलणं रांगडं असेल… पण प्रेम मात्र एकदम जीवापाड करतो गं… तुझ्यासाठी दुनियेशी भांडेल हा मनविद्रोही… पण तुझ्याशी अबोला धरून एक मिनिटही राहू शकत नाही… सखे… तू फक्त सोबत राहा… बाकी आयुष्याशी दोन हात करायला हा विनायक अजून जिवंत आहे… ✍️ मनविद्रोही विनायक भिसे मानसिक आरोग्य समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ Mo. 7798150143

टोलनाक्यावर भेटलेली ती नक्की वाचा हा लेख 🙏
टोलनाक्यावर भेटलेली ती नक्की वाचा हा लेख 🙏

मुलगा आणि मुलगी बोलताना समाजाची नजर रस्त्याच्या कडेला, बसस्टॉपवर, कॉलेजच्या आवारात किंवा एखाद्या बागेच्या कोपऱ्यात एखादा मुलगा आणि मुलगी शांतपणे बोलत उभे असतात. ते त्यांच्या स्वप्नांबद्दल बोलत असतील, घरातील अडचणी सांगत असतील, एकमेकांना आधार देत असतील किंवा फक्त मित्र म्हणून काही क्षण वाटून घेत असतील. पण त्यांच्या शब्दांपेक्षा आधी समाजाच्या नजरा त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्या नजरा प्रश्न विचारत नाहीत, त्या थेट निर्णय देतात. कोणी कुजबुजतं, कोणी हसतं, कोणी संशय घेतो. त्या दोन व्यक्तींमधील नातं समजून घेण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. कारण आपल्या समाजाला मैत्रीपेक्षा अफवा अधिक सहज समजतात. कदाचित ती मुलगी तिच्या वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच कोणासमोर मन मोकळं करत असेल. कदाचित तो मुलगा स्वतःच्या अपयशाशी झुंजत असेल आणि त्याला फक्त एक ऐकून घेणारं मन हवं असेल. पण समाजाला त्यांच्या डोळ्यातील वेदना दिसत नाहीत; दिसते ती फक्त एक मुलगी आणि एक मुलगा. किती विचित्र आहे ना? एका आईला तिच्या मुलासाठी मैत्रीण हवी असते, पण दुसऱ्याच्या मुलीसोबत तो बोलताना मात्र तिला शंका येते. आपण मुलांना माणूस म्हणून नाही, तर स्त्री आणि पुरुष या चौकटीत पाहायला शिकतो. म्हणूनच अनेक सुंदर मैत्री जन्म घेण्यापूर्वीच मरून जातात. शब्दांनी जखम होत नाही असे म्हणतात, पण नजरेने होणाऱ्या जखमा खूप खोल असतात. समाजाच्या संशयी नजरा अनेकदा निरागस नात्यांचा गळा घोटतात. काही मुली बोलणं बंद करतात, काही मुलं स्वतःला एकटं करून घेतात. आणि मग आपणच म्हणतो, "आजकालची मुलं मन मोकळं करत नाहीत." खरं तर दोष त्यांचा नसतो. दोष त्या वातावरणाचा असतो जिथे प्रत्येक संवादावर संशय घेतला जातो आणि प्रत्येक नात्याला नाव देण्याची घाई असते. एखादा मुलगा आणि मुलगी बोलताना दिसले, तर त्यांच्या नात्याचा न्यायाधीश होण्यापेक्षा त्यांच्या माणुसकीचा आदर करूया. कारण कधी कधी दोन व्यक्तींमध्ये प्रेम नसतं, स्वार्थ नसतो, आकर्षणही नसतं... असतो फक्त एक आधार. आणि आयुष्याच्या कठीण प्रवासात, कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवून दोन अश्रू गाळण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. समाजाने जर हे समजून घेतलं, तर कदाचित अनेक डोळ्यांत अश्रू येणं थांबेल. कारण सर्वात जास्त वेदना अपमानाच्या नसतात, तर गैरसमजाच्या असतात.

माझी प्रिय मैत्रीण सोनूसाठी काही शब्द..... प्रिय सोनू 🌸 हे तुझ्याबद्दल दोन शब्द लिहायला सुरुवात केली तेव्हा मला वाटलं होतं की तुझ्याबद्दल लिहिणं खूप सोपं असेल. पण जसं जसं मी शब्द लिहायला लागलो, तसं जाणवलं की काही माणसं शब्दांमध्ये मावत नाहीत… तू त्यापैकीच एक आहेस आपली मैत्री कधी सुरू झाली आणि कशी इतकी खास बनली, हे मला कधीच नीट सांगता येणार नाही. पण एवढं नक्की आहे की माझ्या आयुष्यातील काही सर्वात सुंदर आठवणींमध्ये तू आहेस ✨ काही लोक आयुष्यात येतात आणि वेळेनुसार दूर जातात… पण काही लोक मनात इतकं खोलवर बसतात की ते कधीच दूर जात नाहीत. तू तशीच आहेस 💫 तुझ्यासोबत घालवलेले छोटे छोटे क्षणही माझ्यासाठी खूप मोठे आहेत — तुझं हसणं 😊, तुझ्या गप्पा 🗣️, अचानक रुसणं 😔, पुन्हा हसणं 😄… हे सगळं माझ्या आयुष्यातलं खूप सुंदर chapter आहे 📖 कदाचित तुला कधी जाणवलं नसेल, पण तू नकळत माझ्या आयुष्याचा एक खूप महत्त्वाचा भाग बनली आहेस काही वेळा माणसं रोज भेटतात, तरी जवळची वाटत नाहीत… आणि काही माणसं कमी भेटूनही मनात घर करून जातात. तू दुसऱ्या प्रकारातली आहेस आणि सोनू, एक गोष्ट तुला मनापासून सांगायची आहे… जर कधी तुला वाटलं की तू एकटी आहेस 😔, किंवा आयुष्य कठीण वाटू लागलं, किंवा काहीच समजत नाहीये… तर फक्त एक गोष्ट आठव — तुला पूर्णपणे ओळखणारा, तुला समजून घेणारा, आणि तुझ्या प्रत्येक शांततेलाही ऐकणारा एक मित्र आहे 🤝 मी नेहमी तुझ्यासोबत आहे — अंतर कितीही असो, वेळ कसा ही बदलो, परिस्थिती काहीही असो 🌍 मी “फक्त शब्दांनी” नाही, तर मनाने तुझ्या पाठीशी कायम उभा आहे ❤️ तुला आनंदी पाहणं 😊 हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे. तुझं हसणं कमी झालं तर माझं मनही शांत राहत नाही… इतकं तुझं अस्तित्व माझ्यासाठी खास आहे एक गोष्ट कायम लक्षात ठेव — माझ्या आयुष्यातील सुंदर आठवणींच्या यादीत तुझं नाव नेहमी सर्वात वर आणि खास राहील ⭐ धन्यवाद, माझ्या आयुष्यात येण्यासाठी 🙏 धन्यवाद, इतकी सुंदर मैत्री दिल्याबद्दल 🌸 तुझ्या मैत्रीच्या आठवणी जपणारा, तुझा मित्र जय ✍️

मित्रांनो नाते मनाचे या चॅनेल वर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात कुठेतरी एक कवी किंवा लेखक लपलेला असतोच फक्त गरज असते ती स्वतःला जाणून घायची. तुमच्याकडे जर स्वलिखित लेख, कविता आणि प्रेरणादायी कथा असतील तर मला  💫Contact : @Nmcontactbot 💫 वर पाठवू शकता. तुमचे लेख ग्रुप वर तुमच्या नावासहित प्रकाशित केले जातील.

कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की सगळं भारावून टाकतं. आजूबाजूला लोक असतात, हसू असतं, गप्पा असतात… पण आतून मन रिकामं, एकटं, तुटलं वाटतं. अशा वेळी आपण विचार करतो — “कोणीच आपलं नसतं.” ही भावना अचानक येत नाही. ती हळूहळू, सावकाश येते — जेव्हा आपण खूप देतो आणि काहीच मिळत नाही, जेव्हा आपण समजून घेतो, पण आपली माणसं समजून घेत नाहीत, जेव्हा मदतीची अपेक्षा ठेवतो, पण आपल्यासाठी वेळ काढणारा कोणीच नसतो. काही वेळा आपण स्वतःलाच दोषी समजतो — “कदाचित मी खूप मागतोय,” किंवा “कदाचित मी चुकीचा आहे.” पण खरी गोष्ट अशी आहे — प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याच्या लढाईत गुंतलेला असतो. त्यांच्या मनात स्वतःचे दुःख, स्वतःची चिंता, स्वतःचे स्वप्न असतात. त्यामुळे ते आपल्याला पूर्ण समजू शकत नाहीत. त्या एकटेपणात एक वेदनादायक पण खरी ताकद दडलेली असते. आपल्यालाच आपल्या परिस्थितीशी सामना करावा लागतो, आपल्यालाच निर्णय घ्यावे लागतात, आपल्यालाच मार्ग शोधावा लागतो. त्या संघर्षातूनच आपण स्वतःला ओळखतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, स्वतःला आधार देतो. कधी कधी वाटतं — “जर कोणी माझ्यासाठी थोडा वेळ काढला असता, जर कोणी मला समजून घेतलं असतं, तर हे इतकं वेदनादायक नसतं.” पण खरं हे आहे — कोणी कायमच आपलं नसतं, पण प्रत्येक माणूस त्या क्षणापुरता आपल्याला सोबत देऊ शकतो. शेवटी, आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागतं. आपल्यालाच आपले दुःख सांभाळायचं, आपली चूक माघावी लागते, आपला मार्ग शोधायचा. एकटेपणा वेदनादायक असतो, पण तो आपल्याला अत्यंत बलवान आणि परिपक्व बनवतो. आयुष्य असंच असतं — संघर्ष, ताण, वेदना, बदल… आणि त्या प्रत्येक अनुभवातून शिकणे. जो दिवशी आपण समजतो की शेवटी स्वतःलाच उभं राहायचं आहे, त्या दिवशी खरी ताकद आपल्यात जन्मते. 💭 एकटेपणा ही फक्त वेदना नसते; ती आत्मा घडवणारी शाळा असते.

आयुष्य हे एका कॉम्प्युटरसारखं असतं… ते अचानक बंद पडत नाही. सुरुवातीला सिस्टम slow होते, warnings दिसायला लागतात, आणि आतून शांतपणे damage वाढत राहतं… पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, वेळेसोबत सगळं ठीक होईल असं समजून. आणि मग एक दिवस, सगळंच पूर्णपणे shutdown होतं. अगदी आयुष्य आणि नात्यांसारखंच… ती एका क्षणात तुटत नाहीत, तर खूप काळ दुर्लक्षित राहिल्यानंतर हळूहळू संपत जातात… कारण प्रत्येक नात्यालाही वेळोवेळी care, understanding, आणि communication ची गरज असते. नाहीतर बाहेरून सगळं normal दिसत असलं, तरी आतून connection कधीच तुटलेलं असतं… 🖤

आयुष्य हे WiFi सारखं असावं, दूर गेलो तरी पुन्हा connect व्हावं. डोकं network सारखं hang झालं की, थोडा वेळ शांततेत हरवून जावं.

शिवराज्याभिषेक सुरवात नव्या युगाची 🙏 नक्की वाचा...
शिवराज्याभिषेक सुरवात नव्या युगाची 🙏 नक्की वाचा...

उजाडली दिव्य सोनेरी पहाट सोबत घेऊनी आली सुवर्णक्षण...! सजला संपुर्ण रायगड आणि राज्य पाहायला शिवछत्रपतींचा राज्यभिषेक सण....🚩
उजाडली दिव्य सोनेरी पहाट सोबत घेऊनी आली सुवर्णक्षण...! सजला संपुर्ण रायगड आणि राज्य पाहायला शिवछत्रपतींचा राज्यभिषेक सण....🚩 केली मुक्त परकीय सत्तांच्या गुलामगिरीतून शिवरायांनी ही माती...! म्हणूनच ते रयतेचे,सर्वसामान्य जनतेचे राजे बनले शिवछत्रपती....🚩 केला होता रायरेश्वर मंदिरात जो संकल्प रयतेच्या स्वराज्यासाठी..! झेलू शकले अनेक संघर्षाचे वार,कारण जन्म घेतला होता माता जिजाऊ पोटी..🚩 भेटले आपले स्वराज अनेक मावळ्यांच्या शौर्यातून,स्वामिनिष्ठेतून व बलिदानातून...! म्हणूनच ह्या सुवर्ण दिवसाचे महत्त्व खूप अपार ६ जुन....🚩 शिवराज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेछ्या...🚩💐🦧🙏 .......🦋🌺✍🙏........ शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

6 जून... शिवराज्याभिषेक दिवस 🚩 “ छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावरील शिवराज्याभिषेक म्हणजे एका नव्या शिवयुगाची सुरवात आहे
6 जून... शिवराज्याभिषेक दिवस 🚩 “ छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावरील शिवराज्याभिषेक म्हणजे एका नव्या शिवयुगाची सुरवात आहे. इथूनच खऱ्या अर्थाने स्वराज्य म्हणजे काय?हे मराठी माणसाला कळालं, अश्या महान स्वराजनायकास शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विनम्र अभिवादन...” 🙏🙏🙏🚩

नक्की वाचा... अनुभवलेलं जगणं... 🥰
नक्की वाचा... अनुभवलेलं जगणं... 🥰

शोध सुखाचा हे पुस्तक खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा.. मो. 8806379959
शोध सुखाचा हे पुस्तक खरेदी करण्यासाठी आजच संपर्क करा.. मो. 8806379959

मन आणि मानवी जीवन नक्की वाचा माझा हा लेख....🙏
मन आणि मानवी जीवन नक्की वाचा माझा हा लेख....🙏