uk
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Відкрити в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 33 765 підписників, посідаючи 5 593 місце в категорії Освіта та 11 939 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 33 765 підписників.

За останніми даними від 13 липня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -26, а за останні 24 години на 19, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 12.63%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 8.01% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 4 266 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 2 704 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 14 липня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

33 765
Підписники
+1924 години
+537 днів
-2630 день
Архів дописів
🟧महाराष्ट्रातील वन्यजीवन ▪️ राष्ट्रीय उद्याने ▪️ वन्यप्राणी अभयारण्ये ▪️ व्याघ्र प्रकल्प ▪️ सागरी अभयारण्ये ▪️ पक्षी अभयारण्
🟧महाराष्ट्रातील वन्यजीवन ▪️ राष्ट्रीय उद्याने ▪️ वन्यप्राणी अभयारण्ये ▪️ व्याघ्र प्रकल्प ▪️ सागरी अभयारण्ये ▪️ पक्षी अभयारण्ये 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

Combine पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडींची तयारी करत असताना काय काळजी घ्याल? नक्की वाचा 👆

Sample Copy 👆👆👆👆 🔰Simplified चालू घडामोडी डायरी🔰 अंक १६ वा » १ जुलै ते २० सप्टेंबर दरम्यानच्या घडामोडींचा समावेश.. » लेखक : बालाजी सुरणे, दिव्या महाले (STI) » मार्गदर्शक :डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) 22 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध ..... Buy Online Publication Online store 👇 www.simplifiedcart.com Buy Online Amazon https://www.amazon.in/gp/product/B08JJ7QY2N/ref=cx_skuctr_share?smid=A2EEC5S5AUD2TM

5th Edition CSAT Simplified Sample Copy(1)(1).pdf4.83 MB

samajsudharak sample copy.pdf11.02 MB

◼️ सिम्प्लिफाईड Comprehensive GS+CSAT राज्यसेवा सराव प्रश्नसंच ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📒सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या या पुस्तकाची "प्रथम आवृत्ती" Ebook (Pdf) स्वरूपात सर्वत्र मोफत उपलब्ध 📍MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 साठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच. 📍GS+CSAT च्या Comprehensive प्रश्नपत्रिका. 📍सर्व प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. 📍अल्पावधी तयारीसाठी व Revision साठी उपयुक्त. ✍डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ✍नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ◼️Buy Simplified Publication Online Book Store👇 www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com Contact - 8788639688 ◼️Join करा Simplified Discussion Group👇 @simplified_publication

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇 https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

🟧भारताच्या महिंदर गिरी यांनी ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार’ जिंकला जगभरातील इतर नऊ जणांसोबत महिंदर गिरी यांना इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) आणि वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज (WCPA) या संस्थांच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2021’ देण्यात आला. महिंदर गिरी IUCN आणि WCPA या संस्थांचा ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार’ जिंकणारे आशिया खंडातील एकमेव रेंजर (वन रक्षक) ठरले आहेत. महिंदर गिरी भारतातील राजाजी व्याघ्र प्रकल्पाचे वन अधिकारी आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनात त्यांनी केलेल्या कृतींसाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाला आहे. वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज (WCPA) विषयी वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज (WCPA) ही इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) या संघटनेच्या सहा आयोगांपैकी एक आहे. या आयोगाची स्थापना 1996 साली झाली. आयोग देशांचे सरकार आणि इतरांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी धोरणे आखण्यात मदत करते. इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) विषयी इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) (अधिकृतपणे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस) अर्थात ‘आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ’ ही संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याची अधिकृत सल्लागार संस्था आहे. ही निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात तसेच नैसर्गिक स्त्रोतांचा शाश्वत वापर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. संस्थेची स्थापना 5 ऑक्टोबर 1948 रोजी झाली. संस्थेचे मुख्यालय ग्लांड (स्वित्झर्लंड) येथे आहे.भारताच्या महिंदर गिरी यांनी ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार’ जिंकला जगभरातील इतर नऊ जणांसोबत महिंदर गिरी यांना इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) आणि वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज (WCPA) या संस्थांच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2021’ देण्यात आला. महिंदर गिरी IUCN आणि WCPA या संस्थांचा ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार’ जिंकणारे आशिया खंडातील एकमेव रेंजर (वन रक्षक) ठरले आहेत. महिंदर गिरी भारतातील राजाजी व्याघ्र प्रकल्पाचे वन अधिकारी आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनात त्यांनी केलेल्या कृतींसाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाला आहे. वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज (WCPA) विषयी वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज (WCPA) ही इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) या संघटनेच्या सहा आयोगांपैकी एक आहे. या आयोगाची स्थापना 1996 साली झाली. आयोग देशांचे सरकार आणि इतरांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी धोरणे आखण्यात मदत करते. इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) विषयी इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) (अधिकृतपणे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस) अर्थात ‘आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ’ ही संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याची अधिकृत सल्लागार संस्था आहे. ही निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात तसेच नैसर्गिक स्त्रोतांचा शाश्वत वापर या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे. संस्थेची स्थापना 5 ऑक्टोबर 1948 रोजी झाली. संस्थेचे मुख्यालय ग्लांड (स्वित्झर्लंड) येथे आहे.भारताच्या महिंदर गिरी यांनी ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार’ जिंकला जगभरातील इतर नऊ जणांसोबत महिंदर गिरी यांना इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) आणि वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज (WCPA) या संस्थांच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार 2021’ देण्यात आला. महिंदर गिरी IUCN आणि WCPA या संस्थांचा ‘आंतरराष्ट्रीय रेंजर पुरस्कार’ जिंकणारे आशिया खंडातील एकमेव रेंजर (वन रक्षक) ठरले आहेत. महिंदर गिरी भारतातील राजाजी व्याघ्र प्रकल्पाचे वन अधिकारी आहेत. पर्यावरणाच्या संवर्धनात त्यांनी केलेल्या कृतींसाठी हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाला आहे. वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज (WCPA) विषयी वर्ल्ड कमिशन ऑन प्रोटेक्टेड एरियाज (WCPA) ही इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) या संघटनेच्या सहा आयोगांपैकी एक आहे. या आयोगाची स्थापना 1996 साली झाली. आयोग देशांचे सरकार आणि इतरांना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी धोरणे आखण्यात मदत करते. इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) विषयी इंटरनेशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) (अधिकृतपणे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस) अर्थात ‘आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ’ ही संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) याची अधिकृत सल्लागार संस्था आहे. 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟧विदेशातून येणारी उड्डाणे थांबवा. देशभरात अलीकडे करोना संसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने ब्रिटन आणि दक्षिण अफ्रि के तून येणारी उड्डाणे थांबवावी, अशी सुमारे दोनतृतीयांश लोकांची इच्छा आहे, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. याशिवाय समाजवर्तुळाच्या ऑनलाईन व्यासपीठावरून सुमारे ४३ टक्के लोकांनी करोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित करण्याच्या बाजूने असल्याचे म्हटले आहे. हे सर्वेक्षण देशातील २४४ जिल्ह्यांमधील आठ हजार ८०० नागरिकांकडून आलेल्या प्रतिसादावर आधारित आहे. गेल्यावर्षीपासून वंदे भारत मिशनअंतर्गत आणि जुलैपासून निवडक देशांसोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ व्यवस्थेअंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. देशाच्या विविध भागात दक्षिण अफ्रि का, ब्रिटनमध्ये आढळणारे करोनाचे विविध प्रकार सापडत आहेत. दररोज ६० हजार नवे बाधित नोंदवलेजात आहेत. यावर्षी १२ फे ब्रुवारीला १२ हजार रुग्ण होते आणि ४५ दिवसात दररोजच्या प्रकरणातील ही पाचपट वाढ आहे. इंग्लंडमध्ये आढळणारा करोनाचा प्रकार ७० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. तर दक्षिण अफ्रि के त आढळलेला करोनाचा प्रकार ३० च्यावर देशांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर काही निर्बंध घालण्यात यावे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

🟧मोदी मायदेशी परतताच बांगलादेशात मंदिरावर हल्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात १० जण ठार झाले असून मोदी मायदेशी परतल्यानंतर हे आंदोलन अधिक हिंसक झाले. हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करण्यात आला. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने पोलीस आणि स्थानिक पत्रकाराच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. बांगलादेश स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर होते. मोदी हे भारतातील मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांच्या दौऱ्याला विरोध झाला.

🟧केंद्रीय जल शक्ती मंत्र्यांद्वारे जल जीवन अभियानांतर्गत 7 राज्यांसाठी कामगिरी प्रोत्साहन निधी म्हणून 465 कोटी रुपये मंजूर   ग्रामीण भागातील प्रत्येक घरात सन 2024 पर्यंत नळाद्वारे खात्रीशीर पाणीपुरवठा करण्यासाठी अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, सिक्कीम, गुजरात आणि हिमाचल प्रदेश ही सात राज्ये जल जीवन अभियान- हर घर जल अंतर्गत कामगिरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरली आहेत. जल जीवन अभियानांतर्गत कामगिरी प्रोत्साहन अनुदानासाठी निकषांमध्ये प्रत्यक्ष आणि आर्थिक प्रगती, नळाद्वारे पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि निधी वापरण्याची क्षमता यांचा समावेश आहे. आज केंद्रीय जल शक्ती मंत्री, गजेंद्रसिंग शेखावत यांनी या राज्यांना कामगिरी प्रोत्साहन निधी म्हणून 465 कोटी रुपये मंजूर केले. 15 ऑगस्ट, 2019 रोजी जल जीवन अभियान जाहीर केल्यापासून आतापर्यंत चार कोटी कुटुंबांना पाण्याची नळ जोडणी देण्यात आली आहे, ज्यायोगे देशातील ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात 3.23 कोटी (17%) वरून 7.20 कोटी (37.6%) पर्यंत वाढ झाली आहे. प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जल जीवन अभियान राबविण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यात गुजरातचा समावेश आहे.आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, जल जीवन अभियानासाठी (जेजेएम) 11,000 कोटी रुपयांचे वाटप केले गेले. 

🟧मिताली एक्सप्रेस’: ढाका आणि न्यू जलपाईगुडी या शहरांना जोडणारी प्रवासी रेल्वे सेवा बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च आणि 27 मार्च 2021 हे दोन दिवस बांगलादेशाच्या दौऱ्यावर होते. बांगलादेशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित आणि भारत-बांगलादेशाच्या मैत्रीला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी, ‘मिताली एक्सप्रेस’ या रेलगाडीचे उद्घाटन करण्यात आले. ही चिल्लाहाटी-हल्दीबारी रेल्वेजोडणीद्वारे ढाका आणि न्यू जलपाईगुडी या शहरांना जोडणारी ढाका मार्गावरील प्रवासी रेल्वे सेवा आहे. ▪️बांगलादेश बांगलादेश हा बंगालचा उपसागरालगत असलेला भारताच्या पूर्वेकडे असलेला दक्षिण आशियाई देश आहे. ढाका ही देशाची राजधानी असून चलन बांगलादेशी टाका हे आहे.

🟧भारत-बांगलादेश शांततेसाठी आग्रही भारत आणि बांगलादेश यांना जगात स्थैर्य, प्रेम आणि शांतता हवी आहे; अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थता नको आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. पंतप्रधान मोदी मतुआ समुदायाच्या सदस्यांपुढे बोलत होते. पंतप्रधान मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर होते. त्यांनी शनिवारी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गोपालगंज ओराकांडी येथील मंदिरात जाऊन प्रार्थना केली. मतुआ समुदायाचे आध्यात्मिक गुरू हरिचंद ठाकूर यांच्या जन्मस्थानी हे मंदिर आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांना स्वत:च्या विकासाबरोबरच जगाची प्रगती हवी आहे. दोन्ही देशांना जगात शांतता, स्थैर्य, प्रेम हवे आहे, तर अस्थिरता, दहशतवाद आणि अस्वस्थतेवर मात करायची आहे, असे मोदी म्हणाले. आपण २०१५ मध्ये बांगलादेशला भेट दिली होती, तेव्हाच ओराकांडी येथे भेट देण्याची इच्छा होती, पण काही कारणास्तव ते जमले नाही. या वेळी तेथील मंदिरास भेट देऊन प्रार्थना करण्याची आपण वाटच बघत होतो, असे मोदी म्हणाले. भारतीय मटुआ समुदायाच्या मनात ओराकांडीत आल्यानंतर ज्या भावना आहेत, त्या माझ्याही मनात आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. ओराकांडी हे हिंदू मटुआ समुदायाचे श्रद्धास्थान आहे. त्या संदर्भात मोदी म्हणाले, की ओराकांडी येथे भारत मुलींसाठी एक माध्यमिक आणि एक प्राथमिक शाळा सुरू करील. याच ठिकाणी हरिचंद ठाकूर यांनी आध्यात्मिक संदेश दिला होता. करोना महासाथीच्या काळात भारत आणि बांगलादेश यांनी आपल्या क्षमता सिद्ध केल्या. दोन्ही देश या साथीचा एकत्रित मुकाबला करीत आहेत. भारतात तयार झालेल्या लशीच्या मात्रा बांगलादेशला देण्यात आल्या आहेत.

photo content
+3

🟧चार कोटी वाहनांवर ग्रीन टॅक्स लागणार. भारतात सध्या १५ वर्षांहून अधिक जुन्या वाहनांची संख्या ४ कोटी आहे. ही वाहने प्रदूषणवाढीस कारणीभूत आहेत. त्या वाहनांवर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालय ‘ग्रीन टॅक्स’ लावण्याचा विचार करत आहे. १५ वर्षांहून अधिक जुनी वाहने कर्नाटक मध्ये सर्वात जास्त आहेत. तर दुसऱ्या स्थानावर उत्तर प्रदेश आणि तिसऱ्या स्थानावर दिल्ली आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. या माहितीनुसार ४ कोटीमधील २ कोटी वाहने २० वर्षांहून अधिक जुनी आहेत. त्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांना पाठवण्यात आला आहे, तर दुसरीकडे सर्वाधिक जुनी वाहने कर्नाटकमध्ये असून त्यांची संख्या ७० लाख आहे. कर्नाटकपाठोपाठ उत्तर प्रदेशमध्ये ५६.५४ लाख जुनी वाहने आहेत. त्यापैकी २४.५५ लाख वाहने २० वर्षांपेक्षा अधिक जुनी आहेत. नवी दिल्लीत ३५ .११ लाख वाहने जुनी आहेत. त्यापाठोपाठ केरळमध्ये ३४.६४ लाख, पंजाबमध्ये २५.३८ लाख, तामिळनाडूमध्ये ३३.४३ लाख, पश्चिम बंगालमध्ये २२.६९ लाख जुनी वाहने आहेत. महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि हरियाणात अशा वाहनांची संख्या १२ ते लाख आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या असणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्याचा प्रस्ताव राज्य सरकारांना पाठवला आहे. राज्य सरकार त्यावर विचार करून तो प्रस्ताव केंद्राकडे परत पाठवतील. त्यानंतर ग्रीन टॅक्स लावण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

🟧सॉफ्ट सिग्नल हटवण्यासह काही नियमातही बदल आयपीएल-२०२१ (इंडियन प्रीमियर लीग) हंगाम सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआयने सॉफ्ट सिग्नल हटवण्यासह शॉट रन आणि नोबॉलबद्दलही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएल-२०२१ मधून सॉफ्ट सिग्नल कमी केल्यामुळे आता ज्यावेळी मैदानावरील पंच तिसऱ्या पंचांची मदत मागतील त्यावेळी त्यांना सॉफ्ट सिग्नल द्यावा लागणार नाही. जो अंतिम निर्णय घ्यायचा आहे तो तिसरे पंचच घेतील. याबरोबर शॉर्ट रन व नोबॉलचा अंतिम निर्णयही तिसऱ्या पंचाचा राहील. मैदानावरील पंचांना एखादा निर्णय देण्यात अडचण येते त्यावेळी ते तिसऱ्या पंचांची मदत घेतात. आता मदत घेताना त्यांना आपला एक निर्णय द्यावा लागतो, त्यालाच ‘सॉफ्ट सिग्नल’ असे म्हणतात. हा सिग्नल खेळाडू बाद किंवा नाबादचा असतो. पुढे पडताळणीनंतर जर तिसरे पंचही आपल्या निर्णयाबद्दल १०० टक्के खात्रीशीर नसतील किंवा त्यांना खेळाडू बाद किंवा नाबाद असल्याचा ठोस पुरावा मिळत नसेल तेव्हा मैदानावरील पंचांनी दिलेल्या सॉफ्ट सिग्नलच अंतिम निर्णय असतो. अशावेळी मैदानावरील पंचांनी दिलेला निर्णय महत्त्वाचा ठरतो. १८ मार्च रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या ट्वेंन्टी -२० सामन्यादरम्यान भारताला सॉफ्ट सिग्नलमुळे फटका बसला होता. सामना भारताने जिंकला असला तरी सॉफ्ट सिग्नलमुळे वाद निर्माण झाले होते आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. आयपीएलमध्येही वाद निर्माण होऊ नये यासाठी सॉफ्ट सिग्नल तरी वापरण्यात येणार नाही, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

🟧डीडी फ्री डिशने ओलांडला 40 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा: ईवाय फिक्की मीडिया एन्टरटेन्मेंट अहवाल 2021   ईवाय फिक्की मीडिया एन्टरटेन्मेंट अहवाल 2021 नुसार डीडी फ्री डिशने आपला वाढीचा वेग कायम ठेवला आहे आणि त्याने अंदाजे 40 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढीचे श्रेय कमी खर्चीक टेलिव्हिजन संच, आर्थिक अडचणी, डीडी रेट्रो चॅनल सुरू करणे आणि विनामूल्य डिश प्लॅटफॉर्मवर मोठे प्रसारक परत येण्याला दिले जाते. काही वेळा दूरचित्रवाणीवर कोणतेही मोठे कार्यक्रम नसताना वापरला जाणारा डीडी फ्री डिश देखील घरातच दुसरा सेट टॉप बॉक्स बनला आहे. चीनमध्ये उत्पादित चिपसेटच्या कमतरतेमुळे मोफत डिश वितरकांनी वर्षाच्या विक्रीतील वाढ तसेच मागणीची पूर्तता करण्यास असमर्थता दर्शविली आहे. कनेक्टिव्ह टीव्हीद्वारे 2025 पर्यंत दूरचित्रवाणीचे ग्राहक 5% हून अधिक वाढ नोंदवत 40 दशलक्ष ग्राहकांचा तर डीडी फ्री डिश 50 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडू शकेल. डीडी फ्री डिश, प्रसार भारतीची मल्टी-चॅनेल फ्री-टू-एअर डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा आहे. कोणत्याही वर्गणी शुल्काशिवाय लोकांना दर्जेदार करमणूक आणि माहितीसाठी पर्यायी आणि परवडणारे व्यासपीठ उपलब्ध करणे हे डीडी फ्री डिशचे प्राथमिक उद्दीष्ट आहे. सध्या डीडी फ्री डिशमध्ये 161 दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत ज्यात 91 दूरदर्शन वाहिन्यांसह (ज्यात 51 कोब्रँडेड  शैक्षणिक वाहिन्यांचा समावेश आहे), 70 खासगी वाहिन्या आणि 48 रेडिओ वाहिन्यांचा समावेश आहे. 1.4.2021 पासून डीडी फ्री डिश खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या समूहात 10 हिंदी जीईसी, 15 हिंदी चित्रपट, 6 संगीत, 20 बातम्या, 8 भोजपुरी, 3 भक्तीपर आणि 2 परदेशी वाहिन्यांचा समावेश असेल. डीडी फ्री डिश सध्या श्रेणीसुधारणा प्रक्रियेत आहे आणि मे 2021 पर्यंत त्याच्या समूहात आणखी काही वाहिन्या जोडल्या जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच एक ऑनलाइन वेब अॅप देखील जारी करण्यात आला आहे ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या जवळपासचे डीडी फ्री डिश सेट टॉप बॉक्स विक्रेते शोधण्यात मदत होते. भारतीय माध्यम आणि करमणूक क्षेत्रातील फिक्की-ईवाय अहवालाच्या मार्च 2021 मध्ये  प्रसिद्ध झालेल्या अहवालात डिजिटल पायाभूत सुविधांबरोबरच डिजिटल माध्यमांच्या अवलंबामुळे माध्यम आणि करमणूक क्षेत्रातील टीव्ही, रेडिओ, मुद्रित आणि डिजिटल इत्यादी माध्यम विभागातील सद्यस्थितीतले व भविष्यातील वाढीचे वातावरण दर्शविले गेले आहे.