Maitreya (मैत्रेय) -UPSC
Open in Telegram
Descriptive GS | Ethics | Essay | Current Affairs | Prelims Guidance by Dr. Ashish Jaitpal 🇮🇳 Building ethical & democratic civil servants for India's future. Address- https://maps.app.goo.gl/R1oEYDRTq2x65kMb8 Contact - @maitreyaupscmpscoffice
Show more3 956
Subscribers
+424 hours
+197 days
+5530 days
Posts Archive
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - गुणांच्या फेरपडताळणीबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
2 वर्षापूर्वी अशीच एका स्पर्धा परीक्षा विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती त्यामुळे हा व्हिडिओ बनवला होता. एकदा शांतपणे नक्की ऐका. आपल्या पालकांनाही ऐकायला लावा..
कोणता ना कोणता मार्ग असतोच, सापडतोच… आत्महत्या हा मात्र कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही समस्येवर उपाय नसावा.
🔥 व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…!
या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे.
ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया.
त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा.
या सर्व बाबी आपण
मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत.
⚠️ *महत्त्वाचे:*
*जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी.*
ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏
परीक्षा पेपरफुटी, गैरप्रकार किंवा परीक्षा प्रक्रियेतील अनियमिततेसंदर्भात विद्यार्थ्यांकडे कोणतेही ठोस पुरावे अथवा महत्त्वाची माहिती असल्यास ती संबंधित प्रतिनिधींशी संपर्क साधून सादर करावी. आपल्या माहितीमुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना निश्चितच बळ मिळेल.
कृपया अफवा किंवा अप्रमाणित माहिती प्रसारित न करता केवळ सत्य व उपलब्ध पुरावे दि. 8 आणि 9 सप्टेंबर या 2 दिवसात प्रत्यक्ष हजर राहून सादर करावे. एजन्ट लोकांबद्दल काही माहिती असेल तर तीही द्यावी.
GDP बाबत debate सुरू आहे. हे article government चा point of view मांडतो. Do read and note down important points from interview perspective.
प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हावा ही अपेक्षा.
#mpsc #trust
विद्यार्थी आक्रोश मोर्चा. उद्या सकाळी १० वाजता.
👆🏽विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या.
Reaction vs Response (प्रतिक्रिया वि प्रतिसाद)
#gs4 #ethics
Image source- Indian Express
धर्म कोणताही असो; त्याचे कट्टर, कडवे अनुयायी महिलांवर कसे अन्याय करतात याचा ताजा प्रत्यय केरळमसारख्या सुशिक्षित राज्यात दिसला. त्या राज्यातील इस्लामी पंडित, ज्येष्ठ धर्मगुरू कंथापुरम एपी अबू बकर मुस्लियार ऊर्फ ग्रँड मुफ्ती शेख अबूबक्र अहमद यांची ताजी मुक्ताफळे हे याचे उदाहरण.
‘‘स्त्रियांस सार्वजनिक मंचावर मज्जाव करायला हवा; त्यांचा सार्वजनिक वावर गोंधळ निर्माण करतो’’; हे या अबू बकरयांचे ताजे विधान. ते तेवढेच करून थांबत नाहीत. त्या राज्यातील महत्त्वाच्या शहरात भाषण करताना आपल्या या मुक्ताफळांच्या मांडणीत ते समोरच्या इडली पिठाचे दगडी वरवंटे-पाटे विकणार्या दुकानाकडे बोट दाखवून म्हणतात- ‘‘
ही दगडी यंत्रे अशी रस्त्यावर ठेवून गेल्याने काही फारसे बिघडत नाही. येणारे-जाणारे त्याकडे पाहणारही नाहीत. पण स्त्रियांचे असे नाही.स्त्रिरया म्हणजे गळ्यातील मोलाचे कंठभूषण. ते असे रस्त्यावर ठेवले तर येणारे-जाणारे त्यांस स्पर्श करतील आणि त्या दागिन्याचे सौंदर्य नष्ट होईल. म्हणून स्त्रियांस दागिन्यांच्या पेटीप्रमाणे सुरक्षित कुलूपबंद ठेवायला हवे.’’म्हणजे स्त्रियांस घरात कोंडून ठेवायला हवे, असे त्यांचे म्हणणे. या आपल्या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ ते इस्लामी धर्मग्रंथ कुराणाचा दाखला देतात. ‘‘कुराण म्हणूनच स्त्रियांस बुरख्यात ठेवण्यास सांगते. स्त्रिया सार्वजनिक मंचावर आल्या तर विध्वंस अटळ असतो’’, असे या धर्मगुरूंचे म्हणणे. वरवर पाहणारे स्त्रियांस त्यांनी किमती आभूषणांची उपमा दिली यात काही ‘सकारात्मकता’ पाहतीलही. पण तसे करून हे महाशय स्त्रियांच्या बंदिवासाचेच समर्थन करतात. हा धर्मसल्ला देताना अबूबक्र हे परंपरेचा आधार घेतात आणि त्यांचे अनुयायी (इस्लामी) धर्मोत्सव आता मशिदी आणि मदरसा यांचे कुंपण ओलांडून कसा ‘बाहेर’ गेला आहे याची आठवण करून देतात. धर्माने हे असे कुंपण ओलांडणे त्यांस मंजूर नाही. त्यामुळे धर्म भ्रष्ट होतो असे या अशा मागासांस वाटत असणार. हे असे वाटणे आणि तसे वाटणार्यांस समर्थन मिळणे हे कोणत्याही लोकशाही देशासाठी धोक्याचे आहे. कारण एकदा का हे ‘वाटणे’ स्वीकारार्ह होत गेले की त्यातून केवळ कट्टरपंथीयांचा उदय होतो; त्यांचे फावते आणि शेवटी त्यांच्या हाती धर्मसूत्रे जातात. आज अनेक देशांत हे कट्टरपंथीय इस्लामी स्वधर्मीयांचेच शिरकाण करताना आढळतात. ‘इस्लामला अशुद्ध केले’, ‘इस्लाम भ्रष्ट केला’ अशी कारणे पुढे करत हे विचारांध कट्टरपंथी बेलाशक स्वधर्मीयांची कत्तल करतात. विवेकास रजा देऊन एकदा का कट्टरता अंगी बाणण्यास सुरुवात झाली की अशांस सर्व काही खुपू लागते. युरोपातील बोस्निया- हर्झगोव्हिना या देशात या कट्टरपंथीयांनी मशिदी पाडल्या कारण त्यावरील घुमट बिगर-इस्लामी आहेत, असे त्यांचे म्हणणे. ते एक वेळ ठीक. पण आपल्याच धर्मबांधवांस कंठस्नान घालण्यासही या कट्टरपंथीयांनी कमी केले नाही.
मल्याळींचा ओणम नुकताच साजरा झाला. त्यात हिंदू तरुणींच्या जोडीने ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मीयही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात आणि यंदाही ते तसे झाले. या भिन्नधर्मीय तरुण-तरुणींच्या उत्सवी उत्फुल्लतेचा धर्मनिरपेक्ष आविष्कार देशाने नुकताच पाहिला.त्याच राज्यात इस्लामी धर्मगुरू महिलांच्या कुलूपबंदतेचे, बुरख्याचे समर्थन आणि आवाहन करत असेल तर त्यामागील धोका दुर्लक्ष करण्यासारखा नाही.
हा कोणता धर्म? तरीही त्याचे ज्यांस पालन करावयाचे आहे त्यांनी ते खुशाल करावे. पण आपापल्या मठीच्या चार भिंतींच्या आत. या मठीचा उंबरठा ओलांडून बाह्य जगात आले की एकाच धर्माचा अंमल हवा. हा धर्म म्हणजे देशाचे संविधान.हे संविधान स्त्री-पुरुष असा भेद करत नाही. पुरुषांस जे स्वातंत्र्य देते ते आणि तितकेच स्वातंत्र्य महिलांसही देते. तेव्हा या संविधानाचा अनादर करत महिलांस घराबाहेर पडू देऊ नका असे सांगण्याचा अधिकार या धर्मगुरूंस दिला कोणी? ते भले असतील ‘ग्रँड मुफ्ती’ किंवा अन्य काही. पण ते स्वधर्मवास्तूच्या आत. बाहेर महिलांनी कसे वागावे वगैरे प्रवचनांचा, मर्यादा निश्चितीचा अधिकार त्यांस नाही.
‘धार्मिकता’ या संकल्पनेप्रमाणे ‘मर्यादा’ ही संकल्पनाही बिचारी स्त्री-लिंगी. तिचे नियंत्रण करू पाहणारा ‘धर्म’ मात्र पुरुषी. अन्य अनेक मुद्द्यांप्रमाणे याबाबतची घृणास्पद पुरुषसत्ताकताही मोडून काढणे गरजेचे आहे. कंथापुरम एपी अबू बकर मुस्लियार यांचे ताजे वक्तव्य ती गरज अधोरेखित करते.(आजच्या लोकसत्ता संपादकीय मधील काही भाग. Utility- GS1 - भारतीय समाज; Ethics GS4; Essay) #gs1 #gs2 #gs4 #essay
पूर्व परीक्षेचा पेपर मराठी मधे उपलब्ध करून देण्याची मागणी UPSC ने फेटाळली.
Artificial Intelligence बाबत बिल गेट्स यांचे मत. (Essay , Ethics सोबत इतर GS मधील AI मुळे निर्माण आव्हाने यावर प्रश्न आल्यास उपयुक्त ठरतील असे arguments 👇🏽)
अलीकडेच 'मायक्रोसॉफ्ट'चे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत म्हणजेच एआयबाबत दिलेल्या अत्यंत गंभीर इशाऱ्याची भर पडली आहे. त्यांच्या मते, जग आज 'एआय' मुळे उद्भवणाऱ्या आव्हानांसाठी पुरेसे तयार नाही. अधिक चिंतेची बाब म्हणजे या परिवर्तनाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिणामांना तोंड देण्यासाठी आज जगाकडे कोणतीही सर्वसमावेशक योजना अस्तित्वात नाही.
बिल गेट्स यांनी तीन प्रमुख धोक्यांकडे लक्ष वेधले. पहिला धोका म्हणजे रोजगारविश्वातील अभूतपूर्व उलथापालथ. औद्योगिक क्रांतीपासून संगणकयुगापर्यंतच्या सर्व तांत्रिक बदलांनी मानवी श्रमांची जागा घेतली; परंतु 'एआय' प्रथमच मानवी विचारशक्ती, निर्णयक्षमता आणि ज्ञानप्रक्रियेलाच पर्याय निर्माण करीत आहे. त्यामुळे कायदा, वैद्यक, ग्राहकसेवा, उत्पादनक्षेत्र आणि इतर अनेक ज्ञानाधिष्ठित व्यवसायांतील लाखो नोकऱ्या पुढील दशकात कायमस्वरूपी नाहीशा होऊ शकतात, अशी भीती आहे. इतिहासातील प्रत्येक तांत्रिक क्रांतीनंतर नवीन रोजगार निर्माण झाले, हा युक्तिवाद येथे पुरेसा ठरत नाही; कारण यावेळी स्पर्धा मानवी हातांशी नव्हे तर मानवी बुद्धीशी आहे.
दुसरा धोका अधिक भयावह आहे. 'एआय' मूलतः दुष्ट नाही. तरीही हे तंत्रज्ञान दुष्ट हेतू असलेल्या व्यक्ती, संघटना किंवा राष्ट्रांच्या हातात अभूतपूर्व शक्ती देऊ शकते. सायबर हल्ले, आर्थिक फसवणूक, डीपफेकद्वारे जनमताचे नियंत्रण, माहितीचे विकृतीकरण आणि अगदी जैविक दहशतवाद यांसारख्या क्षेत्रांतही एआयचा गैरवापर होऊ शकतो. 'एआय'ची वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की ते ज्ञान, विश्लेषण आणि सर्जनशीलता यांनाही शस्त्रात रूपांतरित करू शकते.
तिसरा धोका समाजाच्या सांस्कृतिक आणि भावनिक रचनेशी संबंधित आहे. गेट्स यांच्या मते, 'एआय' चॅटबॉट्स आणि डिजिटल साथीदार मुलांच्या मानसिक विकासावर प्रतिकूल परिणाम करू शकतात. मानवी नातेसंबंध, मैत्री, सहानुभूती आणि प्रत्यक्ष सामाजिक संवाद यांच्या जागी कृत्रिम संवाद येऊ लागला तर समाज अधिक एकाकी, भावनिकदृष्ट्या कमकुवत होण्याचा आणि त्यात तुटलेपण येण्याचा धोका आहे. तंत्रज्ञानाने लोकांना जोडण्याचे वचन दिले होते; परंतु अनेकदा त्याने त्यांना वेगवेगळ्या डिजिटल बेटांवर नेऊन उभे केले 'एआय' ही प्रक्रिया आणखी वेगवान करू शकते.
या पार्श्वभूमीवर बिल गेट्स हे केवळ इशारा देऊन थांबले नाहीत. त्यांनी 'एआय' साठी राष्ट्रीय पातळीवरील समन्वय संस्थांची तसेच अण्वस्त्र तपासणी किंवा विमानसुरक्षेसाठी अस्तित्वात असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थांप्रमाणे जागतिक नियामक संस्थेची मागणी केली. विशेषतः त्यांनी 'ह्युमन रिझर्व्हड' (मानवासाठी आरक्षित) या संकल्पनेचा प्रस्ताव मांडला. काही व्यवसाय आणि सामाजिक भूमिका या तांत्रिकदृष्ट्या एआय करू शकत असला, तरी त्या जाणीवपूर्वक माणसांसाठी राखून ठेवाव्यात, असे त्यांचे मत आहे. प्रश्न फक्त कार्यक्षमतेचा नाही. मानवी प्रतिष्ठेचा योग्य सन्मान न ठेवता कोणतेही तंत्रज्ञान समाजात स्वीकारले जाणे शक्य नाही.
#ai #appliedethics #essay #artificalintelligence
