964
Subscribers
No data24 hours
No data7 days
-1030 days
Posts Archive
+9
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे आणि आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीने मुंबईसाठी नव्या समीकरणांची आखणी सुरू केली आहे. या प्रक्रियेत, मुंबईतील जेष्ठ कार्यकर्त्यांची प्रत्येक प्रभागात चार प्रभाग समन्वयक म्हणून नियुक्ती केली जात आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग समन्वयकांची मुख्य भूमिका -
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीवर कार्य करणे, संबंधित प्रभागात पक्षाचा प्रचार करणे, संघटनात्मक बळकटी करणे, स्थानिक लोकांच्या समस्या समजून घेणे आणि त्या मुंबई प्रदेश कमिटीपर्यंत पोहोचवणे
दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रभाग समन्वयक हे वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार असतील.
गेल्या महिन्याभरात झालेल्या विविध मुलाखतीनंतर, वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे आणि मुंबई प्रदेश महासचिवांनी खालील तालुकानिहाय प्रभाग समन्वयकांची दूसरी यादी घोषित केली आहे.
https://www.facebook.com/share/1C2LeFSFdU/
उद्धव ठाकरे यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष सत्ता होती. प्रत्येक वर्षी 80 हजार कोटींचे कंत्राट दिले गेले त्यापैकी तुम्ही किती मराठी माणसाला कंत्राट दिली? याची यादी उद्धव ठाकरेंनी जाहीर करावी.
जोपर्यंत तुम्ही राज्याच्या माणसानं पुढे आणत नाही, तोपर्यंत तो पुढे राहणारच नाही.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#मुंबई #mumbai #BMC
https://x.com/VBAforIndia/status/1943205537446855077?t=dMHRHlXLVulQRYIAGveRzg&s=19
+2
मैं कल से बोधगया में हूं, और आज भी #महाबोधि_मुक्ति_आंदोलन में अपने सहयोगियों के साथ सहभागी होकर मैंने अपना समर्थन दोहराया।
आज मैंने राजगीर और नालंदा जाकर बौद्ध समाज के वैभवशाली और समृद्ध इतिहास का प्रत्यक्ष अनुभव किया।
देश की पहचान बुद्ध से है, यह बात सरकार को नहीं भूलनी चाहिए।
वंचित बहुजन आघाड़ी बौद्धों के सामाजिक, धार्मिक और राजनैतिक अधिकारों और महाबोधि महाविहार की मुक्ति के लिए अपना संघर्ष निरंतर जारी रखेगी।
जय भीम. नमो बुद्धाय.
- सुजात आंबेडकर
https://x.com/Sujat_Ambedkar/status/1941899350306877866?t=N8Zzi4r_ZLt_3c-D5sX6ng&s=19
औरंगाबादमध्ये अतिक्रमण बेकायदेशीररित्या हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
औरंगाबाद : सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा पायमल्ली करून संजय नगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद येथील अतिक्रमण बेकायदेशीररित्या हटवण्यात आल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्यावतीने औरंगाबाद महानगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
बेकायदेशीररित्या अतिक्रमण पाडले तर आता त्यांचे पुनर्वसन करून घरे बांधण्यासाठी अडीच लाख रुपये शासनाने द्यावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे, राज्याचे नेते अमित भुईगळ, राज्य प्रवक्ते तय्यब जफर, युवा आघाडी राज्य सदस्य अमोल लांडगे, पंकज बनसोडे, सतीश गायकवाड यांच्यासह शेकडो जण उपस्थित होते.
https://x.com/eprabuddhbharat/status/1937447521317511628?t=Gi79HJ0Ty8WLHYPptOdAQg&s=19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आश्चर्यकारक 76 लाख मतदान वाढीच्या विरोधात लढणारा...
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी EVM च्या विरोधात सातत्याने लढणारा...
एकमेव पक्ष
वंचित बहुजन आघाडी
https://x.com/VBAforIndia/status/1936455748277379568?t=xGXlkwmxntpPUI9TmDiqyA&s=19
बाळासाहेब आंबेडकर यांनी २१ प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना ईव्हीएम विरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले होते.
यामध्ये काँग्रेसचा सुद्धा समावेश होता पण कोणत्याही पक्षाचा ईव्हीएम विरुद्ध लढ्याबद्दल कोणताही प्रतिक्रिया समोर आली नाही.
: उत्कर्षाताई रूपवते
राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी
https://x.com/VBAforIndia/status/1933736156317036719?t=ZH9Q1roHH6Vj8eRcQjxsqw&s=19
वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर, माढा, उस्मानाबाद शहर जिल्हा कमिटीची नियोजन बैठक
बैठकीत संघटनात्मक बांधणी, युवकांमध्ये जनजागृती, आगामी निवडणूक धोरण आणि स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना यावर सखोल चर्चा
सोलापूर – वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर, माढा व उस्मानाबाद शहर जिल्हा कमिटीची नियोजन बैठक आज मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत आगामी राजकीय दिशा व कार्यपद्धतीबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नितीन ढेपे (राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य) उपस्थित होते. त्यांच्यासोबत प्रा. सोमनाथ साळुंके (महाराष्ट्र कार्यकारणी उपाध्यक्ष तथा सोलापूर निरीक्षक), अमोल लांडगे (युवा निरीक्षक – सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद), सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखंबे, माढा जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण तसेच इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत संघटनात्मक बांधणी, युवकांमध्ये जनजागृती, आगामी निवडणूक धोरण आणि स्थानिक प्रश्नांवर उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.
या बैठकीत वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम पारसे यांचे नुकतेच झालेल्या दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उपस्थित सर्व मान्यवरांनी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
या बैठकीमुळे पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
https://x.com/eprabuddhbharat/status/1933174376750534996?t=4Nf26c1TwphL8udSpUNYAg&s=19
सिद्धार्थ गार्डन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे पालकमंत्र्यांना निवेदन
औरंगाबाद – शहरात नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिद्धार्थ गार्डनमध्ये वेगवान वाऱ्यामुळे स्लॅब कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबादचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीने निवेदनात असा आरोप केला की, बीओटी (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) तत्वावर बांधण्यात आलेल्या सिद्धार्थ उद्यानात बांधकामदरम्यान गंभीर हलगर्जीपणा झाला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. यासाठी संबंधित ठेकेदार, अभियंता आणि जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम 103 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने या दुर्घटनेच्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत, मृत महिला कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई आणि सरकारी मदत तात्काळ देण्यात यावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे केली.
या निवेदनामुळे शहरात झालेल्या दुर्घटनेबाबत जनतेच्या मनातील अस्वस्थता आणि रोष शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे.
https://x.com/eprabuddhbharat/status/1933176661169918144?t=-7oPB4xitDFY2mazvMRoFw&s=19
EVM और चुनावी गड़बड़ी के खिलाफ लड़ने वाली एकमात्र पार्टी - वंचित बहुजन आघाड़ी है।
https://x.com/VBAforIndia/status/1932412901433995752?t=Rcmft57Nupb-JIehtI9RWQ&s=19
सोमनाथ सूर्यवंशी केस अपडेट -
सोमनाथ सूर्यवंशी की न्यायिक हिरासत में हुई मृत्यु मामले में आज कोर्ट में सुनवाई हुई।
हमने इसमें दो बातें प्रस्तुत कीं। न्यायिक हिरासत में हुई मृत्यु की मजिस्ट्रेट द्वारा जांच के बाद आगे क्या किया जाना चाहिए? इस संबंध में कानून में प्रावधान अधूरा है। हमने अदालत से मांग की कि इसे पूरा किया जाए। अदालत ने कहा कि इस पर कानून होना चाहिए।
हमने मांग की है कि अदालत को सोमनाथ सूर्यवंशी मौत मामले में SIT का गठन करना चाहिए। अदालत ने हमारी बात सुन ली है। उम्मीद है कि इस संबंध में जल्द ही आदेश जारी कर दिया जाएगा। एक आदेश SIT की नियुक्ति से संबंधित होगा, जबकि दूसरा कानून में त्रुटियों से संबंधित होगा।
सरकार द्वारा नियुक्त CID समिति ने अपनी रिपोर्ट तैयार कर ली है। इसे अंतिम रूप नहीं दिया जा सका क्योंकि अदालत ने उनकी कार्यवाही पर रोक लगा दी थी। सोमनाथ की मृत्यु न्यायिक हिरासत में हुई थी, इसलिए हमने मांग की कि अदालत उन्हें न्याय दिलाए और इसलिए अदालत इसकी निगरानी के लिए एक SIT नियुक्त करे। अदालत हमारी बात सुन रही है। इस संबंध में आदेश जल्द ही आएगा।
इस मामले की सुनवाई समाप्त हो गई है। यदि यह कानून पूरा हो गया तो यह देश भर में न्यायिक हिरासत में मौत के मामलों पर लागू होगा।
#JusticeForSomnathSuryawanshi
मा. ॲड. प्रकाश आंबेडकर
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1932071905089003544?t=FvL4vEVApqEfkAUirl47_w&s=19
बीड येथील वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कमिटीचे पदाधिकारी सकाळपासून धनंजय केशर यांच्यासोबत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष अजय सरवदे (धनंजय यांच्या शेजारी पांढऱ्या शर्टमध्ये बसलेले व्यक्ती) यांनी शिरूर कोर्टात जाऊन पीडित वैभव खंडागळे यांच्या कुटुंबीयांवर दाखल झालेल्या खोट्या खटल्यांमधून त्यांना जामीन मिळवला.
आज दुपारी मी पीडित वैभव खंडागळे यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांच्या संपर्कात आहे.
मी बीडच्या पोलीस अधीक्षकांशीही बोललो असून त्यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. स्थानिक पोलिसांकडून झालेली चूक आणि विलंब पुन्हा होणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
वंचित बहुजन आघाडी पीडिताला मदत करण्यासाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचली आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहील.
जय भीम 💙
― @Sujat_Ambedkar
युवा नेते, वंचित बहुजन आघाडी
https://x.com/VBAforIndia/status/1932111665686081920?t=Acp8psfv-u_bz3OXLDOUDg&s=19
📍 ११ मे २०२५, न्यूज बुलेटिन ―
-------------------------------------
◆ भारत पाकिस्तान युद्ध विरामानंतरही पाकिस्तानकडून बॉर्डरवर गोळीबार!
◆ पाकिस्तान हा धोकेबाज देश - ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पाकिस्तानच्या कृतीवर टीका
◆ युद्ध विरामानंतरही अवकाशात रॉकेट, बॉम्ब गोळ्यांचा मोठा स्फोट - जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची ट्विट करत माहिती!
◆ भारत पाकिस्तानमधील युद्ध विराम भारताच्या शर्तींवर झाला की अमेरिकच्या शर्तींवर ? - ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकार सवाल !
◆ भारत पाकिस्तान युद्ध थांबल्याची घोषणा करून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला नायकाच्या रुपात दाखवले!; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया!
◆ मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पहलगाम पीडितांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन; अनेकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.
◆ वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम शहर अध्यक्ष पंकज बनसोडे यांच्याकडून स्वाभिमान दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
◆ स्वाभिमान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जालना सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबीर!
◆ उस्मानाबादमध्ये स्वाभिमान दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न!
◆ स्वाभिमान दिनानिमित्त तुळजापुरात रक्तदान शिबीर!
◆ वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाईतर्फे शासकीय रक्तपेढीत रक्तदान शिबिर!
◆ राजेंद्र पातोडे लिखित आणि प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस प्रकाशित आंबेडकरी चळवळीचा अकोला पॅटर्न (1920-2024) या पुस्तकाचे १४ मे रोजी मुंबईत प्रकाशन!
#PrabuddhBharat #NewsUpdate
#newsbulletin
https://x.com/eprabuddhbharat/status/1921385947498770620?t=m3o6xEU4MJuTyiQ2aGPTUg&s=19
+1
नॅशनल इक्वल पार्टी व आंबेडकर युवाशक्ती संघटन वाराणसी यांच्या माध्यमातून वाराणसी, उत्तर प्रदेश येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमात घेण्यात आला होता.
या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले.
#Varanasi
#bhimjayanti2025
https://www.facebook.com/share/12Dck3NVD6Q/
शरद पवारांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना
पाठविलेले पत्र आयोगासमोर सादर करावे
भीमा कोरेगाव आयोगाकडे ॲड. प्रकाश आंबेडकरांचा अर्ज
पुणे : भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगासमोर बुधवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे एक महत्त्वाचा अर्ज दाखल केला. या अर्जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सादर करण्याची मागणी करण्यात आली. या पत्रात "भीमा कोरेगाव येथील हिंसाचार पूर्वनियोजित होता," असे नमूद करण्यात आले होते. संबंधित पत्राची बातमी तत्कालीन सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती.
शरद पवार यांच्याकडे जर हे पत्र अस्तित्वात असेल, तर ते आयोगासमोर सादर व्हावे, अशी आमची भूमिका असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी म्हटले आहे. आयोगाने आमची बाजू विचारात घेतली असून, या संदर्भातील निर्णय आयोग घेणार आहे. लवकरच या संदर्भातील पुढील सुनावणी होईल.
---
#BhimaKoregaon
#PrabuddhBharat
https://x.com/eprabuddhbharat/status/1914979545343537429?t=zpw-91vg5KrVmQilNyILjQ&s=19
