6 969
订阅者
-124 小时
+37 天
+530 天
帖子存档
मित्र वणव्या मध्ये गारव्या सारखा...❤️
नायब तहसीलदार असणारा मित्र कोणताही गाजावाजा न करता दर महिन्याला अभ्यास करणाऱ्या मित्रांना न चुकता आर्थिक मदत करतो. दोघा-तिघांना व्यवसाय सुरु करून दिलेत. वाईट काळात दोघात एक डबा, कटिंग चहा, महिना अखेरची तंगी आणि उधाऱ्या विसरू नका. मित्रांना मागे सोडू नका.पोस्ट मिळाल्यावर बदलू नका. तुम्हाला पोस्ट मिळाल्यावर लोकांसाठी तुम्ही साहेब होता मित्रासाठी तुम्ही मित्रच राहता एवढे लक्षात ठेवा.
पोस्ट मिळाल्यावर सरड्यासारखे रंग बदलणारे आणि तुमच्या अभ्यासात चूका काढून तुम्हाला टाळणारे मित्र आपण सर्वांनी अनुभवले आहेत. पैसे द्यायचे सोडा चुकून फोनही करत नाहीत हेही तुम्ही अनुभवले असेल.
तुमचे मित्र वरच्या वर्गवारीत नसतील तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात...
मैत्री दिवसाच्या सर्व मित्रांना खुप साऱ्या शुभेच्छा!
#FriendshipDay💯❤️
♦️ आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीवरील उमेदवारांच्या खात्याच्या केवायसीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
+4
प्रलंबित जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी आणि जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती बाबत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते यासारखी शोकांतिका कोणती नाही.
#WRD_JE
#WCD_Recrutiment
जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग आणि जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत यांत्रिकी पदभरती बाबत जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करा.
आयुष्य खूप सुंदर आहे... फक्त
स्वतःवर प्रेम करता आले पाहिजेय
हे व्यर्थ कारणासाठी संपवू नका...
वरील एक सुंदर उदाहरणं IAS कशीश सर
सरांना त्यांचा आवडी साठी IAS पद सोडले आहे
आदिवासी बहुल आठ जिल्ह्यात सुधारित आरक्षण बिंदूनामावली लागू करणेबाबतचा शासन निर्णय
आजचा GR
यात सर्व प्रवर्गातील आरक्षणाची टक्केवारी दिली आहे
Motivational Words
आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड - रडरड करायला लावते.
अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.
खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..!
एक अशी वेळ,
ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.
अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.
एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.
ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.
त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!
तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल.
Telegram वर जागा वाढ होणार नाहीत - पूर्वानुभव नुसार ...
Telegram वर दिसणारे आकडे फक्त दिसायला गोड दिसतील पण,
मनाला शांती नाही देऊ शकत... 😊
PSI , SR जागा आणायच्या असल्यास संयुक्तीक प्रयत्न करणे गरजेचे आहे...
जर २०२४ ला PSI जागा GAD मधुन परत जाऊ शकतात तर लाडकी बहीण मुळे काहीही होऊ शकत... 💔#सध्या विश्वास ठेवणे अयोग्य... #जागावाढ साठी आता पासुन पाठपुरावा करणे गरजेचे...
