759
订阅者
无数据24 小时
+17 天
-630 天
帖子存档
जरांगे पाटील यांना जी आश्वासनं दिली ती त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत. त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही आमच्या शासनाची राहिलेली आहे.
राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो
देवाभाऊंना एक मेसेज आणि
केदारनाथमध्ये अडचणीत सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ६० शिवभक्तांना आधार!
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील महूद गावातील सुमारे ६० शिवभक्त कावड घेऊन मोठ्या श्रद्धेने केदारनाथ यात्रेसाठी गेले होते. भगवान शंकराच्या चरणी अभिषेक करून महाप्रसादाचे वाटप केले उरलेला महाप्रसाद स्थानिकांना वाटत असतानाच महाप्रसाद वाटू नका म्हणत काही स्थानिक हॉटेल व्यावसायिकांनी वाद घालत वातावरण तणावपूर्ण केले. परिस्थिती इतकी चिघळली की ६० जनामधल्या काही कावडधारकांना मारहाण करण्यात आली, तर काहींना पोलीस ठाण्यात थांबवून ठेवण्यात आले.
हजारो किलोमीटर दूर, परक्या राज्यात अडचणीत सापडलेल्या या शिवभक्तांना त्या क्षणी कोणताच आधार दिसत नव्हता. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र कुठूनही ठोस मदत मिळाली नाही.
अखेर एका शिवभक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीसाठी एक मेसेज पाठवला…
आणि काही क्षणांतच आशेचा किरण दिसू लागला.
मुख्यमंत्री देवाभाऊंनी तात्काळ आपल्या कार्यालयाला सूचना दिल्या. मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तराखंड सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी तातडीने समन्वय साधला. जे पोलीस आधी कठोर भूमिका घेत होते, तेच पोलीस नंतर भाविकांच्या संरक्षणासाठी आणि मदतीसाठी पुढे आले. स्थानिकांनी लपवून ठेवलेली कावड शोधून देण्यात आली आणि सर्व भाविकांना सुरक्षितपणे खाली आणण्याची व्यवस्था करण्यात आली व महाराष्ट्रातील या ६० शिवभक्तानी सुटकेचा निश्वास टाकला.
आज सर्व भाविक आणि त्यांची कावड सुखरूपपणे महाराष्ट्राच्या दिशेने परतीचा प्रवास करत आहेत.
याच दरम्यान, २३ वर्षीय एका तरुणाची प्रकृती गंभीर बिघडली. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याला श्रीनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या उपचारांवरही मुख्यमंत्री कार्यालयाने विशेष लक्ष ठेवले आणि आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून दिली.
एका मेसेजवर तत्काळ प्रतिसाद देत संकटात सापडलेल्या ६० शिवभक्तांना सुरक्षिततेचा, विश्वासाचा आणि आधाराचा हात देणारे नेतृत्व म्हणजे देवाभाऊ!
संकटाच्या क्षणी फोन उचलणारे अनेक असतात, पण मदतीसाठी यंत्रणा उभी करणारे नेते फार थोडे असतात…
सत्ता अनेकांकडे असते, पण संकटात धावून येणारे नेतृत्व एकच — देवाभाऊ! 🙏🚩
अवघ्या 48 तासांत 30 गावांची अडचण सोडवली. देवाभाऊंनी गडचिरोलीच्या नागरिकांना फोनवर शब्द दिला होता तो मार्गी लागायला सुरवात झाली.
जागतिक संघर्षामुळे जगभर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका...पण भारताने नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत परिणाम मर्यादित ठेवला
अठरा पगड जातींना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवछत्रपतींची शिकवण अंगीकारलेला हा शिवपाईक... समाजाला समोरासमोर उभे करण्याचा नाही, तर खांद्याला खांदा लावून एकत्र आणण्याचा विचार करतो. कितीही राजकारण झाले तरी शिवछत्रपतींची शिकवण आणि देशाच्या संविधानाचा सन्मान हाच आमचा ध्यास आहे.
मराठा समाजाच्या भल्यासाठी देवेंद्रजींनीच जास्त योगदान दिले आहे आणि देत राहतील
कोणत्याही समाजावर अन्याय होऊ न देता समाजाच्या मागण्या पूर्ण करणे हेच देवाभाऊंचे ध्येय राहिले आहे आणि त्याचे ध्येयाने तेआजपर्यंत काम करत आहेत !
अठरा पगड जातींना एकत्र आणून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याऱ्या शिवछत्रीपतींची शिकवण आणि त्यांचा प्रतिपालन करणारा शिवपाईक
जागतिक संकटामुळे सर्वच देशांमध्ये इंधनाचे दर वाढले आहेत. याद्धाचे सावट दूर होताच दर पुन्हा स्थिरावतील
देशातील पहिला सीबीजीचा प्रकल्प जवळपास तयार झाला असून याद्वारे नागपुरातील १२०० मे. टन कचऱ्यावर प्रक्रीया केली जाणार आहे (हिंदी)
ओबीसी समाजाने घाबरण्याचे कारण नाही. एका समाजाचे आरक्षण काढून ते दुसऱ्या समाजाला देणार नाही. ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही
मराठा आरक्षणाच्या बाबतीत महायुती सरकारने जितके निर्णय घेतले तितके कधीच झाले नव्हते. आरक्षणाबाबत सरकार सरकार सकारात्मक आणि पारदर्शक आहे व राहील. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ न देता न्यायालयाच्या अधीन राहून निर्णय घेणार
देशातील पहिला सीबीजीचा प्रकल्प जवळपास तयार झाला असून याद्वारे नागपुरातील १२०० मे. टन कचऱ्यावर प्रक्रीया केली जाणार आहे
देवाभाऊंनी अवघ्या तीन मिनटात मुंबईमध्ये कसे अविश्वसनीय परिवर्तन होणार आहे ते सांगितलं आहे ! व्हिडीओ शेवट्पर्यंत पहा !
मुंबईला जोडणारी नवी कनेक्टिव्हिटी...मुंबईची वॉटर मेट्रो मुंबईत दाखल...
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
