𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
الذهاب إلى القناة على Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
إظهار المزيد3 820
المشتركون
-324 ساعات
-27 أيام
+1730 أيام
أرشيف المشاركات
जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
प्रत्येकाच्या आयुष्यात श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक असेल तर आयुष्याचे युद्ध कितीही कठीण असले तरी लढता येत..!💯
@rutuja_writes1203
शिवछत्रपतीचे नाव पडता कानी अभिमानाने भरून येते आपली छाती, त्यांनीच निर्माण सगळ्या रयेतेत आपुलकीची नाती, शिवरायांचे गुणगान वाचून हरली माझी मती, किती सांगू मी त्यांची महती, सर्व जगात आपल्या राज्यांची कीर्ती, यांनीची जपली हो सत्याची नीती, म्हणूनच माणसाच्या जन्माला दैवत प्राप्त करणारे आपले राजे शिवछत्रपती!,,✍🏻
🚩👏🏻
एकमत#लेखक
@Ommshelke
शिवराय हे नाव ऐकायताचं आठवत तो अफझलखानवध शाहिस्तेखानाचे बोटे आणि आग्र्याहून सुटका किंवा आठवतो स्वराजभिषेक किंवा अजून दक्षिणदिग्विजय बस झालं इतकेच ते पण साहजिकच आहे म्हणा कारण आपल्याला फक्त शिवराय राजकीयदृष्ट्या सांगण्यात आले मात्र त्यांच सामाजिक जीवनावर खूप कमी लोकांनी अभ्यास केला शिवछत्रपतीनी सामाजिक क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली. त्यांचे सामाजिक कार्य अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण होते ते समजून घ्यायला आपलं पूर्ण आयुष्य कमी पडेल तरीही त्याचं रयतेच्या हिताचे महत्वपूर्ण कार्य थोडक्यात जाणून घेणाचा आपण छोटासा प्रयत्न करू छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक कामे केली जसं की त्यांनी पहिल्यांदा जमिन मोजणीला सुरुवात करून योग्य करप्रणाली लागू केली तेव्हा त्यांनी अईनं झिंनस म्हणजे आताची कर्जमाफी योजना तेव्हा महाराजांनी सुरू केली शेतकऱ्यांना बी-बियाणे, बैल आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून देने त्यांना सर्व सुखं सुविधा पुरवणे शिवछत्रपतीचा सर्व मावळ्यांना आदेश होता की शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठाला हात लागता कामा नये व त्यांना कसलही दुःखं होऊ नाही म्हणून त्यांनी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना सर्वपरी मदत केली आपल्या जाणत्या राज्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी नवनवीन उपाययोजना राबविल्या खेळशिवापुरचं धरण त्यातील एक उदाहरण ठरतं कोयना नदीवर पूल असे छत्रपती, महाराजांनी अनेक लहान-मोठे पूल आणि बंधारे बांधले, जे त्यांच्या सामजिक कार्याची अजून पण साक्ष देत आहेत आणि त्यांची न्यायव्यवस्था: एवढी पारदर्शक होती की त्यांच्या स्वराज्यात सगळ्या रयतेला ताबडतोब न्याय मिळल होता छत्रपती शिवाजी महाराजांनी असे एक मजबूत आणि न्यायपूर्ण न्यायव्यवस्था तयार केली. त्यांनी लोकांना त्वरित आणि योग्य न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले. त्यांनी स्वतः अनेक खटले हाताळले आणि न्यायनिवाडा केला याचं अधिक एक उदाहरण म्हणजेच राझ्याच्या पाटलाचा केलेला चौरंग लक्षात येतो महाराजांनी महिलांचा नेहमी आदर केला त्यांचं तर घोषवाक्य होत प्रत्येक स्त्री ही मराठ्यांच्या देवऱ्यातील देवता आहे तिचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे हे फक्त घोषणा न्हवती तर त्याच आचरण पण तसेच होत इतिहासात तसा एक उल्लेख पण आढळतो कल्याणच्या सुबेदारांय्या सुनेला आई म्हणून दिलेला मान आपल्यासाठी आदर्श आहे छत्रपती शिवरायांनी वेळोवेळी घेतलेली महिलांच्या सुरक्षेची काळजी आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या ह्या आताच्या काळात शिकण्यासारख्याचं आहेत,महाराजांनी दूरदृष्टी इतकी जबरदस्त होती की त्यांना तेव्हाच कळतं होत की आपल्या स्वराज्याला भीती जमिनीवरून नाहीच तर ते समुद्रातुन आहे म्हणून राज्यांनी आपलं स्वतःचं सुंदर आरमार उभं केलं याचा फायदा झाला की आपल्या देशी मालाला जागतिक बाजारपेठेत उपलब्ध झाली तेव्हा ही गोष्ट अशक्य होती या एका युगपुरुषयांने शक्य करून दाखवली
म्हणून तर म्हणतात त्यांना भारतीय नौदलाचे जनक श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांच्या सामाजिक कार्याला उजाळा देण्याचा छोटेखानी प्रामाणिक प्रयत्न केला मी बाकी काहीच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे सामाजिक कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांनी एक आदर्श समाज निर्माण करण्याचा नेहमी प्रयत्न केला तरी पण काही कमी बुद्धीचे लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का मी म्हणतोय नाही देवापेक्षा पण आपल्यासाठी अधिक होते कारण त्यांच्यामुळेच दिसत आहे प्रत्येक मंदिरावरचा कळस आणि आपल्या अंगणात तुळस आणि त्याच्यामुळेचं अजूनपर्यंत सुरक्षित आहे आपल्या गोठ्यातली गाय व घरातील माय,,
छत्रपती शिवाजी महाराजांना या महान कार्यासाठी त्रिवार मानाचा मुजरा घालतो🚩👏🏻 आणि सर्वाना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो🌺🚩🙏🏻
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🌼🌼🌼
मी तुमच्या मधलाचं एक शिवविचारांचा पाईक
ओम संध्या मोहन शेळके
@Omsmshelke
ज्ञान हे असं एक माध्यम आहे की त्यापासून आपण काही पण साध्य करू शकत फक्त आपल्याकडे थोडा संयम हवा आणि आपलं ध्येय प्राप्तकरण्यासाठी जरा अधिक जिद्द हवी मग आपली परिस्थिती कितीही बिकट असो मनस्थिती सकारात्मक असली की झालं मग ती अश्यक्य वाटणारी गोष्टपण शक्य होताना दिसू लागले फक्त स्वतःच्या ज्ञानावर विश्वास हवा!,,✍🏻
एकमत#लेखक
@Ommshelke
तुम्ही कोणापासून कितीही दूर राहा
पण तुमच्या चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची
आठवण होतच असते.. म्हणूनच स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं मोठ धन आहे... 💫
मला जर एखाद्यानी विचारले, की तुझ्याजवळ असं काय आहे ज्यात तु स्वतः ला नशीबवान समजशील..
तर माझं उत्तर :" बाबा "
मी फक्त एक नाव सांगितलं.. पण या एका व्यक्तीचे माझ्या आयुष्यात खूप सारे role आहेत..
जेव्हा कधी मला low down feel होत, मला माझ्या मनातलं व्यक्त करावंस वाटलं, त्यावडेस..
बाबाचा रोल सोडुन तो माझा मित्र बनतो...
मला नेहमी सांगत असतो सुख काय दुःख काय, कोणतीही परिस्थिती असो खचायचं नाही..
सर्वोत्तम सल्लागार सुद्धा आहे तो माझ्यासाठी..
नेहमी माझ्या decision मध्ये मला सोबत असतो.. तुला वाटते तस कर... मी नेहमीच तुझ्यासोबत आहे असं म्हणतो..
पण खरंच खूप चांगला मार्गदर्शक पण आहे तो माझ्यासाठी..
बाबांनी मला बोट धरून चालायला शिकवलं, पडल्यावर तर उठवलंच, पण आधी तोल सावरायचं कसं हे शिकवलं..
माझ्यासाठी तो खूप चांगला "गुरु "सुद्धा आहे..
घरी असल्यावर मला खूप काम होतात म्हणून, कामामध्ये तर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी मला करू लागतो..
माझी खूप काळजी करणारा
मायेसारखी माया आहे त्याच्यामध्ये..
आणि खरंच तो माझी "आई "सुद्धा बनतो..
मी देवाला मानत नाही असं नाही..
पण देवापेक्षाही ज्याला मानते...
ते माझे बाबा आहेत.. 💚!
-नेहा
🌿कोणतंही यश सहजासहजी
मिळत नाही.🌿
🍁आयुष्यातल्या अनेक
आनंदाकडे पाठ फिरवून,
वर्षानुवर्ष साधना करावी लागते.."🍁
#Good_Night😊😍☺️
