𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
Kanalga Telegram’da o‘tish
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
Ko'proq ko'rsatish3 820
Obunachilar
-324 soatlar
-27 kunlar
+1730 kunlar
Postlar arxiv
Cross promotion 5k @Policesir
क्या आप Statics Gk पढ़ना चाहते हैं?
SACHIN SIR AND KHAN SIR
(OTHER)
के सभी क्लास फ्री में पाने के लिए 👇👇
Cross promotion 5k @Policesir
क्या आप Statics Gk पढ़ना चाहते हैं?
Cross promotion 5k @Policesir
क्या आप Statics Gk पढ़ना चाहते हैं?
Cross promotion 5k @Policesir
क्या आप Statics Gk पढ़ना चाहते हैं?
आजकाल लोक मोबाईल चा Last Seen सुध्दा लपवतात.. तर मग मनात काय चाललय हे कस सांगतील.. ✍️
मन भारावून गेलंय? थोडा विराम घे.
मन गोंधळलय? शांत बसून विचार कर.
राग आला आहे? खोल श्वास घे.
एकटं वाटतंय? कुणाशी तरी बोल.
वाट सापडत नाही? नवीन गोष्टी शोध.
भीती वाटतेय? एक पाऊल पुढे टाक.
स्वतःवर शंका येतेय? का सुरुवात केलीस ते आठव आणि पुढे चाल!
शिवजयंती🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की......
आपसूकच जय निघते ना....!
राजे कोणाच्या मनात नाही?????
जगात तर लोकं सहज स्थान देतात पण घरात आणि मनात स्थान भेटवण्यासाठी अवघे आयुष्य टांगणीला लागते.....आणि आमचे राजे गेले तीनशे ते साडेतीनशे वर्ष लोकांच्या मनात आहेत. आणि नुसतेच मनातच नाही तर मनाच्या सगळ्यात महत्वाच्या कप्प्यात ते विराजमान आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असे व्यक्तिमत्त्व आहे की ज्याचा शत्रूला देखील दरारा वाटला.
ज्यांचा वेष जरी परिधान केला तर आपसूकच मान झुकली जाते त्याला म्हणतात आदर...ज्यांचा फोटो जरी दिसला तरी आम्ही झुकून नतमस्तक होतो त्याला म्हणतात श्रद्धा.... ज्यांचे नाव जरी ऐकले तर रक्त सळसळत त्याला म्हणतात ताकद
आणि या सगळ्याची सरमिसळ म्हणजे
" छत्रपती शिवाजी महाराज "
अभिमान वाटावा असे सांगावे लागतच नाही.असे म्हणतात की,
जेव्हा मानवाने ईश्वराकडे मागणी केली
मानवाने पैसे मागितले, ईश्वराने भरपूर दिले
मानवाने सोनं मागितले, ईश्वराने भरपूर दिले
मानवाने गाडी मागितली ईश्वराने गाडी सुद्धा दिली
आणि
जेव्हा मानवाने देव च मागितला ना
तेव्हा ईश्वरानी आम्हाला राजे दिले......
राजेंना फक्त मराठाच पूजतात असे वाटत असेल तर १९ फेब्रुवारीला पाड्यावर, तांड्यावर, वेशीवर, गावात, शहरात, महाराष्ट्रात, भारतात कोण्याही कोपऱ्यात जा, भगवा आणि त्यावर राजेंची प्रतिकृती नाही दिसली तर इतिहास बदलून जाईल........इतिहास सुद्धा सांगतो की, जोवर चंद्र, सूर्य आणि तारे आहेत तोवर महाराजांचे अस्तित्वच काय तर नावाला सुध्दा धक्का लागणार नाही. हे मीच नाही तर नासमज लेकरू सुद्धा सांगेल.... आणि हीच आहे राजांची कीर्ती.......
छत्रपती शिवाजी महाराज यांनी जीवनात माणसे कमावली, त्याचे एक उत्तम उदाहरण.....
जेव्हा अफजलखान मारला गेला होता आणि शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत परत निघाले होते तेव्हा राजांनी सगळ्यांना मोजले .त्यामध्ये एक मावळा कमी भरू लागला. शोधाशोध सुरू झाली तर मागून एक मावळा दम टाकत येताना दिसला. त्याच्या हातात अफजलखान याचे मस्तक होते. राजे त्याला म्हणाले,
तुम्ही कुठे राहिला होतास???
तो मावळा म्हणाला,
राजे मी अफजलखानाचे मस्तक घेण्यास मागे राहिलो होतो...
राजे पुन्हा म्हणाले,
परंतु आम्ही अफजलखानास ठार केले होते
तेव्हा ते मावळा म्हणाला,
परंतु राजे चुकून जर अफजलखान जिवंत राहिला असता तर????
तेव्हा राजेंनी काय उत्तर दिले ते मन लावून वाचा,
पण अफजलखान जिवंत राहणारच नव्हता आणि ते जिवंत राहिला असता तरी चालले असते पण स्वराज्याच्या मावळयाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. तुम्हाला काही झाले असते तर मी तुमच्या मा साहेबांना काय जबाब दिला असता?????
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सहज नाव घेतले जात नाही. जगातून नाव खोडायला वेळ जरी लागत नसला तरी मनातून काढायला वेळच पुरणार नाही......शिवजयंती ही थाटातच साजरी होणार...! चौकात असो, घराच्या देव्हाऱ्यात असो की मनाच्या मंदिरात असो, शिवजयंती साजरी होणारच...कारण प्रत्येक जण स्वतःच्या वाढदिवसाची इतक्या आतुरतेने वाट बघत नाही जितकी राजेंच्या जयंतीची प्रतीक्षा करतात......आणि तो दिवस म्हणजे आमची दिवाळीच.....
राजे, ❤️
मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩
तेजस्विनी प्र. राऊत
@TejuRaut
