Marathi Book Summary
पुस्तक फक्त एकदा वाचायचे असेल तर फ्री pdf शोधा. पुस्तक नेहमी वाचायचे असेल तर ते विकत घ्या. फ्री pdf शोधणारे पूर्ण पुस्तक क्वचितच वाचतात किंवा एकदाच वाचतात. पण पुस्तकातल्या गोष्टी अंगिकारायच्या असतील तर ते वारंवार वाचावे लागते.पुस्तकाचे सारांश आता मराठीतून
Ko'proq ko'rsatishMamlakat belgilanmaganTil belgilanmaganToif belgilanmagan
433
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
गुरुशिवाय ज्ञान नाही,ज्ञानाशिवाय आत्मा नाही.. ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म सर्वकाही गुरूंचीच देन आहे..
माझ्या सर्व गुरूंना खूप खूप धन्यवाद आणि गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !💐💐
फक्त आठवणी
आयुष्यत एक असी व्यक्ती मैञीन, मिञ सोबत असतो .ज्याच्या जवळ आपण सर्व सूख दुःख ,प्रेम ,सद्भावना ,संवेदना, जिव्हाळा ,आपुलकीचे नाते सर्व व्यक्त करत असतो .एकमेकांना समजून घेत असतो सुखदु:ख वाटून घेत असतो .कठिण समयी साथ देत असतो . पन नसिबात नसलेल्या गोष्टी कधी निसटून जातात हे कळत सुद्धा नाही .त्याच प्रमाणे कधी आयुष्यातून काळजाच्या जवळचा व्यक्ती मैञिन ,मिञ हा अचानक आयुष्यातून निघून जातो .जो कधी ही भेटनार नाही दिसणार नाही आणि बोलनार ही नाही .हे जेव्हा कळून चूकत .अशावेळी जिवंतपणी मरन आल्याचा भास होतो हजारो मनाला यातना होतात. त्या यातना माणूस कुनालाच सांगू आणि दाखवू ही शकत नाही .मनातल्या मनात फक्त झूरन चालू असत.डोळ्यापुढे उभ्या असतात फक्त जीवघेण्या कित्येक आठवणी आणि ह्याच आठवणि असतात पुढिल आयुष्य जगण्यासाठी ....
✍✍
✅हे क्षण हीं निघून जातील !!!
एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत , फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.
बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले. विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला. हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार. त्या क्षणी त्याला त्या अंगठीची आठवण आली अन् ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते ,
" *This too shall pass* " म्हणजे
" *हाही क्षण निघून जाईल"*
केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले , सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला असे समजून ते परतले. राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला. विजयाचा जंगी समारंभ चालू असताना नवीन प्रधानाने पाहिले की , महाराज कुठेही अति-उत्साहित न होता शांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले , " महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे. " राजा म्हणाला, " नाही , आता मला बुद्धाचा अनित्यता वादाचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.
तात्पर्य : परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही , दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये अन् सुखात नाचू नये."
रतन टाटा यांना जर्मनीमध्ये आलेला एक सुंदर अनुभव
प्लेट मध्ये जेवण शिल्लक ठवण्या अगोदर, रतन टाटा यांचा हा संदेश जरूर वाचा.
जगातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी आपल्या एका tweet च्या मध्यमातून, त्यांना आलेला एक खूप सुंदर अनुभव शेर केला. जो एक खूपच प्रेरणादायी आणि विचार करायला लावणार अनुभव आहे.
# पैसा तुमचा आहे पण संसाधने हे समाजाचे आहेत.
जर्मनी हे एक खूपच प्रगत आणि highly industrialized देश आहे. अश्या देशात खूप लोकांना वाटेल की तिकडले लोक खूप शाही जीवन जगत असतील.
जेंव्हा आम्ही हॅम्बर्ग येथे पोहचलो, माझे कालीग एका रेस्टोरन्ट मध्ये आम्हला घेऊन गेले. त्या रेस्टोरन्ट मध्ये खूप टेबल्स रिकाम्या होत्या. तिकडे एका टेबलावर एक जोडपे जेवण करत बसले होते. त्यांचा टेबलावर फक्त 2 च पदार्थ (dishes) आणि बिअर च्या दोन बाटल्या ठेवलेल्या होत्या. मी ते दृश्य पाहून विचार केरत होतो, कि एवढं सिम्पल जेवण रोमँटिक असू शकते का?, आणि ती मुलगी त्या कंजूस मुलाला आता सोडेल का?..
तिकडे काही दुसऱ्या टेबलावर, काही वृद्ध महिला बसल्या होत्या. जेंव्हा कोणती डिश सर्व्ह केली जायची तेंव्हा वेटर, कस्टमर ला जेवढे लागेल तेवढंच देऊन राहिलेलं त्या वृद्ध महिलांना देत असे. ते महिला त्यांचा प्लेट मधील जेवण संपवत होत्या.
आम्हाला खूप भूक लागली होती. आमच्या लोकल कलीग्स नी आमचा साठी खूप काही ऑर्डर केलं. जेंव्हा आमचे जेवण झाले तेंव्हा जवळपास 30 टक्के जेवण टेबलावर शिल्लक राहिले होते.जेंव्हा आम्ही बाहेर पडत होतो, त्या वेळी त्या वृद्ध महिला आम्हाला इंग्लिश मध्ये काहीतरी म्हणत होती. आम्हाला समझल की ते आमच्या एवढा मोठ्या प्रमाणात जेवण waste करण्यामुळे नाराज होत्या.
आमच्या कालीग ने त्या वृद्ध महिलेला बोलले “आम्ही तुमचा जेवणाचे पैसे दिलेले आहेत. आम्ही किती खातो आणि किती सोडतो या बद्दल तुम्हाच काही देणं घेणं नाही”. त्या वृद्ध महिलाना ती गोष्ट आवडली नाही. त्यांना खूप राग आला अश्या बोलण्याचा. त्यातला एक महिलेने फोन कडून कोणाला तरी कॉल केलं. थोड्या वेळाने तिकडे social security organization चा कोणी अधिकारी पोहोचला. पूर्ण प्रकरण समजून घेऊन, त्यांने आमच्या वर 50 Euro चे दंड लावलं.
त्या अधिकाऱ्याने कठोर शब्दांत बोलला ” तेवढंच ऑर्डर करा जेवढं तुम्ही खाऊ शकता, पैसा तुमच आहे पण संसाधने हे समाजाचे आहे. जगातील खूप लोक संसाधनांचा अभावाचा सामना करत आहेत. म्हणून तुम्हाला संसाधनांचा दुरुपयोग वा त्याला वेस्ट करण्याचं काही कारण आणि अधिकार नाहीत.”
रतन टाटा यांचा सल्ला
Ratan Tata
या श्रीमंत देशांमधील त्या लोकांचं mindset आपल्याला लाजवणार आहे. आपल्याला खरंच या वर विचार करायला हवं. आज आपण अश्या देशांत येतो जिकडे खूप लोक संसाधनांचा अभावाचा सामना करत आहेत. आपण आपली प्रतिष्ठा जपण्या साठी खूप ऑर्डर करतो. इतरांना treat देण्या साठी खुपसे अन्न नष्ट करतो. लग्नात किंवा इतर कार्यक्रमात आपण खूप अन्न नष्ट करतो.
या अनुभवातून घ्यावयाचा धडा- आपल्या खराब सवयीन बद्दल गंभीरतेने विचार करा. त्या बद्दला जेवढं गरज आहे तेवढंच घ्यायची सवय लावा.
Very True – “MONEY IS YOURS BUT RESOURCES BELONG TO THE SOCIETY / पैसे तुमचे आहेत पण संसाधने हे समाजाचे आहेत.”
मित्रांनो कोणतेही देश महान तेंव्हा बनते जेंव्हा तिकडचे लोक महान बनतात. आणि महान बनणे म्हणजे फक्त मोठे मोठे achievements करणे असा होत नाही. तर महान बनणे म्हणजे लहान लहान गोष्टी करणे ज्याने देश आणखी मजबूत होईल. जसे पाण्याचं wastage न करणे, वीजेची बचत करणे, अन्न तेवढेच घेणे जेवढे आवश्यकता आहे. अशे लहान पाहुलच आपल्या देशाला महान बनवून आपण महासत्ते कडे जाऊ.
Credit goes to Writer 🌼🙏
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या दीपावलीच्या धनदायी, प्रकाशमय, चैतन्यदायी, मंगलमय शुभेच्छा !!!
Happy Dipawali...!
✨✨✨
आपल्या आयुष्यात बरे वाईट प्रसंग घडत असतात. आपण ज्या दृष्टीने त्याकडे पहातो तसा आपल्या मनावर वाईट / चांगला परिणाम होतो.
प्रत्येक घटनेला जसा कार्यकारण भाव आहे तसाच वेगवेगळा अर्थ आहे.
आपण काय अर्थ घ्यायचा तो आपण ठरवायच…..!!!
त्या घटनेची वाईट बाजु न पहाता चांगली बाजु, सकारात्मक बाजु डोळ्यासमोर ठेवायला शिका.
जे होत ते चांगल्या साठीच हा आशावाद मनाशी बाळगुन पुढील आयुष्याचा सकारात्मक आणि काळजीपुर्वक विचार करा ...!! जगणं अजुन सुखकारक सुसह्य आणि मजेशीर होईल !!
Every Dark cloud has a silver lining …!!!
प्रत्येक काळ्या ढगाला एक रुपेरी कड असते हे ही लक्षात ठेवा ..!!
शेवटी चिडचिड करुन जगायच की आनंद घेत हे आपल्या विचारांवरच ठरणार आहे.
आपल्याकड काय नाही याचा विचार करण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य तो उपभोग घेवुन नसलेल्या किंवा आवश्यक गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा ..!!
दु:खात सुख शोधा, सुखात दु:ख नको !!
शेवटी पाडगावकरांच्या ओळी आठवतात….!!
पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत;
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!
सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं?
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत
कि गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा....!!
मित्रानो सकारात्मक व्हा ....आनंद लुटा ..
उठा.....नव्याने अभ्यासाला सुरवात करा
( @marathibooksummary )
✨✨✨
🎯बहीण भावाच्या पवित्र नात्याचं महत्व सांगणारा सण म्हणजे " राखी पौर्णिमा"🎯
@marathibooksummary तर्फे सर्वांना रक्षाबंधन निमीत्त हार्दिक शुभेच्छा🎉🎉
Boshqa reja tanlang
Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.