We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish763
Obunachilar
-124 soatlar
+37 kunlar
+530 kunlar
Postlar arxiv
देवाभाऊंनी 2013 मांडलेला दृष्टिकोन आज सत्यात उतरला आहे...देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात
आम्ही विषालाही अमृत समजून पिण्याची ताकद ठेवतो त्यामुळे काहीच अडचण नाही
मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होण्याची भिती वाटू नये यासाठी बीडीडी लंतर अभ्युदय नगर प्रकल्प हाती घेतला आहे. इतक्या वर्षात उबाठा सेनेला का जमले नाही याचे उत्तर द्यावे
मुंबईतील मराठी माणसाचा सर्वात मोठा प्रश्न घराचा आहे. ज्यांनी फक्त मोर्चे काढले त्यांनी काय केले ते सुद्धा दाखवावे. नुसते क्रेडिट घेऊन काही होणार नाही कारण जनतेला कामे कोणी केली हे चांगलेच माहित आहे
पर्यावरण आणि विकास यांच्यात पर्यावरणाला प्राधान्य पण विकासही महत्त्वाचा. मेट्रोला विरोध केला पण शेवटी सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले की आरे कारशेड योग्य आहे. त्यांच्यामुळे प्रल्प १० हजार कोटींनी वाढला तो पैसा कोणाकडून वसूल करायचा
उबाठा-राज एकत्र यायला खूप उशीर झाला. ते एकत्र आल्याचे श्रेय घ्यायला मी तयार आहे पण त्यांच्या एकत्र येण्याने काहीही फरक पडणार नाही
मुंबईतील मराठी ही आमचीच व्होट बँक आहे. मुंबईचे मराठीपण कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही ते कायम राहील
या निवडणुकांमध्ये घराणेशाहीला थारा न देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आमदार-खासदारांच्या कुटुंबियांना तिकीट दिले नाही. काही ठिकाणी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत.
कार्यकर्त्यांना सांभाळावे लागते त्यामुळे काही ठिकाणी युती होऊ शकली नाही पण असे होतच असते
या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यांच्यासाठी निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे काही ठिकाणी युती होते काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत असतात
मेट्रोसारखे प्रकल्प थोडे महाग वाटतात पण जगभरात तसेच आहे. हे प्रकल्प २ वर्षात फायद्यात येतील
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करणारच. मुंबई महापालिकेत ५ वर्षे आणिही चौकीदार होतो. सेनेने उच्छाद मांडला तेव्हा आवाज उठवला, प्रसंगी लाठ्याही खाल्ल्या. आताच्या सभांमध्ये मी त्याचा लेखाजोखा मांडणारच आहे
पुर्वी विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असे मी त्यावर अंकूश आणला. आताही जुन्या कामांमध्ये काही प्रमाणात आहे पण नव्या कामांमध्ये अजिबात होत नाही
केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असले की कामे गतीने होतात हे दाखवले. पृथ्वीराज चव्हाण यांना ते जमले नाही. कोस्ट रोडसाठी मी पाठपुरावा केला तेव्हा परवानग्या मिळाल्या. नव्याने निर्माण झालेल्या जागोवर फक्त उद्याने बनवण्याचा निर्णयही मीच घेतला
शेजाऱ्याचे बाळ मांडीवर घेतले म्हणजे ते आपले होत नाही. कोस्टल रोड परवानग्यांमुळे अडकला होता. मी त्या सर्व परवानग्या मिळवल्या उबाठाने तो प्रकल्प मागून घेतला आणि मला अंधारात ठेवत त्याचे भूमीपुजन केले. मी गप्प राहीलो कारण मला विकासात राजकारण करायचे नव्हते. जनतेला काम कोणी केले ते माहित आहे
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
