𝐏𝐑𝐎𝐉𝐄𝐂𝐓 𝐂𝐇𝐇𝐀𝐘𝐀 𝐌𝐏𝐒𝐂
Kanalga Telegram’da o‘tish
🌸 MPSC I UPSC🌸 👉 प्रयत्न नव्हे, निष्कर्ष महत्त्वाचे. 👉 To the Point... मोजकच. 👉 Material पलीकडील काही अनुभव. 👉 तुमच्या प्रत्येक समस्येचं उत्तर www.youtube.com/@PROJECTCHHAYA WhatsApp: 9970841952 दर्जा पहा, खाञी करा आणि मगच ज्वाईन व्हा:
Ko'proq ko'rsatish3 862
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-87 kunlar
-330 kunlar
Postlar arxiv
3 858
🟣 आता मी काय करू ?
20 फेब्रुवारी, 2025 रोजी लिहिले आहे. राज्यसेवा Descriptive झाली तरीही आजही हेच लागू होते.
गट क पूर्व 70 तर गट ब मुख्य 140 चे आसपास दिवस उरले आहेत. योग्य नियोजन आणि कठोर अंमलबजावणी नसेल तर मग 2028/29 पर्यंत पण येरझाऱ्या माराव्या लागल्या तर नवल नसेल.@mithunpawar
3 858
गट क मुख्य परीक्षा 2025 पार पडली.
प्रत्येक Exam नंतर तोच तोच अनुभव येतो. असे का होते? आपलीच आपल्याला चीड येते, सर्व नकोसे वाटते.हे असे घडते कारण तुम्ही दर वेळी मळलेल्या वाटेनेच जाता. स्वतःला कोशात ठेवता, आव्हान देत नाही. गट ब पूर्व परीक्षेनंतर थोडे भाष्य केले होते. कोणतीही परीक्षा झाले नंतर काय करावे म्हणून. आजही तेच लागू होते. इतर काही पाहण्यापेक्षा तोच छोटा व्हिडिओ पहा. Self Audit करा. 👇👇👇👇👇 https://youtu.be/T_v8tpwV4rM?si=wKZIQQyVGXNn_DNF
3 858
https://youtu.be/yVL_YVlG7YA?si=qFBDRFZklesArhnO
स्थिर राहा. Memory आणि Logic तेव्हाच काम करेल. भूतकाळ विसरा. काळाबरोबर आपणही बदलत असतो, समृद्ध होत असतो याची जाणीव ठेवा. कसलाही ताण झुगारून द्या. जय पराजयाचा विचार नको. शेवटपर्यंत आपल्या कामाशी इमान राखा.Best Luck 🤞
3 858
🔶 सूचना:
लेक्चर Link येथे चॅनेल वर 5 मिनिट अगोदर दिली जाईल.
वेळेत जॉइन व्हा, नंतर खात्री नसेल.
3 858
"अग्निपथ..."
हरिवंशराय बच्चन यांची प्रसिध्द कविता.
"जीवनाचा प्रत्येक टप्पा हा अग्निपथासारखाच आहे. यात संकटं, दुःखं, थकवा असतो; पण जो हार मानत नाही, जो चालत राहतो, तोच खरा विजेता ठरतो.""काहीही असो, चालत राहा." 📍@mithunpawar
3 858
🌿 प्रोजेक्ट छाया च्या कोणत्याही उपक्रमात असा फळ तेव्हाच मिळेल...
1) फार वेळा तीच तीच सूचना द्यायची वेळ येवू देवू नये. प्रत्येक सूचना आपल्या परीने सर्वोत्तम पाळण्याचा प्रयत्न करत चला. भले कमी output येत असेल पण प्रयत्न दिसत असतो. तोच महत्वाचा.
2) आपलीच स्थिती वेगळी आहे. त्याची सराना काय माहिती अशी भावना विद्यार्थ्याच्या नुकसानीची. एक तर ती स्थिती नक्कीच माहिती असते किंवा नसली तर विद्यार्थ्याचे काम ती कानावर घालण्याचे आहे. कुढत दिवस घालवू नका. मात्र त्यावर सविस्तर चर्चा झाल्या नंतर मात्र मागे वळून पाहता कामा नये.
येथे असल्यावर येथील गोष्टींवर अस्वस्थ राहून याहून दुसरा पर्याय बेस्ट आहे असे वाटते. असे मागेही काही विद्यार्थ्यांचे झालेले आहे. ऑनलाईन च नव्हे तर ऑफलाईन देखील असे झालेले आहे. मात्र नंतर कमालीची निराशा पदरी पडते. ते लोक मागाहून इकडे येवू पाहतात. पुराव्यासह उदाहरणे आहेत. एक आश्वस्त करू इच्छितो की अंतिम लिस्ट मध्ये येण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्यात लेक्चर्स, Tests, मूल्यमापन.... यादी वाढत जाते म्हणजे मटेरियल अनुषंगाने. या पातळीवर प्रोजेक्ट छाया शी तुलना करता येईल. मात्र, यापलीकडे नक्कीच काही गोष्टी आहेत त्यात कोणत्या वेळी काय करवून घ्यायचे, विद्यार्थ्याची अडचण किंवा समस्येवर नेमका मात्रा काय. त्याची मनःस्थिती. आपली तयारी आणि आयोग यातील गॅप वर पकड. अशीही यादी तयार होईल. त्याला शब्द सापडत नाहीत. याबाबतीत प्रोजेक्ट छाया शी तुलना करता येणे अशक्य आहे. हा गर्व किंवा फुशारकी नाही. याचे कारण असे की या इतक्या खाली, या दलदलीत कोणीही मार्गदर्शक उतरत नसतो. असा क्लास ही चालत नाही, अकॅडमी अशी उभा राहत नाही. व्यवसाय तर शक्यच नाही. मला कोणी विचारेल की, "मग तुम्ही का करता?" मी प्रोजेक्ट छाया ला एक क्लास किंवा अकॅडमी म्हणून कधीच पाहिले नाही अगर पाहणार नाही. माझे मत कदाचित इतरांना पटणार नाही परंतु हे व्यवसायाचे साधन नाही होवू शकत. यावर फार बोलत नाही. एखाद्याचा पूर्व चा result गेल्यानंतर तो मुख्य करणार नसेल तर त्याची मागणी नसताना fees परत करणे किंवा कोणी मधूनच गायब झाला तर त्याचीही मागणी नसली तरी त्या दिवसापासूनची फी परत करणे हे क्लासेस किंवा अकॅडमी मध्ये घडत असेल का? किंवा मलाही एक एक महिन्याची fees देणे अपेक्षित असताना एखादी विद्यार्थिनी पूर्ण उपक्रमाची फी सुरवातीला देते. हे क्लासेस आणि अकॅडमी मध्ये घडेल का? विषय फी देणे घेणे बद्दलच नसून विद्यार्थ्याला घडवताना पण मोजून मापून च्या पलीकडे असते ते ही याच तत्वामुळे.
खूप बोलता येईल. पण ते सार्वजनिक करण्यात अर्थ नाही. अनुभवच यावा लागतो तेव्हाच पटू शकते.
#Mithunspeaks
