🏆मिशन सरकारी नोकरी🏆️
▪️स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी ...!!! ✍चालू घडामोडी नोट्स ✍भूगोल ✍इतिहास ✍राज्यघटना ✍अर्थव्यवस्था टीप - इथे फक्त कॉलिटी सुचना :- फक्त सिरीयस विद्यार्थ्यानी request send करा. 📱प्रतिक्रिया 👇 @optimistic8334
نمایش بیشتر6 903
مشترکین
+524 ساعت
+4677 روز
+83030 روز
- مشترکین
- پوشش پست
- ER - نسبت تعامل
در حال بارگیری داده...
معدل نمو المشتركين
در حال بارگیری داده...
✍️♦️भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाविषयी अचूक नसलेले विधान निवडा.Anonymous voting
- संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली.
- संविधान सभेचे सदस्य संख्या 389 च्या तुलनेने 299 पर्यंत कमी झाली.
- जेव्हा संविधानसभा विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिचे अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र प्रसाद असत.
- संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली
✍️♦️खालील अचूक असलेले विधाने विचारात घ्या.
अ) संविधान सभेत एकूण 15 महिला होत्या. ब) राजकुमारी अमृता कौर या मध्य प्रांत मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. क) मालती चौधरी या बंगाल प्रांत मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या.Anonymous voting
- फक्त विधान अ बरोबर
- फक्त विधान अ आणि क बरोबर
- फक्त विधान अ आणि ब बरोबर
- वरीलपैकी सर्व विधाने बरोबर
✍️♦️कॅबिनेट मिशन योजने संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी जुळत नाही ?Anonymous voting
- उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी - 04
- प्रांतांचे प्रतिनिधी - 292
- संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी - 73
- निवडावयाची एकूण सदस्य संख्या 389
✍️♦️संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना----- रोजी स्वीकारली ?Anonymous voting
- 9 डिसेंबर 1946 तिच्या पहिल्या बैठकीत
- 22 जानेवारी 1947 जेव्हा उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला गेला.
- 14 ऑगस्ट 1947 रोजी
- 22 जुलै 1947 रोजी
❇️ 42वी घटनादुरुस्ती 1976: या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते .
1) प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.
2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.
3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.
4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद
5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती
6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.
7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.
8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.
9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.
10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.
11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण
12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.
13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.
14) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले.
शिक्षण ,जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण , वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना.
15) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.
16) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद
👍 1❤ 1🥰 1
Photo unavailableShow in Telegram
✍❣💫या व्यक्तीबद्दल आज लिहावसं वाटलं एक सामान्य कार्यकर्ता पण सत्ताधाऱ्यांना नाकी नऊ आणणारा व्यक्ती ❣आज दिवसभर लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहताना आणि गेले बरेच दिवस या व्यक्तीचा लोकसभा निवडणुकांवर कोणताही प्रभाव पडणार नाही असे सर्व सत्ताधारी आणि मोठे राजकीय नेते मंडळी सांगत होते 🙊पण कोणी मान्य करा अथवा न करा पण मराठवाड्यामध्ये भाजपाचा झालेला दारून पराभव हे सर्व काही सांगून जातं सर्वात पहिले जालना मतदारसंघ तब्बल पाच वेळा खासदार असलेले आणि केंद्रात मंत्री असलेले रावसाहेब दानवे साहेब यांचा पराभव
✍त्यानंतर नांदेड मध्ये पराभूत झालेले प्रताप पाटील चिखलीकर साहेब (मागील वेळी अशोक चव्हाण यांना हरवले होते) यांचा आज पराभव झाला आणि
✍आत्ता नुकताच जाहीर झालेला बीड मधील माननीय पंकजाताई मुंडे यांचा झालेला पराभव पंकजाताई बद्दल सर्वांना आदर आहे. माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा राजकीय वारसा घेऊन जाण्याचे धाडस ताईंमध्ये आहे .पण बीडमध्ये जातीय रंग या निवडणुकीत दिसून येत होता कालच संध्याकाळी पंकजाताईंनी मनोज जरांगे यांचा किती प्रभाव आहे हे निकालानंतर कळून येईल असे बोलले होते आणि तो आज दिसला 💐
# लोकसभा निवडणूक 2024
👍 4❤ 2🔥 1
Photo unavailableShow in Telegram
☘🌿 जागतिक पर्यावरण दिन 🌿🍀
✅ जागतिक पर्यावरण दिन हा जगभर जून ५ रोजी पाळला जाणारा दिवस आहे.
✅ 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.
🌿 या वर्षीची थीम काय आहे ?
जागतिक पर्यावरण दिन 2024 ची थीम ' जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता ' आहे. जागरूकता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा साजरा केला जातो.