Marathi Hindi English eBooks
رفتن به کانال در Telegram
This channel has always been and vows to remain a non-profit channel forever. 👉All IPR rights belong to publisher/Authors To report about any book posted on the channel,which infringes your IPRs in anyway, please use the Bot below. 👉 @EBOOKS_LAB_BOT
نمایش بیشتر6 454
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
*📚📖पुस्तकांसाठी घर बांधणारा एकमेव पुस्तकप्रेमी🔥*
*💫२३ एप्रिल जागतिक पुस्तक दिन 📚📖📓*
*जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर, एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या.... कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल, आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल.*
*-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!🙏💐*
💫🇮🇳📚📓📖✒️🎓✊💙
मुंबई महाराष्ट्राचीच!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अजोड युक्तिवाद
आता डिजिटल पुस्तिकास्वरूपात!
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं नीच कारस्थान आजचं नाही, ते अनेक वर्षांपासून शिजतंय… स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात भाषावार प्रांतरचना करायला पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेकांचा विरोध होता. एकच एक भारतीयत्वाची ओळख निर्माण न होता भाषा, संस्कृतीआधारित प्रादेशिक अस्मिता बळावतील, हा त्यांना धोका वाटत होता. मात्र, भाषावार प्रांतरचना हीच नैसर्गिक प्रांतरचना आहे असा युक्तिवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. त्याचवेळी मुंबईवर गुजरातचा अधिक हक्क आहे, ती महाराष्ट्रात समाविष्ट होऊ नये, ती स्वतंत्र असली पाहिजे, केंद्रशासित असली पाहिजे, अशी काव काव करणाऱ्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या समितीला आंबेडकरांच्या तर्ककठोर आणि बिनतोड युक्तिवादाने साफ उघडे पाडले. मुंबईवर हक्क सांगू पाहणाऱ्यांचे सगळे दावे त्यांनी उधळून लावले.
हा जबरदस्त युक्तिवाद ‘साप्ताहिक मार्मिक’च्या निदर्शनास आणला मुंबईचे अभ्यासक, लेखक नितीन साळुंखे यांनी. तो सध्याच्या काळात किती महत्त्वाचा आहे, हे ओळखून त्याच्या अनुवादासाठी ज्येष्ठ अनुवादिका, लेखिका मुग्धा कर्णिक यांचं नावही त्यांनीच सुचवलं. हा जवळपास १०० पानांचा युक्तिवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘रायटिंग्ज अँड स्पीचेस’मध्ये महाराष्ट्रा अॅज अ लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स या चॅप्टरमध्ये समाविष्ट आहे. त्यातल्या मुंबईवरील अन्यप्रांतीयांच्या दाव्याच्या चिंध्या उडवणाऱ्या भागावर आधारलेले चार लेख मार्मिकने गेल्या वर्षी छापले.
त्याच काळात शिवसेना पक्षप्रमुख आणि मार्मिकचे संपादक उद्धव ठाकरे यांच्याशी ‘मातोश्री’वर झालेल्या चर्चेत या लेखांचा विषय निघाला, तेव्हा त्यांनी याची पुस्तिका करावी, अशी सूचना केली होती. नितीन साळुंखे यांनी एका मुलाखतीत या युक्तिवादाचा आणि मार्मिकचा उल्लेख केल्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. महाराष्ट्रभरातून या लेखांची मागणी झाली. आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार ही पुस्तिका प्रबोधन प्रकाशना ने तयार केली असून डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर तिची डिजिटल आवृत्ती म्हणजे पीडीएफ आज सर्वांपुढे सादर करीत आहोत.
मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसांचीच कशी आहे, हे सप्रमाण सिद्ध करणारा हा युक्तिवाद आपणही वाचा, इतरांनाही पाठवा, सर्व कौटुंबिक, मित्रपरिवारातल्या ग्रूप्सवर फॉरवर्ड करा; मुंबईतल्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्वेष्ट्यापर्यंत, प्रत्येक मराठी माणसापर्यंत तो जायलाच हवा!
👇👇👇
https://t.me/Vachal_Tar_Vachal
वाचाल तर वाचाल सांगितलय हो बाबासाहेबांनी महान ते झाले मंत्र जपला हा जयांनी.
वाचनाने मिळते ज्ञान दुर होते हो अज्ञान, याची ठेवा थोडी जाण ज्याने वाढते तुमची शान.
वाचाल तर वाचाल टेलिग्राम चॅनल ला सबस्क्राईब करा
👇👇👇
https://t.me/Vachal_Tar_Vachal
ये हैं अमर उजाला के वरिष्ठ पत्रकार, श्री प्रेम कुमार। ग़ौर से सुनिए क्या कह रहे हैं.. 🕺
उभा जन्म महाराजांनी ज्या कार्याला वाहून घेतले त्या कार्याची प्रेरणा घेतली तर ती खरी शिवजयंती होय.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
🙏💐💐💐💐💐🙏
चॅनल वर उपलब्ध सर्व पुस्तकांसाठी पिन मेसेज चेक करा व पुस्तक मिळवण्यासाठी खालील पुस्तकाच्या नावाखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
या चिमुकलीचे शाळेत प्रजासत्ताक दिनी केलेले दोन मिनिटांच भाषण ऐका ! नक्कीच आश्चर्य चकित व्हाल !
👇👇👇
https://youtu.be/JltdIvVX6As?feature=shared
