Operation ' ऑफलाईन '🔥
Canal cerrado
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या सर्व पूर्व परीक्षा ह्या पूर्वी सारख्या ऑफलाईन पद्धतीनेच झाल्या पाहिजे या मागणीसाठी , एकत्रित प्रयत्न आणि समन्वयासाठी हा ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. Operation ऑफलाईन 🔥
Mostrar másEl país no está especificadoLa categoría no está especificada
405
Suscriptores
Sin datos24 horas
Sin datos7 días
Sin datos30 días
Archivo de publicaciones
#Operation_ऑफलाईन
सर्वांनी हा हॅशटॅग वापरून आपापल्या पद्धतीने ऑनलाइन ला विरोध असलेले ट्विट टाका...🔥🔥🔥
MPSC Exam : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक; उद्याचा विद्यार्थी मोर्चा स्थगित https://educareerworld.com/news/mpsc-exam-0e966deb--0e966deb-eeb6-4db8-a740-4e16ee2e5135
🛡Bot qayta tiklandi Guruhingiz endi umuman SPAM bolmaydi botni guruhga qo'shing!🤖
Bot guruhingizni 24/7 qo'riqlaydi!
एमपीएससी ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात वणीत विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा
'ऑफलाइन परीक्षा घ्या, पेपरफुटी रोखा' – हजारो स्पर्धा परीक्षार्थींचा बुलंद आवाज
नॉर्मलायझेशन रद्द करा; परीक्षा शुल्क कमी करा – विद्यार्थ्यांचे शासनाला निवेदन
वणी :
एमपीएससीच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीविरोधात तसेच वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांच्या निषेधार्थ वणी येथे गुरुवार, २ जुलै रोजी हजारो स्पर्धा परीक्षार्थी युवक-युवतींनी भव्य एल्गार मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत उपविभागीय कार्यालयावर धडक दिली.
या मोर्चात विद्यार्थ्यांनी एमपीएससीची पूर्वीप्रमाणे पारदर्शक ऑफलाइन परीक्षा पद्धत पुन्हा सुरू करण्याची प्रमुख मागणी केली. ऑनलाइन परीक्षा पद्धतीत अनेक प्रकारचे घोटाळे होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तसेच नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, वेगवेगळ्या दिवशी व वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्नपत्रिका दिल्याने समान संधीच्या तत्त्वाला धक्का बसत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
याशिवाय, पेपरफुटीच्या घटनांमधील दोषींवर कठोर कारवाई करावी, स्पर्धा परीक्षांचे परीक्षा शुल्क कमी करावे, तसेच शासनाने दरवर्षी परीक्षांचे निश्चित वेळापत्रक आणि रिक्त पदांचा तपशील आगाऊ जाहीर करावा, अशा विविध मागण्याही विद्यार्थ्यांनी केल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झालेला मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव तसेच जिल्हाधिकारी यांना विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या एल्गार मोर्चामध्ये वणीसह परिसरातील हजारो स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शहरात मोर्चाची व्यापक चर्चा रंगली असून, शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
आज 2 ठिकाणी विद्यार्थ्यांची टीम गेली होती,
शासन दरबारी आणि आयोगाकडे.
आपण पुन्हा आपले मुद्दे आणि मागणी सविस्तर समजून सांगितली आहे.
प्रतीक्षा करूया आपल्या बाजूने निर्णय येईल ,
अन्यथा 12 जुलै नंतर....🤝
Opeartion ऑफलाईन 🔥
