5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Q : जेव्हा हायड्रोजन हवेमध्ये जळत असतो तेव्हा तो निर्माण करतो?
Q : तंबाखूचा धूर आरोग्यासाठी हानिकारक आहे कारण त्यात आहे?
⭕️'जीएमआरटी'मुळे कमी वारंवारता असलेल्या गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाचा शोध...
♦️ प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचे आरोग्य कवच
✔️ महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेचे एकत्रीकरण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpscscience_tech
Q : खालीलपैकी कोणत्या बौद्ध ग्रंथात सोळा महाजनपदांचा उल्लेख आढळतो?
Q : सांद्रीभवना दरम्यान उत्सर्जित होणाचा उष्णतेस ______ म्हणतात? (MPSC PRE 2017)
Q : पृथ्वीच्या उत्पत्ती संबंधी वायुरूपी परिकल्पना कोणी मांडली?
Q : गुरुत्व त्वरणाबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा:
Q : जडत्वाची (Inertia) संकल्पना पहिल्यांदा कोणी मांडली होती ?
TCS IBPS चा बागलबुवा -
डरने का नही...
बहुप्रतिक्षित सरळ सेवेच्या अनेक परीक्षा यावर्षी TCS व IBPS यांच्यामार्फत होणार आहे.
काही वर्षांच्या गॅपमुळे तसेच प्रथमच खाजगी कंपन्या मार्फत होणारी परीक्षा आणि सरकारी नोकरीचे स्वप्न म्हणा किंवा बेरोजगारी म्हणा, कोणत्याही विद्यार्थ्याला अनेक वर्षानंतर आलेली सरकारी नोकरीची संधी हातातून घालवायची नाहीये, आलेल्या संधीचं सोनं करायचंय म्हणून सर्व विद्यार्थी सैरभैर झालेले आहेत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा TCS IBPS म्हणा किंवा कोणत्याही दोन परीक्षा पद्धतीमध्ये मध्ये खरा फरक काय असतो? ते समजून घ्या तो फरक असतो प्रश्न विचारण्याची पद्धत उदाहरणार्थ..
1. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?
A. 1 मे 1961 B. 1मे 1960
C.2 मे 1960 D.30April 1961
2. महाराष्ट्र राज्याची पहिली राजधानी कोणती?
A. पुणे B. मुंबई C. Nagpur D. नवी मुंबई
3. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाही ते ओळखा.
A. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 30 एप्रिल 1961 रोजी झाली असून, मुंबई हे त्या राज्याचे राजधानीचे ठिकाण होते.
B. महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे 1960 रोजी झाली असून मुंबई हे ठिकाण राज्याची राजधानी असून नागपूर हे सांस्कृतिक राजधानी आहे.
C. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1961 रोजी झाली असून, मुंबई हे ठिकाण या राज्याची राजधानी आहे.
D.महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली असून मुंबई हे ठिकाण राज्याची राजधानी असून नागपूर हे राज्याची उपराजधानी आहे.
4. खालीलपैकी कोणते/कोणती विधाने चूक नाही.
a. द्वैभाषिक राज्यांमधून महाराष्ट्र व गोवा राज्याची निर्मिती झाली.
b. मुंबई हे ठिकाण द्वैभाषिक राज्याची तसेच महाराष्ट्र राज्याचे राजधानीचे ठिकाण होय.
c. द्वैभाषिक राज्यांमधून महाराष्ट्र व गुजरात या राज्यांची निर्मिती झाली असून अहमदाबाद हे राजधानीचे ठिकाण होय.
A.b B.a,c C.c
D.वरीलपैकी एकही नाही
मित्रांनो, यावरून एकच समजत आहे प्रश्न विचारण्याच्या पद्धती अनेक आहेत आणि त्या पद्धतीवरूनच परीक्षेची डिफिकल्टी लेवल ओळखली जाते, आपण कोणत्याही प्रश्नांचे उत्तर तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपल्याला त्या विषयाचा गाभा समजलेला असेल, अभ्यास पूर्ण झाला असेल, त्या विषयाचे आकलन झाले असेल.
मित्रांनो, TCS IBPS पॅटर्न आला म्हणजे असं समजू नका की त्यांचे प्रश्नही वेगळे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरही वेगळी आहेत, सर्व परीक्षांमध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई हेच उत्तर राहणार आहे. TCS IBPS परीक्षेला याचे उत्तर पुणे किंवा नागपूर होणार नाहीये यामुळे तुमचा अभ्यास, तुमचा कंटेंट, तुमचा संदर्भ याला महत्त्व द्या, विषयाच्या आकलनाला महत्त्व द्या, जो विषय अवघड जातोय त्याचे आकलन करा. प्रत्येक विषयाचा Self study करा. TCS IBPS पॅटर्न परीक्षा आहे म्हणजे कोणतीतरी रॉकेट सायन्स ची परीक्षा नाही! हे ध्यानात ठेवा, तुमच्या घाबरण्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत, राम गोपाल वर्मा यांच्या एका सिनेमा मधील डायलॉग आहे; अजय देवगण त्याच्या एका माणसाला फोनवर बोलताना सांगतो, डर जिंदा रहना चाहिए.
मित्रांनो, अपने को डरने का नही है; घाबरला तर सैरभैर फिराल आणि यश तुमच्या पासून लांब जाईल 100% कष्ट करा, योग्य संदर्भ (तुमच्या भाषेत कंटेंट) वाचा, आपल्याला ज्याची शिकवण्याची पद्धत समजते त्यांच्याकडून आपल्याला अवघड जाणारा विषय, विभाग समजून घ्या पण एक लक्षात ठेवा मित्रांनो घाबरायचं नाही आणि जोपर्यंत सेल्फ स्टडी नाही करत तोपर्यंत यश नाही.
मित्रांनो, आपणास एक लक्षात ठेवावे लागेल यशासाठी कष्ट, अभ्यास, योग्य मार्गदर्शन, योग्य संदर्भाची निवड न गोंधळता करणे महत्त्वाचे आहे.
डॉ. अनिरुध्द क्षीरसागर
वैद्यकीय अधिकारी विशेषज्ञ गट-अ
महाराष्ट्र राज्य (पात्र व निवड)
स्पर्धा परीक्षा लेखक, समुपदेशक व मार्गदर्शक
ऑर्थोपेडिक व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, पुणे
इलेक्ट्रॉनिक विश्वात क्रांती आणणारा संशोधक...
Join: @mpscscience_tech
