ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 713 مشتركاً، محتلاً المرتبة 5 600 في فئة التعليم والمرتبة 11 993 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 713 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -63، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 14.95‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.82‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 042 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 289 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 713
المشتركون
-1024 ساعات
-317 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट ब पूर्व परीक्षेमध्ये सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून तब्बल ११+ प्रश्न आले होते.. 👆👆

✌️ तुम्ही केलेल्या अभ्यासावर Confident रहा. ✌️ स्वतःच्या Ability वर विश्वास ठेवा. ✌️ Tension घेऊ नका. ✌️ Positive विचार करा. ✌️ अभ्यास पुरेसा झाला आहे / नाही असा कोणताही विचार करु नका. ✌️ पेपर अवघड असेल/नसेल तरीही शेवटच्या प्रश्नापर्यंत धीर सोडू नका… ✌️ 100 वा प्रश्न देखील GameChanger ठरू शकतो हे विसरू नका. लक्षात असूद्या परीक्षा ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा आहे. Wish You All The Very Best✌️💐👍 डाॅ. अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील

photo content

photo content

#simplified_Publication 🔵 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2020🔵 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️ परीक्षा वार /दिनांक : शनिवार - 04 Sep 2021 ◼️ परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित रहावे. वेळ : सकाळी 9.30मी. ◼️ परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30मी. ◼️ प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12 ◼️ परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याआधी दीड तास का उपस्थित रहाणे आवश्य आहे? » उमेदवारांची तपासणी / झडती. » शारीरिक तापमान तपासणे. » मास्क, सॅनिटायझर, ग्लोज इ. किट घेण्यासाठी. » Covid ची लक्षणे असणाऱ्या उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यसाठी. » ओळख पडताळणी करण्यास. » उपस्थिती (हजेरी) नोंदविणे. » महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी. ◼️ परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? » प्रवेशपत्र » आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. » त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जाणे. » नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(मास्क) » हातमोजे(हँडग्लोज) » फेस शिल्ड » हँड सॅनिटायझरची पशवी/बॉटल (पारदर्शक असावी) » किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) » किमान एक पाणी बॅाटल » मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी एक बॅग » परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. » किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर पोहचावे. » परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास) ◼️ उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? » परीक्षेचे नाव व वर्ष  » परीक्षा क्रमांक » बुकलेट क्रमांक » विषय सांकेतांक- 012 » प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी ) » स्वत:ची सही ◼️ परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी. ◼️ हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे. » पर्यवेक्षकांची सही » शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे. 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील

Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 ज
+2
Simplified Diary 18,19 Edition & Current Que. Set 2021 💥💥💥Combo offer💥💥💥 ₹ 400/- @ ₹ 200/- 50% Off 👉1 जानेवारी ते 10 जुलै पर्यंत च्या चालू घडामोडी चा समावेश 👉 1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडी वर आधारित सराव प्रश्न संच http://jsdi.al/SnCQ1 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपलब्ध

👆भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत.
👆भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत.

🏫 महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे खालीलप्रमाणे 🏫 विद्यापीठाचे नाव -----स्थळ ------ स्थापना 🏬मुंबई विद्यापीठे - मुंबई - १८५७ 🏬राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे - नागपूर - 1923 🏬पुणे विद्यापीठ ( सावित्रीबाई फुले) - पुणे -1949 🏬डॉ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - औरंगाबाद - 1958 🏬शिवाजी विद्यापीठ - कोल्हापूर - 1962 🏬कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - अमरावती - 1983 🏬 Y. C. M. मुक्त विद्यापीठ - नाशिक - 1989 🏬 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ - जळगाव - 1990 🏬स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ - नांदेड - 1993 🏬टिळक महाराष्ट्र विद्यापीठ - पुणे - 1921 🏬सोलापूर विद्यापीठ (अहिल्याबाई होळकर) - सोलापूर - 2004 🏬गौंडवाना विद्यापीठ - गडचिरोली - 2011

▪️UPSC 👆Current Member Of The Commission 👆 List Of Chairman
+2
▪️UPSC 👆Current Member Of The Commission 👆 List Of Chairman

#simplified_Publication 🔵 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त (Combine) पूर्व परीक्षा 2020🔵 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️ परीक्षा वार /दिनांक : शनिवार - 04 Sep 2021 ◼️ परीक्षा उपकेंद्रावर कधीपर्यंत उपस्थित रहावे. वेळ : सकाळी 9.30मी. ◼️ परीक्षा कक्षात (Hall) शेवटचा प्रवेश किती वाजेपर्यंत मिळेल : सकाळी 10.30मी. ◼️ प्रत्यक्ष पेपरचा कालावधी : सकाळी 11 ते 12 ◼️ परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरु होण्याआधी दीड तास का उपस्थित रहाणे आवश्य आहे? » उमेदवारांची तपासणी / झडती. » शारीरिक तापमान तपासणे. » मास्क, सॅनिटायझर, ग्लोज इ. किट घेण्यासाठी. » Covid ची लक्षणे असणाऱ्या उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यसाठी. » ओळख पडताळणी करण्यास. » उपस्थिती (हजेरी) नोंदविणे. » महत्त्वाच्या सुचना समजून घेण्यासाठी. ◼️ परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? » प्रवेशपत्र » आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. » त्याच मूळ ओळखपत्राची झेरॉक्स प्रत सोबत घेऊन जाणे. » नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(मास्क) » हातमोजे(हँडग्लोज) » फेस शिल्ड » हँड सॅनिटायझरची पशवी/बॉटल (पारदर्शक असावी) » किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) » किमान एक पाणी बॅाटल » मोबाईल व इतर वैयक्तिक साहित्य ठेवण्याठी एक बॅग » परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. कारण परीक्षेच्या दिवशी ऎनवेळी उदभवू शकणाय्रा अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इ. बाबी लक्षात घेऊन, विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंध परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. » किमान सकाळी 9.30 वाजेपर्यंत केंद्रावर पोहचावे. » परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास) ◼️ उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? » परीक्षेचे नाव व वर्ष  » परीक्षा क्रमांक » बुकलेट क्रमांक » विषय सांकेतांक- 012 » प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी ) » स्वत:ची सही ◼️ परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी. ◼️ हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे. » पर्यवेक्षकांची सही » शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे. 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील

🟪 AMVI मुख्य परीक्षा 2020. 👉 दिनांक- 30 ऑक्टोबर 2021 रोजी होईल. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifie
🟪 AMVI मुख्य परीक्षा 2020. 👉 दिनांक- 30 ऑक्टोबर 2021 रोजी होईल. www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪 AMVI मुख्य परीक्षा 2020. 👉 दिनांक- 30 ऑक्टोबर 2021 रोजी होईल. कागदपत्रे व इतर सूचना व्यवस्थित वाचून घ्या.

🟪राष्ट्रीय पोषण महिना: सप्टेंबर 2021 कुपोषण विरोधात लढा देण्याच्या उद्देशाने, भारतात दरवर्षी सप्टेंबर हा महिना ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून पाळला जातो. या महिन्यामध्ये लहान मुलांची खुंटीत वाढ, कुपोषण, अॅनेमिया आणि कमी वजन अश्या कुपोषणाशी संबंधित विषयांवर व्यापक जागृती पसरवण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालय विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. या महिन्यात किशोरवयीन मुली, गर्भवती स्त्रिया आणि स्तनपानावर असणार्‍या माता यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. ▪️पार्श्वभूमी भारत सरकारने दरवर्षी ‘सप्टेंबर’ महिना ‘राष्ट्रीय पोषण महिना’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 0-6 वर्षे वयोगटात खुंटीत वाढीने ग्रासलेल्या मुलांचे प्रमाण 2022 सालापर्यंत आत्ताच्या 38% वरून 25% पर्यंत खाली आणण्याच्या उद्देशाने राजस्थानमधील झुनझुनुमध्ये 8 मार्च 2018 रोजी पंतप्रधान मोदी यांनी पोषण अभियान अर्थात "सर्वांगीण पोषणासाठी प्रधानमंत्रीची अतिव्यापक योजना" (Prime Minister’s Overarching Scheme for Holistic Nutrition) या नावाने एक राष्ट्रीय मोहीम सुरु केली.

🟪 नैसर्गिक संकटांचा अंदाज लावणारे NDMA आणि IIT रुरकी या संस्थाचे मोबाइल अॅप राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि रुरकी (उत्तराखंड) भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) या संस्थांनी एकत्र येवून नैसर्गिक संकटांचा अंदाज लावणारे एक मोबाइल अॅप तयार केले आहे. हे अॅप आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक संकटांची पूर्वसूचना देईल. अॅपसाठी लागणारी माहिती डॉप्लर रडार यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संकलित केले जाणार आहे. असेच एक डॉप्लर रडार मुक्तेश्वर, सरकंदा देवी येथे प्रस्थापित करण्यात आले आहे आणि लान्सडाउन येथे तिसरा डॉप्लर रडार बसवला जाईल. उत्तराखंड मंत्रिमंडळाने एक तज्ज्ञ समितीही नेमली आहे, जी प्रत्येक क्षेत्रात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वर्तवेल जेणेकरून आगाऊ बचावात्मक तयारी करता येईल. ▪️राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) विषयी ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005’ अन्वये आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर स्वतंत्र संस्थात्मक रचना उभी करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य स्तरावर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जिल्हा स्तरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या तीन पातळ्यांवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरावर कार्यकारी समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी विविध शासकीय खात्यांमध्ये विभागण्यात आली आहे. ह्या संस्थात्मक रचनेमुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यभारात आवश्यक असणारा आंतरविभागीय समन्वय राखण्यात मदत होते.

🟪माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा ‘आयकॉनिक वीक’ कार्यक्रम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 23 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या कालावधीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयांच्यावतीने "आयकॉनिक वीक" नामक साप्ताहिक कार्यक्रम पाळण्यात आला. आयकॉनिक वीकच्या संकल्पनेत जन भागीदारी म्हणजेच लोक सहभाग केंद्रस्थानी ठेवण्यात आला होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा केवळ सरकारी कार्यक्रम न राहता लोक चळवळ राहावी असा यामागचा उद्देश होता. या आठवड्यात आयोजित करण्यात आलेली कार्यक्रमे पुढीलप्रमाणे आहेत - ‘राज्य घटनेची निर्मिती होताना’ या विषयावरची ई-छायाचित्र प्रदर्शनी ‘चित्रांजली@75’ ही आभासी पोस्टर प्रदर्शनी दूरदर्शनची ‘नेताजी’, ‘मर्जर ऑफ प्रिन्सली स्टेट्स’ यासारख्या माहितीपटांची मालिका ‘राझी’ सारख्या लोकप्रिय भारतीय चित्रपटांचेही प्रसारण स्वातंत्र्य सैनिकांबाबत बेंगळूरू शहरात ROB संस्थेने आयोजित केलेली प्रदर्शनी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) त्याच्या OTT प्लॅटफॉर्म ‘www.cinemasofindia.com’ यावरून आयोजित केलेल्या चित्रपट महोत्सवात ‘आयलंड सिटी’, ‘क्रॉसिंग ब्रिजेस’ यासारख्या चित्रपटांचे प्रसारण दूरदर्शन आणि आकाशवाणीचे प्रादेशिक विभाग यांनी स्वातंत्र्य सैनिक, ऐतिहासिक महत्वाच्या घटना आणि स्थळे यावर आधारित विशेष कार्यक्रम आपल्या दैनंदिन बातमीपत्रात प्रसारित केले. अनेक कम्युनिटी रेडीओ केंद्रांनी विशेष कार्यक्रम प्रसारित केले. स्वातंत्र्य सैनिकांचे अद्वितीय योगदान, त्यांचे शौर्य, निष्ठा आणि त्याग तसेच प्रसिद्धी न पावलेले नायक यासारखे विविध पैलू ठळकपणे दर्शवण्यात आले. ब्युरो ऑफ आऊटरिच अँन्ड कम्युनिकेशनच्या प्रादेशिक विभागानी पथ नाट्य, जादूचे प्रयोग, कळसूत्री बाहुल्यांचे प्रयोग, लोक कथा, विविध एकात्मिक संवाद आणि आऊटरिच कार्यक्रमाच्या आणि गायन आणि नाट्य विभागाच्या 1000 पेक्षा जास्त PRTच्या सहकार्यातून देशभरात सादर केले.

🟪माजी क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचे निधन. नामांकित प्रशिक्षक वासू परांजपे यांचे सोमवारी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता, दोन मुली आणि मुलगा जतीन असा परिवार आहे. गेली सहा दशके भारतीय आणि विशेषत: मुंबईच्या क्रिकेटसाठी परांजपे यांनी प्रशिक्षक, निवड समिती सदस्य, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका पार पाडल्या. वासूसरांप्रमाणे मुंबईच्या क्रिकेटची नाडी कुणालाच ठाऊक नाही, असे त्यांच्याविषयी म्हटले जाते. महान क्रिकेटपटू सुनील गावस्करला ‘सनी’ हे टोपणनाव त्यांनीच दिले. २९ प्रथम श्रेणी सामन्यांत दोन शतकांसह ७८५ धावा अशी परांजपे यांची आकडेवारी फारशी लक्षवेधी नव्हती. पण खेळाची जाण आणि खेळाडूंच्या दृष्टिकोनावर मेहनत घेणे, हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्यांना हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजरात अशा चार भाषा अवगत होत्या. माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती सदस्य मुलगा जतीनने क्रीडा पत्रकार आनंद वासू यांच्यासह परांजपे यांच्या जीवनावरील ‘क्रिकेट द्रोणा’ हे पुस्तक लिहिले होते. यात भारतामधील अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी त्यांची कारकीर्द घडवण्यात परांजपे यांचे कसे योगदान होते, हे नमूद केले आहे. ऐंशीच्या दशकात ते खेळाडूंना जीवनाकडे पाहण्याचा धडा द्यायचे. परांजपे यांच्या पत्नी ललिता या रुईया महाविद्यालयात त्या वेळी इंग्रजी वाङ्मय विभागाच्या प्रमुख होत्या. माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरने आपल्या पुस्तकात परांजपे दाम्पत्याचे अनुभव मांडले आहेत. दादर युनियनमध्ये परांजपे यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी ललिता यांच्या शैक्षणिक तासिकांना मुकावे लागल्याचे त्याने म्हटले आहे.

🟪सुप्रसिद्ध बंगाली लेखक बुद्धदेव गुहा यांचे निधन. प्रसिद्ध बंगाली लेखक बुद्धदेव गुहा यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.‘मधुकरी’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले होते. गुहा हे कोविड नंतरच्या गुंतागुंतीमुळे हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावले. त्यांच्या कादंबऱ्यांतून निसर्गाशी सान्निध्य जाणवत असे. पूर्व भारतातील जंगलांवर त्यांचे विशेष प्रेम होते. कोविड नंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच रविवारी ११.२५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना एप्रिलमध्ये करोना झाला होता. त्यावेळी ते ३३ दिवस रुग्णालयात होते. गुहा यांच्या पश्चात दोन मुली असून त्यांच्या पत्नी रितू गुहा या रबींद्र संगीतातील तज्ज्ञ होत्या. त्यांचे २००१ मध्ये निधन झाले होते. गुहा यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे बालपण रंगपूर व बारीसाल या पूर्व बंगालमधील भागात गेले. बालपणीच्या आठवणींचा त्यांच्यावर ठसा होता. त्यांना आनंद पुरस्कारासह शिरोमण पुरस्कार, शरत पुरस्कार मिळाले होते. त्यांनी मधुकरी, कोएलर कच्छे, सोबीनॉय निबेदॉन ही त्यांची पुस्तके गाजली. बाबा होवा व स्वामी होवा या त्यांच्या दोन कादंबऱ्यांवर ‘डिक्शनरी’ हा चित्रपट काढण्यात आला होता. मुलांसाठीही त्यांनी लेखन केले. त्यात रिजुदा हे त्यांचे पात्र जास्त भावले. पुस्तक मेळ्यात ते येत असत तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. त्यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलरच्या यादीत आहेत.

🟪कुक्कुटपालन व्यवसायासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लहान-मोठ्या कुक्कुटपालन व्यवसायासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वांना जाहीर करण्यात आले आहे. या व्यवसायामुळे होणारे पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांना तयार करण्यात आले आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावर मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग जबाबदार असणार आहे. काही प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत - ▪️कुक्कुटपालन प्रकल्पांचे वर्गीकरण: लघु शेतकरी: 5,000-25,000 पक्षी मध्यम शेतकरी: 25,000 पेक्षा जास्त आणि 1,00,000 पेक्षा कमी पक्षी मोठे शेतकरी: 1,00,000 पेक्षा जास्त पक्षी ▪️खालील बाबींसाठी मान्यतापत्र आवश्यक असेल: मध्यम आकाराच्या प्रकल्पांची स्थापना आणि संचालन करण्यासाठी ही मान्यता ‘जल कायदा-1974’ आणि ‘हवा कायदा-1981’ अंतर्गत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा समितीद्वारे दिली जाणार आहे. परवाना 15 वर्षांसाठी वैध असेल. प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना: पक्ष्यांकडून हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी हवेशीर खोली असावी. पक्ष्यांची विष्ठा वाहत्या पाण्याशी किंवा इतर कीटकनाशकांच्या संपर्कात येऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे.